शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

राज्याचा फॉर्म्यूला जि.प.निवडणुकीतही अंमलबजावणी बाबत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 12:06 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली असून सर्वांनीच प्राथमिक मेळावे व इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. एकुणच जिल्ह्यातील राजकीय स्थिती पहाता विधानसभा निवडणुकीत झालेल्या पक्षांतरामुळे आणि त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे राजकीय नेत्यांची मोठी गोची झाली आहे. अशा स्थितीत राज्यातील महाविकास आघाडीचाच फार्म्यूला काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने अमंलबजावणीबाबत प्राथमिक चाचपणी सुरू केली आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या एकुण ५६ गट आणि सहा पंचायत समितींच्या ११२ गणांच्या निवडणुकीसाठी पुढील आठवड्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतरासाठी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे लक्ष मुंबईकडेच होते. त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यानंतरही सर्वच पक्षांमध्ये शांततेचे वातावरण होते. आता गेल्या दोन, तीन दिवसांपासून सर्व नेते सक्रीय झाले आहेत. भाजपने मेळावा व मुलाखती घेवून आघाडी घेतली. या पक्षातर्फे जिल्हा परिषदेसाठी १८७ व पंचायत समितीच्या गणांसाठी २६५ उमेदवारांनी मुलाखती दिल्याचे पक्षाचे म्हणने आहे. अर्थातच उमेदवारीसाठी अनेक गट, गणांमध्ये पक्षांतर्गतच स्पर्धा राहणार असल्याचे चित्र आहे. अशीच स्थिती काही गट आणि गणांमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्टÑवादीचीही आहे. या तिन्ही पक्षांचे स्वतंत्र मेळावे झाले. त्यात सर्व गटात स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा दावा त्यांनी केला आहे. असे असले तरी काही प्रमुख नेते मात्र राज्याप्रमाणेच महाविकास आघाडी करून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे बोलले जात आहे. कारण चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नंदुरबार तालुक्यात काँग्रेस खिळखिळी झाली आहे. तर राजेंद्र गावीत यांनी भाजप प्रवेश केल्याने शहादा तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे. दिपक पाटील यांनीही भाजप मध्ये प्रवेश केल्याने शहादा तालुक्यात काँग्रेसची शक्ती कमी झाली आहे. नवापूर तालुक्यातून भरत गावीत यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने या तालुक्यातही काही गटांमध्ये काँग्रेस कुमकूवत आहे. शिवसेना नंदुरबार आणि अक्कलकुवा वगळता इतर चार तालुक्यांमध्ये फार काही प्रभावी नाही. अशा स्थितीत काँग्रेस, शिवसेना व राष्टÑवादी या तिन्ही पक्षांना आघाडी करणे भागच पडणार असल्याचे कार्यकर्त्यांचेही म्हणने आहे. शिवाय ही आघाडी झाल्यास पूर्वाश्रमीचे सर्व नेते एकत्र येणार असल्याने राजकीय सूरही त्यांचा जुळेल अशाही प्रतिक्रीया आहेत. त्यामुळे हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी करून निवडणूक लढवतील असे प्राथमिक चित्र आहे.दुसरीकडे भाजपने निवडणुकीची जबाबदारी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्यावर सोपविल्याने एरव्ही पक्षाच्या बैठकांमध्ये फारसे सक्रीय न दिसणारे डॉ.विजयकुमार गावीत गेल्या दोन दिवसांपासून मुलाखतींसाठी ठाण मांडून होते. मुलाखतीसाठी इच्छुकांच्याही चांगला प्रतिसाद दिसून आला. तर काँग्रेसच्या पहिल्याच मेळाव्यात झालेली गर्दी लक्षवेधी होती. आता याच मेळाव्याच्या धर्तीवर शिवसेनेचाही चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत १४ डिसेंबरला पुन्हा मेळावा होणार आहे. त्यात शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे.एकीकडे महाविकास आघाडीची चर्चा सुरू असतांना मात्र विधानसभा निवडणुकीत झालेली डॉ.विजयकुमार गावीत व चंद्रकांत रघुवंशी यांच्या युतीचे काय होईल याचीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. कारण निवडणुकीत या दोघांनी राज्याच्या राजकारणात काहीही झाले तरी आता युती न तोडण्याचा संकल्प जाहीर केला होता. त्यामुळे हा मुद्दा अधीक चर्चेत आला आहे.