शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

नंदुरबारात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 27 रोजी विकास कामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 18:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकनेते बटेसिंह रघुवंशी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व जल मल निस:रण प्रकल्पाचे लोकार्पण 27 रोजी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, 26 जानेवारी रोजी माँ-बेटी गार्डने भुमिपूजन देखील होणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.कार्यक्रमांच्या आयोजनासंदर्भात बोलतांना आमदार चंद्रकांत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकनेते बटेसिंह रघुवंशी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व जल मल निस:रण प्रकल्पाचे लोकार्पण 27 रोजी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, 26 जानेवारी रोजी माँ-बेटी गार्डने भुमिपूजन देखील होणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.कार्यक्रमांच्या आयोजनासंदर्भात बोलतांना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, जीटीपी महाविद्यालयाच्या प्रांगणात स्व.बटेसिंह रघुवंशी यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण 27 रोजी सकाळी 11 वाजता माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी उत्तर प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले असतील. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री दादा भुसे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सुरुपसिंग नाईक, माजी खासदार माणिकराव गावीत, खासदार राजीव सातव, आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार रोहिदास पाटील, खासदार डॉ.हिना गावीत, खासदार रजनी पाटील, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, धुळ्याचे शिवाजीराव दहिते, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार अॅड.के.सी.पाडवी, आमदार उदेसिंह पाडवी, आमदार आसिफ शेख, आमदार काशिराम पावरा, आमदार डी.एस.अहिरे, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, पद्माकर वळवी, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, आमदार सुनील गामित आदी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यापूर्वी सकाळी दहा वाजता पालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या नळवा शिवारातील जल मल निस:रण प्रकल्पाचा शुभारंभ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.24 तास पाण्यासाठी नियोजनशहराला 24 बाय सात योजनेअंतर्गत 24 तास पाणी पुरवठय़ासाठी नियोजन करण्यात येत आहे. यासाठी कन्स्लटंट कंपनीला नेमण्यात आले असून सहा महिन्यात ते प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करतील अशी माहितीही आमदार रघुवंशी यांनी दिली. योजनेअंतर्गत बहुतेक आराखडा आधीच तयार आहे. त्यामुळे फारसे काम करण्याची गरज राहणार नाही. प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला केवळ दोन प्रभागात ही योजना सुरू केली जाईल. वर्षभर तेथे देखरेख करून योजना यशस्वी झाल्यास संपुर्ण शहरात ती राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मात्र मिटर बसविण्यात येणार आहे.शहरात शहरी ग्रामिण आरोग्य अभियानाअंतर्गत दोन दवाखाने बांधून तयार आहेत. पदांची भरती झाल्यास 1 फेब्रुवारीपासून ते देखील सुरू होतील. या ठिकाणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पदभरतीचा अधिकार आता देण्यात आला आहे.ट्रक टर्मिनस देखील 26 जानेवारीपासून कार्यान्वीत केले जाणार आहे. जड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेर्पयत शहरात प्रवेश बंदीची मागणी प्रशासनाकडे पालिकेने केली आहे. परंतु प्रशासनाने अद्याप अध्यादेश काढला नसल्याचेही आमदार रघुवंशी यांनी सांगितले.