शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ाच्या बंदोबस्तकडे वनविभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा/प्रतापपूर : मानवी वसाहतींकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसात धवळीविहीर, प्रतापपूर व रांझणी या गावांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा/प्रतापपूर : मानवी वसाहतींकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसात धवळीविहीर, प्रतापपूर व रांझणी या गावांमध्ये बिबटय़ाने पाळीव पाण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहे. या बिबटय़ाच्या बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे, परंतु वन विभागामार्फत या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सातपुडय़ातील वन्यप्राणी वारंवार तळोदा तालक्यातील मानवी वसाहतींमध्ये शिकारीचा शोधात धाव घेत आहे. त्यात प्रमाुख्याने बिबटय़ाचा अधिक वावर असल्याचे दिसून येत आहे. या बिबटय़ाने रांझणी येथील शरद निंबा मराठे यांच्या मेंढपाळ तानू मानू भापकर हे मेंढय़ांसह वास्तव्यास होते. बिबटय़ाने मेंढय़ांच्या कळपावर हल्ला करीत दोन मेंढय़ा फस्त केल्या. यापूर्वी प्रतापपूर येथील विजय पाटील, छोटू पावरा, राजाराम गुंजाळे यांच्या पाळीव पाण्यांवर बिबटय़ाने हल्ला करीत त्यांना ठार केले. मेंढय़ांवरील हल्ल्यांशिवाय 26 नोव्हेंबर रोजी धवळीविहीर ता.तळोदा येथील जयसिंग रतिलाल पावरा हे गुरे चारुन घराकडे येत असताना बिबटय़ाने पाळीव प्राण्यांवर हल्ला करीत त्यांना ठार केले. रांझणी  व धवळीविहीर या दोन्ही घटनांचा वनविभागामार्फत पंचनामे देखील करण्यात आले. रांझणी येथी नुकसानीचा पंचनामा वनपाल एन.पी.पाटील, वनरक्षक एल.टी.पावरा यांनी केला तर धवळीविहीर येथील नुकसानीचा देखील पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पंचनामा करतांना दोन्ही ठिकाणच्या नुकसानग्रस्तांसह नागरिकांमार्फत बिबटय़ाच्या बंदोबस्तसाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकररडे वन विभागामार्फत दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पशुपालकांसह नागरकांमार्फत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बिबटय़ाच्या भितीमुळे तालुक्यातील रब्बी हंगामातील शेतीची कामांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. ही कामे वेळोवर पूर्ण करण्यासाठी वन विभागामार्फत तालुक्यात ठिकठिकाणी पिजरे लावण्यात यावे, अशी मागणी पुन्हा करण्यात येत  आहे. वन विभागामार्फत बिबटय़ाच्या बंदोबस्त न झाल्यास वन विभागाविरुद्ध आंदोलन करण्यात येणार असल्याचे नागरिकांमार्फत सांगण्यात येत आहे. अशा घटना तळोदा तालुक्यात वारंवार घडत असल्यामुळे यंदाच्या मागणीनपुसार वन विभागामार्फत कुठली भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे.