शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
2
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
3
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
4
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
5
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
6
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
7
“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान
8
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
9
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
10
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!
11
'सिंधूच्या प्रत्येक थेंबावर आमचा हक्क आहे', पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची मुक्ताफळे
12
जाऊबाई जोरात, एकमेकींच्या पडल्या प्रेमात; घरातून पळाल्या, २ वर्षांनी परतल्या अन् म्हणाल्या...
13
काल पक्षावर बोलले, आज काढून टाकले; संजय राऊतांचा एक फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी
14
१० हजारांच्या SIP द्वारे ५ वर्षात १२ लाख! चौपट नफा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड योजना
15
5G फोन पाच हजारांत! भारतात नवी कंपनी आपले स्मार्टफोन घेऊन येतेय; फोन नवा असणार, पण पार्ट जुने... 
16
परकीय गुंतवणूकीच्या आघाडीवर सरकारचा मोठा निर्णय, चीन-पाकिस्तानसह अनेक देशांवर होणार परिणाम
17
Rani Baug: "राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लांचं नाव बदलता येणार नाही", प्रशासनाकडून स्पष्टीकरण
18
तडकाफडकी ठाकरे गटातून हकालपट्टी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
IPL 2025 चॅम्पियन RCB चा 'खुली बस परेड' प्लॅन फिस्कटला; या गोष्टीची भीती ठरलं त्यामागचं कारण
20
PF च्या ७ लाखांच्या विम्यासाठी UAN-आधार लिंक अनिवार्य; सक्रीय करण्यासाठी 'इतके' दिवस बाकी!

दुष्काळ निवारण्यासाठी वनराई बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:28 IST

प्रशासनाचा उपक्रम : जिल्ह्यात एक हजार 800 बंधारे बांधणार; तळोद्यात टाकळी येथे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनानेदेखील कंबर कसली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील वाहणा:या नदी, नाल्यांवर संपूर्ण जिल्ह्यातून साधारण एक हजार 800 वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. दरम्यान तळोदा तालुक्यातील असे शंभर बंधारे बांधण्यात येणार असून, त्याची सुरूवातही टाकळी येथे महसूल प्रशासनातर्फे बुधवारी करण्यात आली आहे. हे बंधारे शासनाच्या विविध यंत्रणा व गावक:यांच्या मदतीने करण्यात येत आहेत.जिल्ह्यातील सहाही तालुक्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पजर्न्यमान झाले आहे. त्यामुळे नंदुरबारसह, तळोदा, शहादा व नवापूर या चार तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातही नंदुरबार, नवापूर, शहादा हे तीन तालुके गंभीर दुष्काळी म्हणून शासनाने नुकतीच जाहीर केले आहे. तर तळोदा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झालेला आहे. असे असले तरी ऑक्टोबर महिन्यापासूनच भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसा गणिक प्रचंड खालावत चालली आहे. भूजल सव्रेक्षण विभागाने या चार ही तालुक्यामध्ये साधारण दोन-अडीच मीटर पेक्षा जास्त पाण्याची पातळी खाली गेल्याचे 15 दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यानंतरही सातत्याने पातळीत घट निर्माण होत असल्याचे शेतकरी सांगतात. पाण्याच्या या सततच्या घटणा:या पातळीमुळे साहजिकच आतापासूनच शेतक:यांबरोबर सामान्य जनतेमध्येही चिंता वाढली आहे. दुष्काळावर उपाय योजनांसाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाकडून प्रय} केले जात आहे.  एवढेच नव्हे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक हजार 800 वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे बंधारे जेथे नद्या, नाल्याचा प्रवाह आतापावेतो सुरू आहे अशा ठिकाणी बांधण्यात येणार आहेत. यासाठी स्थानिक ग्रामस्थांबरोबरच तालुका महसूल प्रशासन, कृषी विभाग, वनविभाग व पंचायत समिती या चार यंत्रणांची मदत घेतली जात आहे. तळोदा तालुक्यातही येथील महसूल प्रशासनाने शंभर वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन केले आहे. तसा सव्रेदेखील करण्यात आला आहे. बुधवारी या यंत्रणांच्या कर्मचा:यांनी स्थानिक गावक:यांच्या सहकार्याने टाकळी गावाजवळील नदीवर कच्चा वनराई बंधारा बांधण्यात आला. दिवसभर गावक:यांनी व कर्मचा:यांनी श्रमदान केले होते. स्वत: अधिकारीही गावक:यांबरोबर श्रमदान करीत असल्यामुळे गावकरीही भारावले होते. निदान या वनराई बंधा:यांमुळे तरी सतत खोल-खोल जाणारी परिसरातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रशासनानेही कंबर कसून बंधा:यांचा स्तुत्य कार्यक्रम हाती घेतल्याने ग्रामीण भागातून अधिका:यांचे कौतुक केले जात आहे. या कार्यक्रमात गावक:यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.