शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
5
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
6
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
7
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
8
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
9
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
10
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
11
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
12
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
13
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
14
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
15
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
16
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
17
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
18
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
19
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
20
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती

रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाइकांनाच सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST

कोरोनाने जिल्ह्यात अक्षरशः थैमान घातले आहे. रोजच हजारो रुग्ण आढळून येत आहेत. त्यातील बऱ्याच रुग्णांचा सिटीस्कॅन स्कोअर वाढलेला असतो. ...

कोरोनाने जिल्ह्यात अक्षरशः थैमान घातले आहे. रोजच हजारो रुग्ण आढळून येत आहेत. त्यातील बऱ्याच रुग्णांचा सिटीस्कॅन स्कोअर वाढलेला असतो. साहजिकच रुग्णांचे नातेवाईक काळजीत पडले आहे. जवळपास बहुतेक रुग्णांचे नातेवाईक रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करीत असतात. साहजिकच खासगी डाॅक्टरदेखील रेमडेसिविरची सूचना संबंधित नातेवाइकांना देतात. अशावेळी रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी नातेवाईक बाहेर इंजेक्शनच्या शोधासाठी फिरतात. प्रसंगी ते जिल्ह्याबरोबरच गुजरात व बाहेर जातात. तेथेही इंजेक्शन मिळत नाही, तेव्हा आपले मित्र, राजकीय पुढारी यांच्याकडे चकरा मारतात. एवढी फिल्डिंग लावूनही त्यांच्या पदरी निराशा येत आहे. रेमडेसिविरच्या बाबतीत रुग्णांच्या नातेवाइकांचा होत असलेला छळ लक्षात घेऊन शासनाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे खासगी दवाखान्यातील डाॅक्टरांनी रुग्णांच्या नातेवाइकांना हे इंजेक्शन बाहेरून आणण्याची सक्ती करू नये, असे स्पष्ट बजावलेले असताना जिल्ह्यातील डाॅक्टर्स राज्य शासनाचा आदेश धाब्यावर बसवून नातेवाइकांनाच बाहेरून इंजेक्शन आणण्याची सक्ती करीत आहेत. त्यामुळे नातेवाईक आपल्या रुग्णासाठी इंजेक्शनच्या शोधासाठी भटकत असल्याचे चित्र आहे.

वास्तविक जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. जिल्हा व जिल्ह्याबाहेरील, गुजरातमधील सरकारी, खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. अत्यंत गंभीर परिस्थिती बनली असताना त्यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना आखून साधन सामग्री उपलब्ध करून देणे आवश्यक असताना सर्वच यंत्रणांनी अंग काढून घेतल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. जवळच्या जळगाव जिल्ह्यात प्रशासनाने रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी आपल्या महसूल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून सुयोग्य नियोजन केले असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. असे असताना आपल्याकडे प्रशासनाने हात झटकल्याने नातेवाइकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासनाने खरोखर गंभीर रुग्णांना रेमडेसिविरची आवश्यकता असेल तरच वापर करण्याची सूचना खासगी डाॅक्टरांना द्यावी अन्यथा कारवाई करावी तरच या इंजेक्शनचा तुडवडा कमी होईल.