शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

तीन महिन्यांच्या ‘लॉक’मुळे बहरलेली फूलशेती ‘डाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:15 IST

सुनील कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्क आष्टे : लॉॅकडाऊनमुळे सलग तीन महिने फूलविक्रीची दुकाने बंद होती़ यातून त्यांचे उत्पादन ...

सुनील कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टे : लॉॅकडाऊनमुळे सलग तीन महिने फूलविक्रीची दुकाने बंद होती़ यातून त्यांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून आष्टे, ता़ नंदुरबार येथील दोन शेतकºयांनी सुमारे चार एकरातील गुलाब आणि शेवंतीची फूलझाडे थेट कापून टाकली आहेत़ हीच गत नंदुरबार तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकºयांची असून येथील अनेक शेतकºयांनी फुलांची शेती करणे सोडून दिले आहे़मार्च महिन्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनवेळी सर्वात मोठा हंगाम हा विवाह सोहळ्यांचा होता़ या काळात फुलांना मोठी मागणी होती़ यामुळे जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात शेतकºयांनी शेवंती आणि गुलाबाची लागवड केली होती़ या लागवडीला मार्च महिन्याच्या मध्यात बहार आला होता़ नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात उत्पादन घेतला जाणारा फुलांचा माल हा रेल्वेमार्गाने विदर्भात रवाना करण्यात येतो़ लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद झाल्याने शेतकºयांनी उत्पादित केलेली फुले झाडावरच कोमेजली होती़ स्थानिक शहरांमध्येही फुले विक्री करू शकत नसल्याने संपूर्ण तीन महिन्याच्या काळात फुले वाळून झाडावरून खाली पडल्याचे दृश्य शेतकºयांच्या दररोज नजरेस पडत होते़ तीन महिन्यात शेतीला पाणी आणि संगोपन झाले नसल्याने शेतीची वाताहत झाल्याने आता ही काढून फेकण्याची प्रक्रिया शेतकºयांनी सुरू केली आहे़ नंदुरबार तालुक्यातील धानोरा रस्त्यालगतच्या दुतर्फा असलेल्या फूलशेतीलाही याचा फटका आहे़ दुसरीकडे नंदुरबार शहरात फूलविक्रीचा व्यवसाय करणाºयांच्याही अडचणी वाढल्या आहेत़ अहमदाबाद, सुरत, बेंगलुरु आणि मुंबई येथील बाजारपेठेतून येणारी फुलेच नसल्याने त्यांना स्थानिक उपलब्ध असलेल्या झेंडू, गुलाब, मोगरा, शेवंती यावर भागवावे लागत आहे़ लग्नसराई पूर्णपणे रिकामी गेल्याने फूलशेती करणारे आणि विक्रेते या दोघांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़ आष्टे, ता़ नंदुरबार येथील यशवंत मोतीलाल कोकणी यांनी २८ गुंठे क्षेत्रात गुलाबाची २० हजार ४०० तर दोन एकरात शेवंतीची ७७ हजार झाडे लावली होती़ गुलाब रोपांसाठी त्यांनी २लाख ६५ हजार तर शेवंती रोपांसाठी ४ लाख ६२ हजार रुपयांचा खर्च केला होता़ सोबत संगोपन, मजूर, फवारणी आदी खर्च धरून चार लाख असा १० लाखांचा खर्च करून फुलवलेली फूलशेती लॉकडाऊनमुळे लयास गेली आहे़ मालाला उचल नसल्याने ही सर्व झाडे कापून फेकावी लागली आहेत़ त्यांच्यासोबत आष्टे येथील रामदास बागुल यांच्या एक एकरातील शेवंती फुलांना उचलअभावी फटका बसून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़ ४नंदुरबार तालुका तसेच शहरालगत बरेच शेतकरी लग्नसराईचा अंदाज घेत दरवर्षी फूलशेती करतात़ काही शेतकरी जानेवारी तर काही मार्चमध्ये फूलझाडांची लागवड करतात़ जानेवारीत लागवड केलेल्यांना उत्पादन येऊनही विक्री करता आले नाही़ तर मार्चमध्ये लागवड केलेल्यांना मागणीअभावी शेती अर्ध्यावर सोडून द्यावी लागली़४दरम्यानच्या काळात मंदिरे बंद असल्याने फुलांची मागणी घटली आहे़ सोबत धार्मिक उत्सव, भागवत सप्ताह, वाढदिवस यासह विविध घरगुती कार्यक्रमही बंद झाल्याने फुलांची मागणी शून्य आहे़४तूर्तास विवाह सोहळे कमीत कमी खर्चात होत असल्याने फुलांची मागणी नगण्य आहे़ यामुळे मंगळबाजार, जळका बाजार यासह नंदुरबार शहरातील विविध ठिकाणची फुलांची दुकाने ओस पडली आहेत़ लॉकडाऊनमुळे फुलांची बाजारपेठ आणि फूलशेती यांचे मोठे नुकसान झाले आहे़ स्थानिक उत्पादकांकडे माल नसल्याने तसेच बाहेरगावाहून होणारी आवक बंद असल्याने मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे़ शासनाने याकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे़- रामचंद्र माळी,फूलविक्रेता, नंदुरबाऱ