शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

गुजरातच्या बेपर्वाईने महाराष्ट्रातील पाच लाख कोंबड्यांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:38 IST

नंदुरबार : महाराष्ट्र प्रशासनाने बर्ड फ्लू बाबत गुजरात प्रशासनाला सतर्क करुनही त्याची तात्काळ दखल न घेतल्याने आता त्याचा संभाव्य ...

नंदुरबार : महाराष्ट्र प्रशासनाने बर्ड फ्लू बाबत गुजरात प्रशासनाला सतर्क करुनही त्याची तात्काळ दखल न घेतल्याने आता त्याचा संभाव्य धोक्यापासून महाराष्ट्राला सतर्क राहावे लागणार आहे. सीमेलगतच्या पाच पाेल्ट्रींचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी गुजरातच्या हद्दीतील पोल्ट्रींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सुमारे पाच लाख कोंबड्यांना त्याचा धोका निर्माण झाला आहे.महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेलगत माेठ्या प्रमाणावर पोल्ट्री व्यवसाय चालतो. या दोन्ही राज्यात तीन किलोमीटरच्या परिसरात ३० पेक्षाही अधिक पोल्ट्री असून, त्यात महाराष्ट्राच्या हद्दीतील २७ आहेत. तर गुजरातच्या हद्दीत तीन आहे. पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांच्या अचानक मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येताच महाराष्ट्र प्रशासन सतर्क झाले व उपाययोजना सुरू केल्या. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. त्याचे अहवाल पॉझिटिव्ह येताच तात्काळ कोंबड्या व अंडी शास्त्राेक्त पद्धतीने नष्ट करण्यास सुरूवात केली. त्यासाठी विविध जिल्ह्यातील सुमारे ३०० पथक कार्यरत होते. हा अहवाल ज्या दिवशी मिळाला त्याच दिवशी जिल्हा प्रशासनाने शेजारील डांग व तापी जिल्हा प्रशासनाला कळवून सतर्कतेबाबत सूचना केल्या होत्या. मात्र गुजरात प्रशासनाने सुरूवातीला बेपर्वाईची भूमिका घेतली. एवढेच नव्हे तर गुजरातमधील पोल्ट्री फार्ममधून पक्षांची ने-आण होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी तेथील पोल्ट्रीवर महाराष्ट्राचाच पोलीस बंदोबस्ताला ठेवण्यात आले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर गुजरात प्रशासनाला जाग आली आणि तेथील पोल्ट्रीवर गुजरातचे पोलीस बंदोबस्ताला ठेवले. त्यानंतर तपासणीसाठी नमुनेही घेण्यात आले. इकडे महाराष्ट्रातील २२ पोल्ट्रीतील अहवाल पॉझीटिव्ह आल्याने तेथील सुमारे पावणेसहा लाख कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या. उर्वरित पाच पोल्ट्रींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तब्बल १० दिवसांपासून अहोरात्र काम करणाऱ्या यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. पक्षांची किलिंग थांबविण्यात आली आणि विविध जिल्ह्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांनाही विश्रांती देण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील किलिंग थांबवताच गुजरातमधील ‘त्या’ पोल्ट्रींचे अहवाल पॉझिटीव्ह आले. विशेष म्हणजे तेथील पोल्ट्रीत एच ५, एन १ हा मनुष्यालाही धोका पोहचवू शकणाऱ्या विषाणू निष्पन्न झाला. त्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडून विश्रांतीचा मुडमध्ये आलेल्या महाराष्ट्र प्रशासनाची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे. कारण गुजरातमधील तो पोल्ट्री फार्म हाकेच्या अंतरावरच असून, ज्या पाच पोल्ट्रीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तेथील किलिंग थांबविण्यात आले होते. त्या पोल्ट्री जवळच असल्याने तेथील सुमारे पाच लाख कोंबड्यांना पुन्हा गुजरातच्या या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पुन्हा खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.