शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

गुजरातच्या बेपर्वाईने महाराष्ट्राच्या पाच लाख कोंबड्यांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:11 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र प्रशासनाने बर्ड फ्लू बाबत गुजरात प्रशासनाला सतर्क करुनही त्याची तत्काळ दखल ...

रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र प्रशासनाने बर्ड फ्लू बाबत गुजरात प्रशासनाला सतर्क करुनही त्याची तत्काळ दखल न घेतल्याने आता त्याचा संभाव्य धोक्यापासून महाराष्ट्राला सतर्क राहावे लागणार आहे. सीमेलगतच्या पाच पाेल्ट्रींचा अहवाल निगेटीव्ह आला असला तरी गुजरातच्या हद्दीतील पोल्ट्रींचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने सुमारे पाच लाख कोंबड्यांना त्याचा धोका निर्माण झाला आहे.महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेलगत माेठ्या प्रमाणावर पोल्ट्री व्यवसाय चालतो. या दोन्ही राज्यात तीन किलोमीटरच्या परिसरात ३० पेक्षाही अधिक पोल्ट्री असून, त्यात महाराष्ट्राच्या हद्दीतील २७ आहेत. तर गुजरातच्या हद्दीत तीन आहे. पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांच्या अचानक मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येताच महाराष्ट्र प्रशासन सतर्क झाले व उपाययोजना सुरू केल्या. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. त्याचे अहवाल पॉझिटीव्ह येताच तत्काळ कोंबड्या व अंडी शास्त्राेक्त पद्धतीने नष्ट करण्यास सुरूवात केली. त्यासाठी विविध जिल्ह्यातील सुमारे ३०० पथक कार्यरत होते. हा अहवाल ज्या दिवशी मिळाला त्याच दिवशी जिल्हा प्रशासनाने शेजारील डांग व तापी जिल्हा प्रशासनाला कळवून सतर्कतेबाबत सूचना केल्या होत्या. मात्र गुजरात प्रशासनाने सुरूवातीला बेपर्वाईची भूमिका घेतली. एवढेच नव्हे तर गुजरातमधील पोल्ट्री फार्ममधून पक्षांची ने-आण होवू नये याची खबरदारी घेण्यासाठी तेथील पोल्ट्रीवर महाराष्ट्राचाच पोलीस बंदोबस्ताला ठेवण्यात आले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर गुजरात प्रशासनाला जाग आली आणि तेथील पोल्ट्रीवर गुजरातचे पोलीस बंदोबस्ताला ठेवले. त्यानंतर तपासणीसाठी नमुनेही घेण्यात आले. इकडे महाराष्ट्रातील २२ पोल्ट्रीतील अहवाल पॉझीटिव्ह आल्याने तेथील सुमारे पावणेसहा लाख कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या. उर्वरित पाच पोल्ट्रींचे अहवाल निगेटीव्ह आल्याने तब्बल १० दिवसांपासून अहोरात्र काम करणाऱ्या यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. पक्षांची किलिंग थांबविण्यात आली आणि विविध जिल्ह्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांनाही विश्रांती देण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील किलिंग थांबवताच गुजरातमधील ‘त्या’ पोल्ट्रींचे अहवाल पॉझिटीव्ह आले. विशेष म्हणजे तेथील पोल्ट्रीत एच ५, एन १ हा मनुष्यालाही धोका पोहचवू शकणाऱ्या विषाणू निष्पन्न झाला. त्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडून विश्रांतीचा मुडमध्ये आलेल्या महाराष्ट्र प्रशासनाची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे. कारण गुजरातमधील तो पोल्ट्री फार्म हाकेच्या अंतरावरच असून, ज्या पाच पोल्ट्रीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तेथील किलिंग थांबविण्यात आले होते. त्या पोल्ट्री जवळच असल्याने तेथील सुमारे पाच लाख कोंबड्यांना पुन्हा गुजरातच्या या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पुन्हा खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.