शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पाचच कर्मचा:यांवर शहरातील आरोग्याचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : मलेरिया आणि डेंग्यूच्या वाढत्या साथींच्या पाश्र्वभूमीवर येथील आरोग्य यंत्रणेकडून सोमवारी शहरातील प्रत्येक घरांमधील रुग्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : मलेरिया आणि डेंग्यूच्या वाढत्या साथींच्या पाश्र्वभूमीवर येथील आरोग्य यंत्रणेकडून सोमवारी शहरातील प्रत्येक घरांमधील रुग्ण सव्रेक्षण, औषधोपचार व दूषित पाण्याची तपासणी केली जात आहे. यासाठी ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा:यांची मदत घेतली जात असली तरी 40 हजार लोकसंख्येच्या शहरासाठी सध्या केवळ पाचच कर्मचा:यांवर नागरिकांच्या आरोग्याचा गाडा सुरू आहे. कर्मचा:यांची तुटपूंजी संख्या लक्षात घेऊन नेहमीच इकडून-तिकडून कर्मचारी आणावे लागत असतात. आरोग्य प्रशासनाने निदान शहरवासियांच्या आरोग्याबाबत सजग राहून पुरेशे कर्मचारी नियुक्त करावे, अशी अपेक्षा आहे.मलेरिया व डेंग्युची साथ शहरात पसरली आहे. या साथींचे संशयित रुग्ण घरोघरी दिसून येत आहेत. याच पाश्र्वभूमिवर येथील आरोग्य यंत्रणेकडून शहरातील प्रत्येक घरांचे सव्रेक्षण केले जात आहे. हे सव्रेक्षण करताना आरोग्य कर्मचारी घरातील अशा रुग्णांची चौकशी करून त्यांच्यावर औषधोपचार करीत आहेत. याशिवाय साठविलेल्या पाण्याच्या टाक्यांची तपासणी करून तेथे औषधे टाकत आहेत. तसेच दूषित पाण्याचे नमुनेदेखील घेतले जात आहेत. त्याच बरोबर नागरिकांमध्ये मलेरिया व डेंग्युबाबत जनजागृती केली जात आहे.यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी वेगवेगळी 18 पथके नियुक्ती केली आहेत. यात ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, आरोग्य सेवक व आशा कर्मचा:यांचा समावेश आहे. त्यामुळे साहजिकच युद्ध पातळीवर आरोग्य यंत्रणेकडून कार्यवाही केली जात आहे. बाहेरील आरोग्य यंत्रणेकडून काम भागविले जात असले तरी शहरातील नागरिक, बालके, गरोदर मातांची नियमित आरोग्य तपासणी आणि लसीकरणासाठी सद्या पाचच कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचा:यांवर नागरिकांचा आरोग्याचा डोलारा सुरू आहे.वास्तविक शहराची लोकसंख्या साधारण 40 हजारापेक्षा अधिक आहे. त्यातुलनेत कर्मचा:यांची संख्या वाढविणे अपेक्षित असतांना वरिष्ठ आरोग्य प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे पालिकेने आपला दवाखाना बंद केल्यानंतर नागरिकांच्या आरोग्य उपचाराची जबाबदारी उपजिल्हा रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आली होती. संबंधित आरोग्य विभागाने हा कार्यभार उपजिल्हा रुग्णालयाकडून काढून तालुका वैद्यकीय यंत्रणेकडे गेल्या वर्षभरापासून सोपविला आहे. आधीच या यंत्रणेवर कामाचा मोठा ताण आहे. त्यात शहराचा अतिरक्त भार त्यामुळे एवढय़ा लोकांना पुरेशी आरोग्य सुविधा पुरवितांना त्यांचा अक्षरश: नाकेनऊ येत असते. अशा विदारक परिस्थितीतही चांगल्या सुविधा देण्याचा प्रय} ही यंत्रणा करीत असते. शहरासाठी देण्यात आलेले हे पाच आरोग्य कर्मचारी महिन्यातून 25 वेळा बालकांची गरोदर मातांची नियमित तपासणी बरोबरच लसीकरण करीत असतात. याशिवाय आरोग्य विभागाचे इतर कार्यक्रमांची जनजागृती, अंमलबजावणीची कामे ही करतात. विशेषत: शहरात अशा कर्मचा:यांची आवश्यकता असताना एकही आशा कार्यकर्ती दिलेली नाही. उपजिल्हा रुग्णालयाचा कार्यकक्षेत तळोदा शहर येत असले तरी तेथील यंत्रणा अगदी आणिबाणीच्या वेळेसदेखील सहकार्य करीत नसल्याचा आरोप आहे. वाढीव कर्मचारी नियुक्तीबाबत सातत्याने वरिष्ठ आरोग्य प्रशासनाकडे  पाठपुरावा करण्यात आला आहे. असे असूनही याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आता याप्रकरणी नूतन लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.