शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

पाच दिवसांपासून मोलगी परिसरातील गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुविधांच्या दृष्टीने दुर्गम भागाला नेहमीच साप} वागणूक दिली जात आहे. दूरसंचारच्या अनियमित सेवेनंतर आता ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुविधांच्या दृष्टीने दुर्गम भागाला नेहमीच साप} वागणूक दिली जात आहे. दूरसंचारच्या अनियमित सेवेनंतर आता मोलगी येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे मोलगी भागातील संपूर्ण गावे मागील पाच दिवसांपासून अंधारात असल्याचे तेथील नागरिकांमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे तेथील नागरिकांच्या समस्यांमध्ये दुपटीने भर पडली आहे. दुर्गम भागात शासकीय योजना व सुविधा पोहोचत नाही. पोहोचल्यास तरी त्यांची योग्य व नेमकी अंमलबजावणी करण्यात येत नसल्याच्या तक्रारी नेहमीच करण्यात येत असते. दोन वर्षापासून दूरसंचारमार्फत तेथील ग्राहकांना नियमित सेवा मिळत नाही. याबाबत दूरसंचार विभागाच्या अधिका:यांना विचारले असता वीज वितरणमार्फत योग्य दाबाचा विद्युत पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात येत होते. याबाबत संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यात आला असून कार्यवाहीची प्रतिक्षा आहे. ही प्रतिक्षा संपली नाही तोच पुन्हा मोलगी येथील सबस्टेशनमधील यंत्रणेत बिघाड झाली आहे. त्यामुळे मोलगी परिसरातील सर्व गावे गेल्या पाच दिवसांपासून अंधारात आहे. यामुळे तेथील नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. सर्व गावांमधी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी मोलगी सबस्टेशनमध्ये तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. 

अक्कलकुवा तालक्यातील भगदरी या गावाच्या सर्वागिण विकासासाठी चार वर्षापूर्वी तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी या गावाला दत्तक घेतले होते. परंतु मोलगी येथील वीज वितरणच्या सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे या परिसरातील गावांपाठोपाठ भगदरी हे गाव देखील अंधारात असल्याचे तेथील नागरिकांमार्फत सांगण्यात आले. त्याशिवाय संस्थानिकांचे गाव म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या तथा राजवाडी होळी पेटणा:या काठी ता.अक्कलकुवा हे गाव देखील सबस्टेशनमधील बिघाडामुळे मागील पाच दिवसांपासून अंधारात आहे. अशी प्रसिद्ध गावेही सुविधांपासून वंचित राहत असल्याने यंत्रणेबाबत शोकांतिका व्यक्त केली जात आहे.