शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सहीच्या अधिकाराअभावी पाच कोटींची बिले थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

तळोदा पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांचे कोरोना महामारीमुळे गेल्या महिन्यात निधन झाले. पंचायत समितीचा कार्यभार सहायक ...

तळोदा पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांचे कोरोना महामारीमुळे गेल्या महिन्यात निधन झाले. पंचायत समितीचा कार्यभार सहायक गटविकास अधिकारी आर. बी. साेनवणे यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र सहीच्या तांत्रिक समस्यांमुळे सावित्री खर्डे यांच्या कालावधीतील साडेचार ते पाच कोटींच्या कामाची बिले थकली आहेत. कारण एप्रिल महिन्यापूर्वी पंचायत समितीमार्फत तालुक्यात जी विकास कामे करण्यात आली आहेत, त्यांची बिले ठेकेदारांना अजूनही देण्यात आलेली नाहीत.

याबाबत पंचायत समिती प्रशासनाकडून माहिती घेतली असता, मृत गटविकास अधिकारी सावित्री खर्डे या निधन होण्यापूर्वी कामावर कार्यरत होत्या. परंतु त्यांनी आपल्या रजेचा अर्ज वरिष्ठ कार्यालय किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दिलेला नव्हता. त्यामुळे त्यांची सही निधनाआधी विविध कार्यालयीन कागदोपत्री होती. परिणामी या तांत्रिक अडचणीमुळे मोठा पेच निर्माण झाला असून, बिले काढता येत नसल्याचे यंत्रणांनी सांगितले. पंचायत समितीकडील थकीत बिलांमध्ये तालुक्यातील १६ अंगणवाड्‌यांच्या बांधकामांचा निधी, शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम, इतर वेगवेगळ्या निधीची बिले थकलेली आहेत. पैसे उपलब्ध असूनही त्यांना पैसे देता येत नाहीत. इकडे ठेकेदारांनी उधार, उसनवार पैसे घेऊन कामे वेळेत पूर्ण केली आहेत. मजुरांची मजुरी व दुकानदारांचे पैसे देता येत नसल्यामुळे त्यांना तोंड लपवावे लागत आहे. पैशासाठी ते सातत्याने पंचायत समितीकडे खेटे घालत आहेत. मात्र वरूनच तोडगा निघाला नसल्याचे उत्तरे त्यांना मिळत आहे.

वास्तविक गेल्या दोन महिन्यांपासून बिलांचा प्रश्न थकलेला असताना वरिष्ठ प्रशासनानेही त्यावर ठोस उपाययोजना करणे अथवा पर्याय काढणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी उदासीन भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. याबाबत पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख यंत्रणांकडे प्रत्यक्ष पाठपुरावा केला आहे. त्यांनाही हीच तांत्रिक अडचण सांगून बिलांचा प्रश्न तसाच रेंगाळत ठेवण्यात आला आहे. एवढी किरकोळ बाब अधिकाऱ्यांनादेखील सोडवता येत नसल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त केले जात असून, आता ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे .

निधी परत जाण्याची भीती

तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील १६ अंगणवाड्यांची बांधकामेदेखील पंचायत समितीकडून हाती घेण्यात आली होती. त्यांची बांधकामे संबंधितांनी युध्दपातळीवर पूर्ण केली आहेत. थकलेल्या बिलांमध्ये या बिलांचाही समावेश आहे. साधारण १४ लाख रुपयांची बिले आहेत. मार्च एंडिंगची कामे होती. शिवाय मार्च एंडिंगच्या आधी कामांचा निधी खर्च केला नाही, तर तो परत जात असतो, असा शासनाचा नियम आहे. त्यामुळे ही बिले अदा झाली नाहीत, तर सरळ परत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. साहजिकच त्यांच्या कामावरदेखील पाणी फिरले जाण्याची भीती आहे. तेव्हा ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहीचा किरकोळ मुद्दा लटकत न ठेवता कायमस्वरूपी ठोस मार्ग काढावा, अशी मागणी आहे.

पंचायत समितीच्या मृत गटविकास अधिकारी यांच्या सहीच्या तांत्रिक अडचणीमुळे साडेचार ते पाच कोटींची बिले थकली आहेत. कामे पूर्णही करण्यात आली आहेत. परंतु बिले न मिळाल्याने सर्वांनाच अडचणी निर्माण झाल्या आहेत. निधी खर्च झाला नाही तर परत शासनदरबारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने यावर तोडगा काढून मार्ग काढावा .

- यशवंत ठाकरे, सभापती, पंचायत समिती, तळोदा.

मार्च एंडिंगची सर्व बिले पेंडिंग आहेत. याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे. सहीचा प्रश्न निर्माण झाला असल्याने ही बिले अदा करता येत नाहीत.

- आर. बी. सोनवणे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, तळोदा