शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

नवापूर बसस्थानकात पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST

बसस्थानकात रविवारी ५९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चार दिवसात रॅपिड टेस्टिंगमध्ये ३५ ...

बसस्थानकात रविवारी ५९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चार दिवसात रॅपिड टेस्टिंगमध्ये ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, तर आरटीपीसीआर तपासणीत ९० रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १२५ झाली आहे.

धोकादायक म्हणजे बसस्थानकातील शिव भोजनालयातील तीन कर्मचारी, तर दोन दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शाळा सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थी बसने नवापूर शहरात शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या रुग्णांना लक्षणे होती, त्यांना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यांना लक्षणे नाहीत, अशांना घरीच विलगीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत वसावे यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने तपासणीसाठी येणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यात नागरिक अँटिजेनऐवजी प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर तपासणीला प्राधान्य देतात. मात्र, स्वॅब तपासणीचा अहवाल २४ ते ३० तासांनी मिळतो. त्यामुळे उपचारांत अडथळे येत असल्याने रुग्णांची प्रकृती बिघडत असल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय, कोरोना नसलेल्या मात्र, अन्य आजारांच्या रुग्णांनाही तपासणीशिवाय उपचार मिळत नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे स्वॅब तपासून त्याचा अहवाल कमीत कमी वेळेत देण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अवघ्या पाच मिनिटांतच कोरोना व्हायरसचे निदान होऊ शकते.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी कोरोना व्हायरससाठी रॅपिड टेस्टिंग टेक्नॉलॉजी तयार केली आहे. ज्यामुळे एखाद्या व्यक्तिला कोरोना व्हायरस आहे की नाही, हे फक्त पाच मिनिटांत समजते. नागरिकांना काही त्रास होत असेल तर नि:शुल्क कोरोना तपासणी करू घ्या, असे आवाहन तहसीलदार मंदार कुलकुर्णी यांनी केले आहे.