शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

अखेर आंबेबारा धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला 30 टक्के पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे शहरवासीयांची पाण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराला 30 टक्के पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे शहरवासीयांची पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. याशिवाय 70 टक्के पाणीपुरवठाची मदार असणा:या विरचक प्रकल्पात ज्या डॅमच्या सांडव्यामधून पाणी येते ते खोलघर धरण देखील ओसंडून वाहू लागले आहे. परिणामी विरचकमधील पाणीसाठा 14 टक्केपेक्षा अधीक झाला आहे.नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण गेल्यावर्षी 80 टक्के तर विरचक प्रकल्प केवळ 29 टक्के भरला होता. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळा लांबल्याने जून महिन्यात शहरवासीयांना काही प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. यंदाच्या दुष्काळात राज्यात सर्वत्र टंचाई असतांना अनेक ठिकाणी दोन ते आठ दिवसात पाणी पुरवठा होत असतांना नंदुरबार पालिकेने नियोजन करून नियमित एक दिवसाआड एकवेळ पाणी पुरवठा सुरू ठेवला होता. यंदा जुलैच्या शेवटच्या आठवडय़ार्पयत पुरेसा पाऊस नव्हता. आंबेबारा धरण तर एप्रिल महिन्यातच कोरडे झाले होते. विरचकमध्येही केवळ डेड स्टॉक शिल्लक होता. परिणामी 1 ऑगस्टपासून नंदुरबारात दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे जाहीर करण्यात आले होते. सुदैवाने जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात दमदार पाऊस झाला. विरचक आणि आंबेबारामध्ये पाणी येऊ लागल्याने हा निर्णय लागलीच रद्द करण्यात आला. आंबेबारा भरले..आंबेबारा धरण गेल्या वर्षी पुर्ण क्षमतेने भरले नव्हते. जवळपास 10 ते 12 वर्षानंतर अशी परिस्थिती होती. परिणामी हे धरण एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात कोरडे झाले. येथून होणारा पाणी पुरवठा देखील तेंव्हापासून बंद झाला होता. त्यामुळे विरचक प्रकल्पावर संपुर्ण 100 टक्के पाणी पुरवठय़ाचा ताण पडत होता. यामुळे वारंवार पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक विस्कळीत होत होते. आताच्या दमदार पावसामुळे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणातील पाणी शिवण नदीद्वारे विरचक प्रकल्पात येत आहे. लवकरच आष्टे पंपींग स्टेशनवरूनही पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे.खोलघर धरणही ओसंडले..शिवण नदीचा जलप्रवाह ज्या धरणावर अवलंबून आहे ते नवापूर तालुक्यातील खोलघर धरण देखील भरून वाहू लागले आहे. यामुळे आंबेबारा आणि खोलघर धरणातील ओसंडणा:या पाण्याचा प्रवाह शिवण नदीत येत असल्यामुळे विरचक प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सद्य स्थितीत विरचक प्रकल्पात 14 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा झाला आहे. आणखी 10 टक्के पाणीसाठा झाला तर संपुर्ण वर्षभराची पाण्याची चिंता मिटणार आहे.