शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

अखेर आंबेबारा धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला 30 टक्के पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे शहरवासीयांची पाण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराला 30 टक्के पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे शहरवासीयांची पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. याशिवाय 70 टक्के पाणीपुरवठाची मदार असणा:या विरचक प्रकल्पात ज्या डॅमच्या सांडव्यामधून पाणी येते ते खोलघर धरण देखील ओसंडून वाहू लागले आहे. परिणामी विरचकमधील पाणीसाठा 14 टक्केपेक्षा अधीक झाला आहे.नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण गेल्यावर्षी 80 टक्के तर विरचक प्रकल्प केवळ 29 टक्के भरला होता. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळा लांबल्याने जून महिन्यात शहरवासीयांना काही प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. यंदाच्या दुष्काळात राज्यात सर्वत्र टंचाई असतांना अनेक ठिकाणी दोन ते आठ दिवसात पाणी पुरवठा होत असतांना नंदुरबार पालिकेने नियोजन करून नियमित एक दिवसाआड एकवेळ पाणी पुरवठा सुरू ठेवला होता. यंदा जुलैच्या शेवटच्या आठवडय़ार्पयत पुरेसा पाऊस नव्हता. आंबेबारा धरण तर एप्रिल महिन्यातच कोरडे झाले होते. विरचकमध्येही केवळ डेड स्टॉक शिल्लक होता. परिणामी 1 ऑगस्टपासून नंदुरबारात दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे जाहीर करण्यात आले होते. सुदैवाने जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात दमदार पाऊस झाला. विरचक आणि आंबेबारामध्ये पाणी येऊ लागल्याने हा निर्णय लागलीच रद्द करण्यात आला. आंबेबारा भरले..आंबेबारा धरण गेल्या वर्षी पुर्ण क्षमतेने भरले नव्हते. जवळपास 10 ते 12 वर्षानंतर अशी परिस्थिती होती. परिणामी हे धरण एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात कोरडे झाले. येथून होणारा पाणी पुरवठा देखील तेंव्हापासून बंद झाला होता. त्यामुळे विरचक प्रकल्पावर संपुर्ण 100 टक्के पाणी पुरवठय़ाचा ताण पडत होता. यामुळे वारंवार पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक विस्कळीत होत होते. आताच्या दमदार पावसामुळे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणातील पाणी शिवण नदीद्वारे विरचक प्रकल्पात येत आहे. लवकरच आष्टे पंपींग स्टेशनवरूनही पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे.खोलघर धरणही ओसंडले..शिवण नदीचा जलप्रवाह ज्या धरणावर अवलंबून आहे ते नवापूर तालुक्यातील खोलघर धरण देखील भरून वाहू लागले आहे. यामुळे आंबेबारा आणि खोलघर धरणातील ओसंडणा:या पाण्याचा प्रवाह शिवण नदीत येत असल्यामुळे विरचक प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सद्य स्थितीत विरचक प्रकल्पात 14 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा झाला आहे. आणखी 10 टक्के पाणीसाठा झाला तर संपुर्ण वर्षभराची पाण्याची चिंता मिटणार आहे.