शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

अखेर 17 वर्षानंतर ‘पेप्सी’ पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 17 वर्षापूर्वी नंदुरबार झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील  मुख्य संशयीतास राजस्थानमधून ताब्यात घेण्यास स्थानिक गुन्हा अन्वेशन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 17 वर्षापूर्वी नंदुरबार झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील  मुख्य संशयीतास राजस्थानमधून ताब्यात घेण्यास स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला यश मिळाले. पेप्सी उर्फ किशोरसिंह बालावत (36) रा.अजित, ता.शिवना, जि.बाडमेर असे संशयीताचे नाव  आहे. नंदुरबारातील वेडू गोविंदनगरमध्ये 1 जून 2003 रोजी ही घटना घडली होती. अॅड.अनिल लोढा यांचे बंधू व व्यापारी पारस  लोढा यांच्याकडे पुष्पेंद्रसिंह उर्फ पेप्सी भवरसिंह उर्फ किशोरसिंह बालावत याच्यासह इतर दोघांनी किराणा दुकानातील मजुरीच्या पैशांतून वाद घालून मारहाण  करीत ठार केले होते. याबाबत  नंदुरबार शहर पोलिसात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यापासून तिन्ही संशयीत आरोपी फरार होते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी फरार गुन्हेगारांची शोध मोहिम घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे वरिष्ठ निरिक्षक किशोर नवले यांनी 15 वर्षापूर्वीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींवर लक्ष केंद्रीत केले. त्यानुसार लोढा यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयीतांविषयी त्यांना गुप्त माहिती मिळाली. संशयीतापैकी पेप्सी हा बाडमेर जिल्ह्यात त्याच्या राहत्या गावी आला असल्याची माहिती नवले यांना मिळाल्यावर त्यांनी लागलीच पथक तयार करून रवाना केले. परंतु 1100 किलोमिटर लांब, राजस्थानमधील विरळ वस्तींचे गावे आणि भाषा व वेश याची अडचण यामुळे मोहिम फत्ते होईल किंवा कसे याची शंका मनात असतांना त्यांनी पथकाचे मनोधैर्य वाढवून रवाना केले. पथक बाडमेर जिल्ह्यातील समदडी येथे पोहचल्यावर स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. राजस्थानी पेहराव करून संशयीत राहत असलेल्या अजित या गावाची आणि परिसराची बारकाईने माहिती घेत निरिक्षण केले. गावात जाण्याचा आणि गावातून बाहेर येण्याचा मार्ग समजून घेतला. त्यानुसार 6 नोव्हेंबरची रात्र आणि 7 नोव्हेंबरची उत्तर रात्र या दरम्यान अचानक धाड टाकण्याचे ठरविण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या            मदतीने पथक गावात पोहचल्यावर अचानक वादळ सुरू झाले. परिणामी काही काळ मोहिम थांबवावी लागली. या दरम्यान पथक निरिक्षिक किशोर नवले यांच्या संपर्कात होते. ते वेळोवेळी पथकाचे मनोधैर्य वाढवीत होते. वादळ शांत झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे पथकाने पेप्सीच्या घरावर धाड टाकत त्याला ताब्यात घेतले. 17 वर्षापूर्वी घडलेल्या गुन्ह्यातील संशयीताचे कुठलेही छायाचित्र किंवा स्केच पोलिसांकडे नव्हते. संशयीतांची काहीही माहिती नव्हती. शिवाय एवढय़ा दूर असलेल्या गावात जावून संशयीताचा ताब्यात घेण्याचे दिव्य देखील होतेच. परंतु या सर्वावर मात करून एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांनी पथकाला तयार केले. त्यांना बारीकसारीक बाबी समजून सांगितल्या. येणारी संकटे आणि अडचणी यांची जाणीव करून देत मनोधैर्य वाढविल्याने ही मोहिम फत्ते झाल्याचे पथकातील सदस्यांनी सांगितले. 7 रोजी सकाळी पथक संशयीत पेप्सी उर्फ किशोरसिंह बालावत याला घेवून नंदुरबारकडे निघाले. या सर्व मोहिमेत पथकाला समदडी पोलीस ठाण्याचे निरिक्षक मिळुराम मिना व त्यांच्या पथकाचे मोठे सहकार्य मिळाले.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, फौजदार भगवान कोळी, हवालदार प्रदीप राजपूत, किरण पवार, मोहन          ढमढेरे, जितेंद्र ठाकूर यांच्या पथकाने केली.