शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

गट,गण रचनेचा आराखडा अंतिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 11:46 IST

20 ऑगस्टला जाहीर होणार : 27 ऑगस्टला आरक्षण सोडत, वाढीव गटाकडे लक्ष

नंदुरबार : जिल्हा परिषदेचा नवापूर तालुक्यात वाढलेला गट कोणता राहतो याकडे लक्ष लागून आहे. प्रारूप गट, गण रणचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे. त्यावर 20 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त शिक्कामोर्तब करणार आहेत. प्रारूप आराखडा व गट, गणांचे आरक्षण याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर राजकीय पक्षांमध्ये सामसूम असल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रशासकीय स्तरावर सुरूवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाने प्रारूप गट, गण रचनेचा आराखडा प्राथमिक स्तरावर पुर्ण केला आहे. त्याचा अहवाल सोमवारी विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, यंदा एक गट वाढणार असल्यामुळे हा गट कुठल्या तालुक्यात राहील याकडे आता लक्ष लागून आहे.56 गट व 112 गणांची रचनाप्रशासनाने प्राथमिक स्वरूपात 56 गट व 112 गणांची प्रारूप रचना तयार केली आहे. गेल्या पंचवार्षीकला 55 गट व 110 गण होते. यंदा गेल्या पंचवार्षीकच्या तुलनेत गणांची संख्या अक्कलकुवा व नंदुरबार वगळता सर्वच तालुक्यात कमी, जास्त झाली आहे.अक्कलकुवा तालुक्यात गेल्या पंचवार्षीकला 10 गट व 20 गण होते. यंदा गणांची व गटाचीही संख्या तेवढीच राहणार आहे.  धडगाव तालुक्यात गेल्या पंचवार्षीकला    आठ गट व 16 गण होते. यंदा सात   गट व 14 गण राहणार आहेत.    तळोदा तालुक्यात गेल्यावर्षी पाच  गट व 10 गण होते यंदा गट व   गणांची संख्या तेवढीच राहणार   आहे. शहादा तालुक्यात गेल्यावर्षी 13 गट व 26 गण होते यंदा 14 गट व 28 गण राहणार आहेत. नंदुरबार तालुक्यात गेल्यावर्षी दहा गट व 20 गण होते यंदा तेवढेच राहणार आहे तर नवापूर तालुक्यात गेल्यावर्षी नऊ गट व 18 गण होते यंदा 10 गट व 20 गण राहणार आहेत. प्रारूप अहवाल तयारजिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितींच्या निवडणुकीची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे.  त्यानुसार 10 ऑगस्टर्पयत विभागीय आयुक्तांकडे प्रारूप गट-गण रचनेचा प्रस्ताव पाठविण्यात येणार होता. परंतु कर्मचा:यांचा संप,   मराठा आंदोलन आणि इतर कारणांमुळे प्रस्ताव 10 ऐवजी आता सोमवार, 13 ऑगस्ट रोजी  विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे. या प्रस्तावाला विभागीय आयुक्त 20 ऑगस्ट रोजी मान्यता देणार आहेत. त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी गट, गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. 30 रोजी प्रभाग रचनेची अधिसुचना प्रसिद्ध केली जाणार  आहे.गट, गण रचनेसाठी गेल्या 15 दिवसांपासून संबधित कर्मचारी कामाला लागले होते. आता त्याला अंतिम स्वरूप दिले जात आहे. कुठला गट किंवा गण कसा राहील याकडे इच्छूक आणि राजकारणी मंडळींच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, गट-गण रचनेचा मसुदा गोपनीय राहणार असून विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतरच तो जाहीर केला जाणार आहे.