शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

दुष्काळी गावांवर अन्यायाची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 11:19 IST

सरसकट जाहीर केल्याने नाराजी : शहादा तालुका व नंदुरबारचा पुर्व भाग दुष्काळी

ठळक मुद्दे आणेवारीसाठी समितीचे गठण व्हावे.. पीक आणेवारी ठरविण्याबाबत महसूल व कृषी विभाग एकमेकांवर चालढकल करत असल्याचे प्रकार वारंवार निदर्शनास येतात. वास्तविक शासन निर्णयानुसार पैसेवारी ठरविण्याची आदर्श पद्धत आहे. त्यासाठी गाव स्तरावर एक समिती असते. समितीत तलाठी, ग

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नजर आणेवारी जिल्हाभरात सरसकट 50 पैशांपेक्षा अधीक लागू केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात तसेच संपुर्ण शहादा तालुक्यातील पीक परिस्थिती अतिशय खराब आहे. शहादा तालुक्यात तर सरासरीचा 30 टक्के पाऊस कमी आहे. असे सर्व असतांना केवळ अंदाजाने आणेवारी जाहीर करून शेतक:यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतक:यांमधून उमटत आहेत.   जिल्हा प्रशासनाने नुकतीच पीक नजर आणेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील सर्वच महसूल गावांमधील आणेवारी ही 50 पैशांपेक्षा अधीक असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे एकही गाव दुष्काळ किंवा अवर्षणग्रस्त राहणार नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. वास्तविक नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग आणि शहादा तालुक्यातील बहुतांश भागात पीक परिस्थिती अत्यंत खराब असतांना ही आणेवारी कुठल्या आधारावर तयार करण्यात आली असा प्रश्न निर्माण होत आहे.दुबार पेरणीशहादा तालुक्यातील अनेक भागात तसेच नंदुरबार व नवापूर तालुक्यातील ब:याच भागात पेरणीनंतर पावसाने ताण दिल्यावर दुबार पेरणी करण्याचे संकट शेतक:यांवर आले होते. त्या संकटातून शेतकरी थोडेफार सावरले होते. परंतु यंदा वरुणराजाने शहादा तालुक्यावर अवकृपा कायम ठेवल्याचे चित्र आहेच. त्यामुळे अनेक भागातील पीक परिस्थिती जेमतेम असतांना व यंदा उत्पादकता कमी येणार हे स्पष्ट असतांना कुठलाही सव्र्हे न करता सरसकट 50 पैशांपेक्षा अधीक आणेवारी जाहीर करून प्रशासनाने काय साध्य केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग तर नेहमीच अवर्षणप्रवण राहीला आहे. यंदा देखील या भागात कमी पजर्न्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे पीक परिस्थिती फारशी समाधानकारक नसल्याचे चित्र आहे.शहादा : 30 टक्के तूटशहादा तालुक्यात पावसाची यंदा 30 टक्के तूट आहे. एकुण सरासरीचा केवळ 68 टक्के पाऊस या तालुक्यात झालेला आहे. आता पावसाळा संपण्यास केवळ 15 दिवस शिल्लक असल्यामुळे सरासरी भरून  काढण्याबाबत साशंकता असल्यामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शहादा तालुक्यात पावसाची तूट राहणार आहे. शहादा तालुक्याचे एकुण सरासरी पजर्न्यमान 686.10 मिलीमिटर इतके आहे. आतार्पयत अर्थात पावसाळ्याच्या साडेतीन महिन्यात केवळ 466 मि.मी.पाऊस पडलेला आहे. गेल्यावर्षी याच तारखेर्पयत 522 मि.मी.पाऊस पडला होता.अंतिम आणेवारीत विचार व्हावाअंतिम पीक आणेवारी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात जाहीर करण्यात येते. त्यावेळी तरी किमान शास्त्रीय आणि प्रचलित पद्धतीने आणेवारी काढून ती जाहीर करावी व शेतक:यांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी होत आहे. याबाबत स्वत: जिल्हाधिका:यांनीच दखल घ्यावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी 150 गावेगेल्यावर्षी देखील वरूणराजाने संपुर्ण शहादा तालुका आणि नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागावर अवकृपा केली होती. त्यामुळे शहादा तालुक्यातील 135 गावे आणि नंदुरबार तालुक्यातील 15 गावांमधील आणेवारी 50 पैशांच्या आत लागू झाली होती. परिणामी ही गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली होती. त्याचा लाभ शेतक:यांना मिळाला होता. यावर्षी देखील याच भागावर वरुणराजाने अवकृपा केलेली आहे. त्यामुळे गेल्यावर्षाप्रमाणे निर्णय घ्यावा अशी मागणी शेतक:यांमधून व्यक्त होत आहे.