शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

अक्कलकुवा तालुक्यात हिंस्र प्राण्यांचा संचार वाढल्याने जीवित हानीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST

अक्कलकुवा तालुक्यामध्ये अक्कलकुवा, खापर, मोलगी, काठी, वडफळी ही पाच वनक्षेत्रे असून केवळ अक्कलकुवा या वनक्षेत्रातील काही भाग शहरी भागात ...

अक्कलकुवा तालुक्यामध्ये अक्कलकुवा, खापर, मोलगी, काठी, वडफळी ही पाच वनक्षेत्रे असून केवळ अक्कलकुवा या वनक्षेत्रातील काही भाग शहरी भागात मोडत असून तालुक्‍यातील सर्वच वनक्षेत्रांचा भाग हा सातपुड्याच्या वन क्षेत्रांमध्ये समाविष्ट आहे. या वनक्षेत्रांमध्ये वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार अलीकडच्या काही वर्षांमध्ये वाढला आहे. पावसाळा सुरू झाला असल्याने सातपुड्यात जिकडे-तिकडे हिरवेगार झाल्यामुळे वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार अधिक वाढला आहे. गेल्या आठवड्यात सातपुड्यातील डाब गावाच्या परिसरात भर दिवसा दोन अस्वले मुक्तपणे संचार करत असल्याचे दृश्य आढळले होते. या परिसरात शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी या अस्वलांना आरडाओरडा करून पळवून लावले होते. मात्र या वन्यप्राण्यांच्या मुक्तसंचारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील पाचही वनक्षेत्रांमध्ये अस्वलांसह इतर हिंस्र प्राण्यांचा मुक्तसंचार अलीकडच्या काळात अधिक वाढल्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनक्षेत्रामध्ये असलेला वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार तसेच हिंस्र तसेच उपद्रवी प्राण्यांच्या संचाराबाबत वनक्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी नागरिकांना माहिती देण्याची व सावध करण्याची गरज असताना, या वनक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी वनक्षेत्रामध्ये आपल्या सोयीच्या वेळेनुसार केवळ नावापुरती हजेरी लावून आपले कर्तव्य पार पाडत असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नाहक वेळोवेळी जीव गमवावा लागला असून अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. पावसाळ्यात या वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे तसेच जंगल वाढत असल्यामुळे या वनक्षेत्रामध्ये प्राण्यांसह उपद्रवी प्राण्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर मुक्तसंचार सुरू होतो. या प्राण्यांची वेळोवेळी माहिती मिळवणे व परिसरातील नागरिकांना वन्यप्राण्यांना याबाबत माहिती देऊन त्यापासून सुरक्षिततेचे उपाय करणे याबाबत वन अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शन होणे आवश्यक असताना, ते होताना दिसत नसल्यामुळे या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांना नाहक बळी पडावे लागते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील लक्ष देण्याची गरज आहे. तालुक्यातील वनक्षेत्रांमध्ये आजही वनांची कत्तल केली जात असताना तालुक्यात वन अधिकाऱ्यांमार्फत योग्य कारवाई होताना दिसत नाही. तालुक्यामध्ये लाकूड तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असताना देखील याबाबत संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाभारतातील धृतराष्ट्राची भूमिका घेतली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी त्यांना मोबदला तर मिळत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील काही वनक्षेत्र अधिकारी कारवाई करतात, मात्र ती कारवाई गुलदस्त्यातच असते. केलेल्या कारवाईबाबत संबंधित वनक्षेत्र अधिकारी माहिती देण्यासाठी टाळाटाळ करीत असून कारवाईची माहिती लपवण्यासाठी अधिक कटाक्ष बाळगत असल्यामुळे तालुक्यातील वनक्षेत्राच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.