शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धरण फुटल्याच्या अफवेने नवापूरात भितीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 13:43 IST

नवापूरातील महाप्रलय : मदत व पुनर्वसनावर भर, पाचव्या मृतदेहाची ओळख पटेना

नवापूर : अतिवृष्टीच्या प्रलयानंतर आता मदतकार्य आणि पुनर्वसनावर प्रशासनातर्फे भर देण्यात येत आहे. पाणी ओसरल्याने आणि पावसानेही उसंत घेतल्याने नागरिकांना धिर आला आहे. रंगावली धरण फुटल्याची अफवा रात्रीपासून पसरली, परंतु अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिका:यांनी केले. बंधारे येथील बेवारसची ओळख पटलेली नाही.रंगावली व सिरपणी नदीच्या महापुरानंतर आता जनजिवन पुर्वपदावर येत आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना उभे करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर भर दिला आहे. जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी दिवसभर ठाण मांडून होते. मतदीचा ओघ सुरूरंगावली नदीच्या महापुरात नुकसान झालेल्या नागरिकांसाठी शहरातून व शहराबाहेरून मदतीचा ओघ सुरू आहे. पालिकेकडून सफाई अभियानाला वेग देण्यात आला. राजीवनगरातील आठ घरे व भगतवाडी पुलफळी येथील 68 घरे वाहून गेली. त्या 76 कुटूंबांसाठी हनुमानवाडीचे सभागृह व पालिकेचे बहुउद्देशीय भवनात राहण्याची व जेवनाची सोय करण्यात आली आहे. राजीवनगर, भगतवाडी व महादेवगल्ली येथे स्वयंपाकाची सोय सामाजिक कार्यकत्र्याकडून करण्यात आली. त्यासाठी शेकडो स्वयंसेवक महिला, पुरुष राबत आहेत.  सोमवारी आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. हनुमानवाडीत त्यासाठी सोय करण्यात आली आहे. वाहतूक धिम्या गतीनेविसरवाडी ते दहिवेल दरम्यान रस्त्याचा खचलेल्या भरावाच्या ठिकाणी शनिवारी सायंकाळर्पयत काम सुरू होते. परिणामी जड वाहने आणि एस.टी.महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेस या नंदुरबार, निजामपूर, साक्रीमार्गे वळविण्यात आल्या होत्या.नवापूर : रंगावली धरणास जिल्हाधिका:यांनी शनिवारी सकाळी भेट देवून पहाणी केली. शिवाय पाणी पाझरत असलेल्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती केली. दरम्यान, कुकराण येथील साठवण बंधा:याचा खचलेला भराव युद्धपातळीवर पूर्ववत करण्यात आला.रंगावली धरणाच्या मुख्य भिंतीला मोठे भगदाड पडले असून धरण फुटेल अशी अफवा शुक्रवारी रात्रीपासून पसरली होती. काहींनी नदीकिणारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचाही सल्ला दिला होता. या अफवेची खातरजमा करण्यासाठी अनेकांनी धरणाच्या ठिकाणी धाव घेतली. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी सकाळी तातडीने धरणस्थळी भेट दिली. सोबत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार राजेंद्र नजन, पोलीस निरिक्षक विजयसिंह राजपूत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. धरणाच्या मुख्य दरवाजापासून पाच मिटर अंतरावर एका ठिकाणी पाणी पाझरत असल्याचे अधिका:यांना दिसून आले. तेथे पहाणी केली असता पाझरणारे पाण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे स्पष्ट झाले. त्या ठिकाणी तातडीने दगड व मातीची पिचिंग करण्यात आली. हे काम होईर्पयत स्वत: जिल्हाधिकारी तेथे थांबून होते. धरणाला कुठलाही धोका नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सद्य स्थितीत रंगावली धरण पुर्णपणे भरले असून सांडव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. दरम्यान, कुकराण येथे जिल्हा परिषदेच्या साठवण बंधा:याची सांडव्याकडील मुख्य बाजुचा मातीचा भराव मोठय़ा प्रमाणात वाहून गेला होता. तहसीलदार राजेंद्र नजन यांनी प्रत्यक्ष भेट देवून पहाणी केली.  दुपारी भराव पूर्ववत करण्यात आला. सोनखडके व कोळदा येथील रहिवाशांनी यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकला.अतिवृष्टी व पुरामुळे वाहून गेलेले पूल व रस्ते कामांचे आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी दिल्या. दरम्यान, सोमवारपासून तीन ठिकाणी मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.तहसील कार्यालयात जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. सर्वच विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले, मेलेल्या जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. तालुक्यात जनावारांना लसीकरणाच्या मोहिमेला वेग द्यावा. ज्या ठिकाणी विद्युत पोल, रोहित्र खराब झाले आहेत, तारा तुटल्या आहेत त्या ठिकाणी तातडीने दुरूस्तीच्या कामांना वेग देवून वीज पुरवठा सुरळीत करण्याचेही त्यांनी सांगितले. पिकांचे नुकसानीचे पंचनामे पुर्ण करावे. बोकळझर येथील वाहून गेलेल्या बंधा:याची पुनर्रबांधणी करण्यासाठी लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सोमवारपासू पालिका, तहसील व गटविकास अधिकारी कार्यालयात त्या त्या विभागांचे मदत केंद्र सुरू करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.