शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याच्या अपूर्ण कामामुळे पिकांच्या नुकसानीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील भागापूर शिवारातील सुखनाई नदीवर बांधण्यात येणाऱ्या केटीवेअर बंधाºयाचे काम अपूर्ण असल्याने पुराचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील भागापूर शिवारातील सुखनाई नदीवर बांधण्यात येणाऱ्या केटीवेअर बंधाºयाचे काम अपूर्ण असल्याने पुराचे पाणी शेतात शिरुन नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. बंधाºयाच्या कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आल्याने मातीचा भराव झाला असून संबंधित विभागाने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातून वाहणारी सुखनाई नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. या नदीवर नादुरुस्त कोल्हापुरी बंधारा असल्याने पावसाचे पाणी वाहूून जात होते. त्यामुळे या पाण्याचा शेतकºयांना उपयोग होत नाही. या अनुषंगाने शासनाकडून सुखनाई नदीवर केटीवेअर बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बंधारा बांधकामासाठी नदीत मोठा खड्डाही खोदण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामे बंद झाल्याने हे कामही बंद पडले. परंतु सध्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणून बांधकामे सुरू झाली आहेत. त्यामुळे या बंधाºयाच्या कामालाही सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र हे काम बंदच आहे.बंधाºयासाठी खोदकामातून निघालेली माती नदीत पडून असल्याने पुराचे पाणी शेतात जाऊन पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. या बंधाºयाचे काम त्वरित सुरू करावे यासाठी शेतकºयांनी वारंवार संबंधित ठेकेदार व अधिकाºयांना सांगितले. परंतु त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतात शिरुन होणाºया नुकसानीला जबाबदार कोण राहील? असा प्रश्नही शेतकºयांकडून उपस्थित होत आहे. या बंधाºयाच्या बांधकामानजीक अंबालाल पाटील, काशीनाथ पाटील, छायाबाई पाटील, सुरेखाबाई पाटील, दिनेश पाटील, रमेश पाटील, सरलाबाई पाटील, उमेश पाटील, प्रल्हाद पाटील, रेखाबाई पाटील यांच्या मालकीचे शेत असून पुराचे पाणी शेतात शिरुन मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबधित विभागाच्या अधिकाºयांनी या समस्येकडे लक्ष घालून उपाययोजना करून शेतपिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळावे, अशी मागणी या बंधाºयाच्या कामालगत शेती असलेल्या शेतकºयांकडून होत आहे.

सुखनाई नदीत सुरू असलेले बंधाऱ्याचे काम गेल्या पाच महिन्यापासून बंद ठेवण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाला असून नदीला पूर आला तर मातीच्या ढीगामुळे पाणी शेतात वळेल व पिकांचे नुकसान होऊ शकते. संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर बंधाऱ्यांचे काम सुरू करावे.-अंबालाल काशीनाथ पाटील, शेतकरी, ब्राह्मणपुरी (भागापूर शिवार).