शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

बंधाऱ्याच्या अपूर्ण कामामुळे पिकांच्या नुकसानीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील भागापूर शिवारातील सुखनाई नदीवर बांधण्यात येणाऱ्या केटीवेअर बंधाºयाचे काम अपूर्ण असल्याने पुराचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील भागापूर शिवारातील सुखनाई नदीवर बांधण्यात येणाऱ्या केटीवेअर बंधाºयाचे काम अपूर्ण असल्याने पुराचे पाणी शेतात शिरुन नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. बंधाºयाच्या कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आल्याने मातीचा भराव झाला असून संबंधित विभागाने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातून वाहणारी सुखनाई नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. या नदीवर नादुरुस्त कोल्हापुरी बंधारा असल्याने पावसाचे पाणी वाहूून जात होते. त्यामुळे या पाण्याचा शेतकºयांना उपयोग होत नाही. या अनुषंगाने शासनाकडून सुखनाई नदीवर केटीवेअर बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बंधारा बांधकामासाठी नदीत मोठा खड्डाही खोदण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामे बंद झाल्याने हे कामही बंद पडले. परंतु सध्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणून बांधकामे सुरू झाली आहेत. त्यामुळे या बंधाºयाच्या कामालाही सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र हे काम बंदच आहे.बंधाºयासाठी खोदकामातून निघालेली माती नदीत पडून असल्याने पुराचे पाणी शेतात जाऊन पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. या बंधाºयाचे काम त्वरित सुरू करावे यासाठी शेतकºयांनी वारंवार संबंधित ठेकेदार व अधिकाºयांना सांगितले. परंतु त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतात शिरुन होणाºया नुकसानीला जबाबदार कोण राहील? असा प्रश्नही शेतकºयांकडून उपस्थित होत आहे. या बंधाºयाच्या बांधकामानजीक अंबालाल पाटील, काशीनाथ पाटील, छायाबाई पाटील, सुरेखाबाई पाटील, दिनेश पाटील, रमेश पाटील, सरलाबाई पाटील, उमेश पाटील, प्रल्हाद पाटील, रेखाबाई पाटील यांच्या मालकीचे शेत असून पुराचे पाणी शेतात शिरुन मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबधित विभागाच्या अधिकाºयांनी या समस्येकडे लक्ष घालून उपाययोजना करून शेतपिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळावे, अशी मागणी या बंधाºयाच्या कामालगत शेती असलेल्या शेतकºयांकडून होत आहे.

सुखनाई नदीत सुरू असलेले बंधाऱ्याचे काम गेल्या पाच महिन्यापासून बंद ठेवण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाला असून नदीला पूर आला तर मातीच्या ढीगामुळे पाणी शेतात वळेल व पिकांचे नुकसान होऊ शकते. संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर बंधाऱ्यांचे काम सुरू करावे.-अंबालाल काशीनाथ पाटील, शेतकरी, ब्राह्मणपुरी (भागापूर शिवार).