शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

पाऊस हुलकावणी देत निघून जात असल्याने शेतकरी चिंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

शेतकरी या हंगामात चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असताना यंदा ही पावसाने पाहीजे तशी या परिसरात साथ दिली नाही. मृग बेभरवशाचा ...

शेतकरी या हंगामात चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असताना यंदा ही पावसाने पाहीजे तशी या परिसरात साथ दिली नाही. मृग बेभरवशाचा गेल्याने शेतकऱ्यांची मदार आद्र नक्षत्रावर होती. मात्र, या नक्षत्रात दमदार पाऊस आला नाही. त्यानंतर सूर्याचा पुनर्वसू नक्षत्राचे वाहन उंदीर असल्याने पाऊस पडेल, अशी आशा होती. मात्र, या तिन्ही नक्षत्रात पाऊस बरसला नाही. त्यामुळे दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. सोमवारपासून सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश झाला आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा असून, या घोड्यावर शेतकऱ्यांची मदार आहे. घोडा जर जोरात धावला नाही तर शेतकऱ्यांना उत्पन्नाचा जबर फटका बसल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र नक्कीच.

कमी पाऊसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.

महागडे बियाणे व खते वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. कापसाची मोड करून त्या जागेवर सोयाबीनची पेरणी केली. परंतु कमी पाऊसामुळे उगवन क्षमता नसल्याने सोयाबीन पीकही मोडणीवर आले आहे. मे-जूनमध्ये कापसाची लागवड केली होती. ही पिके डौलदार असल्याने पीक शेतकऱ्यांना खुणावत आहे. परंतु समाधानकारक पाऊस पडत नसल्याने पुढे हे पीक टिकेल की नाही याचा भरवसा नाही, पाऊस दमदार आला नसल्याने नाले भरून गेले नाहीत, जमीन ओलीत असल्यासारखा पाऊस असल्याने कापसाचे पीक बहरलीत, मात्र पिकांना बहर, फुले, फळे येण्याकरिता जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता पुष्य नक्षत्रावर शेतकऱ्यांचा भरोसा असून, या नक्षत्रात दमदार पाऊस आल्यास शेतातील पिके वाचतील, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.

दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

तापी, गोमाई काठासह परिसरात जून व जुलै महिना संपण्यात आला तरी अजून दमदार पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले कापूस, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिके मोड आलेली आहेत, दुबार पेरणी करूनही पाऊस आलेला नाही. त्यामुळे तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवलेले आहे. मशागत, महागडे बियाणे, खते, कीटकनाशके यांचा खर्च वाया गेलेला आहे. त्यामुळे शासनाने नंदुरबार जिल्ह्यासह तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.