शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस हुलकावणी देत निघून जात असल्याने शेतकरी चिंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

शेतकरी या हंगामात चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असताना यंदा ही पावसाने पाहीजे तशी या परिसरात साथ दिली नाही. मृग बेभरवशाचा ...

शेतकरी या हंगामात चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असताना यंदा ही पावसाने पाहीजे तशी या परिसरात साथ दिली नाही. मृग बेभरवशाचा गेल्याने शेतकऱ्यांची मदार आद्र नक्षत्रावर होती. मात्र, या नक्षत्रात दमदार पाऊस आला नाही. त्यानंतर सूर्याचा पुनर्वसू नक्षत्राचे वाहन उंदीर असल्याने पाऊस पडेल, अशी आशा होती. मात्र, या तिन्ही नक्षत्रात पाऊस बरसला नाही. त्यामुळे दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. सोमवारपासून सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश झाला आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा असून, या घोड्यावर शेतकऱ्यांची मदार आहे. घोडा जर जोरात धावला नाही तर शेतकऱ्यांना उत्पन्नाचा जबर फटका बसल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र नक्कीच.

कमी पाऊसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.

महागडे बियाणे व खते वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. कापसाची मोड करून त्या जागेवर सोयाबीनची पेरणी केली. परंतु कमी पाऊसामुळे उगवन क्षमता नसल्याने सोयाबीन पीकही मोडणीवर आले आहे. मे-जूनमध्ये कापसाची लागवड केली होती. ही पिके डौलदार असल्याने पीक शेतकऱ्यांना खुणावत आहे. परंतु समाधानकारक पाऊस पडत नसल्याने पुढे हे पीक टिकेल की नाही याचा भरवसा नाही, पाऊस दमदार आला नसल्याने नाले भरून गेले नाहीत, जमीन ओलीत असल्यासारखा पाऊस असल्याने कापसाचे पीक बहरलीत, मात्र पिकांना बहर, फुले, फळे येण्याकरिता जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता पुष्य नक्षत्रावर शेतकऱ्यांचा भरोसा असून, या नक्षत्रात दमदार पाऊस आल्यास शेतातील पिके वाचतील, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.

दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

तापी, गोमाई काठासह परिसरात जून व जुलै महिना संपण्यात आला तरी अजून दमदार पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले कापूस, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिके मोड आलेली आहेत, दुबार पेरणी करूनही पाऊस आलेला नाही. त्यामुळे तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवलेले आहे. मशागत, महागडे बियाणे, खते, कीटकनाशके यांचा खर्च वाया गेलेला आहे. त्यामुळे शासनाने नंदुरबार जिल्ह्यासह तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.