शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

कृषी विभागाने लागवड केेलेल्या फळझाडांचे उत्पन्न घेणार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कृषी विभागाने गेल्या वर्षात जिल्ह्यातील ३६ महसुली मंडळात एक हजार ८०० हेक्टर क्षेत्रात फळझाडांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : कृषी विभागाने गेल्या वर्षात जिल्ह्यातील ३६ महसुली मंडळात एक हजार ८०० हेक्टर क्षेत्रात फळझाडांची लागवड केली होती. ही झाडे सुस्थितीत असून, त्यांची वाढही झाली आहे. कृषी विभागाने संगोपन करून वाढवलेल्या या झाडांची देखभाल यापुढेही कृषी विभाग करणार असून, त्याची फळे मात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागाकडून हा प्रयोग राबवला जात आहे. जिल्ह्यातील ८६ टक्के फळझाडे लागवडीच्या वर्षभरानंतर चांगल्या स्थितीत असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत कृषी विभागाने एक लाख ७४ हजार ६४८ झाडांची लागवड २०१९ मध्ये केली होती. विविध भागात लागवड केलेल्या या झाडांचे संगोपन त्या त्या मंडळात नियुक्त कृषी सहायकांमार्फत करून घेण्यात आले होते. यातील ७० टक्के झाडे ही जगली असून, त्यांची उंची ही सात ते आठ फुटांपेक्षा अधिक वाढली आहेत. गेल्या वर्षात जिल्ह्याला ३९ हजार झाडे लागवडीचे ध्येय होते. परंतु यावर जात कृषी विभागाने एक हजार ८०० हेक्टरमध्ये ४० हजारांपेक्षा अधिक झाडांची लागवड केली होती. ही झाडे प्रामुख्याने वार्षिक व उत्पादन देणाऱ्या फळांची आहेत. येत्या पाच वर्षानंतर ही झाडे उत्पादन देण्यास सक्षम असतील.

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात कृषी विभाग साधारण दोन हजारपेक्षा अधिक हेक्टरवर फळझाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करणार आहे. कालांतराने ही झाडे शेतकऱ्यांना सोपवली जातील. जिल्ह्याने गेल्यावर्षी लागवड क्षेत्रात नाशिक विभागातून आघाडी घेतली होती. यामुळे यंदाही दोन हजार किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात आघाडी घेतली जाण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दुर्गम भागात भेट देत धडगाव येथील रोपवाटिकेची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी कृषी विभागाला सीडबाॅल संकल्पना राबविण्याचे सूचित केले होते. या संकल्पेनुसारही कामकाज करण्याची तयारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून सुरू झाली आहे. त्यानुसार कामकाज होणार आहे. तूर्तास सर्व ३६ रोपवाटिकांमध्ये फळझाडांची लागवड वाढवण्यात आली आहे.

गेल्यावर्षीप्रमाणे प्रत्येकी सहा हेक्टर क्षेत्रानुसार वृक्ष लागवड सुरू होणार आहे. एकूण २२८ कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून जिल्ह्यात ही लागवड होणार आहे.

गेल्या वर्षात एक हजार ८०० हेक्टरवर लागवड केलेली फळझाडे ही चांगल्या स्थितीत आहेत. त्यांचे संगोपन चांगल्या प्रकारे झाल्याने वाढ झाली आहे. या झाडांची फळे ही त्या त्या भागातील शेतकऱ्यांना दिली जातील. यातून रोजगार मिळू शकतो. यंदाही जिल्ह्याच्या विविध भागात वृक्ष लागवड करण्याची तयारी आहे. विशेषकरून फळ झाडांवर लक्ष राहील. कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून ही फळ झाडे जिल्ह्याच्या विविध भागात लागवड करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

-अनंतराव पोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार