शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या वाढीव भावाविरोधात शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

देशातील रासायनिक खते तयार करणाऱ्या कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ केली आहे. प्रत्येक खताच्या गोणीमागे २०० रुपयांपासून ते ...

देशातील रासायनिक खते तयार करणाऱ्या कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ केली आहे. प्रत्येक खताच्या गोणीमागे २०० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माथी मोठा आर्थिक बोजा लादला गेला आहे. एवढेच नव्हे तर डीएपी, मिश्रा खत, पोटॅश व सुफला अशा पिकास पोषक असणाऱ्या खतांच्या किमतीतदेखील मोठी वाढ केली आहे. संबंधित रासायनिक खतांच्या कंपन्यांच्या मनमानीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात किमती वाढवूनदेखील केंद्र व राज्य सरकार त्यांना आवर घालायला तयार नाही. उलट त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वास्तविक गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना सलग नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत असून, यामुळे उत्पादनात प्रचंड घट येऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अगदी उत्पादनावर केलेला खर्चदेखील निघत नाही आहे. असे असताना कंपन्यांनी खतांच्या किमतीत भरघोस वाढ केली आहे. त्यामुळें शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.

प्रत्यक्षात कृषी बाजार मंडईत समाधानकारक भाव मिळत नाही. व्यापारी शासनाचा हमी भावदेखील द्यायला तयार होत नाही. शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीत माल विकावा लागत असतो. शिवाय शासन शासकीय धान्य खरेदी केंद्र सुरू करत नाही. दोन ते तीन महिन्यांपासून नोंद केलेल्या शेतकऱ्यांचा माल आजतागायत खरेदी झाला नाही, अशी शेतकऱ्यांची शोकांतिका असताना कंपन्यांनी खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

खतांच्या वाढत्या किमतीबाबत लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनीदेखील मौन बाळगल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रासायनिक खत कंपन्यांनी खतांची केलेली दरवाढ मागे घेण्यास केंद्र व राज्य सरकारने भाग पाडावे, अन्यथा जिल्ह्यातील सर्व शेतकरी ऐन लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

खतांच्या टंचाईबाबतही ठोस कार्यवाही व्हावी

गेल्या वर्षभरापासून सर्वच रासायनिक खतांची अधूनमधून टंचाई निर्माण केली जात आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड वैतागला आहे. ऐन पिकांच्या मोसमात रासायनिक खते मिळत नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. त्यातही विक्रेते ही संधी साधून मोठी आर्थिक लूट करीत असतात. वास्तविक शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरेसा पुरवठा करणे स्थानिक प्रशासनाबरोबरच जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र या यंत्रणादेखील उपाययोजना करायला तयार नाही. त्यामुळे सर्वांचे फावते आहे. तथापि शेतकरी यात पुरता भरडला जात आहे. यंदाही शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे आता तरी पुरेशा व मुबलक प्रमाणात रासायनिक खते, बी-बियाणांची तजवीज करून ठेवावी. शिवाय प्रचंड होणाऱ्या नफेखोरीवरसुद्धा लक्ष ठेवावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

लॉकडाऊनमुळे भावात घसरण

गेल्या वर्षापासून कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी शासन लॉकडाऊन संपूर्ण राज्यात लागू करीत आहे. साहजिकच धान पिकाबरोबरच नगदी पिकांच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर बाजारपेठेत मालाला आवक नाही, अशी सबब पुढे करून व्यापारी याचाच फायदा घेत शेतकऱ्यांचा माल कवडीमोल किमतीत खरेदी करून अडवणुकीचे धोरण घेत आहे. इकडे शेतकरी सावकारी कर्जापायी नाइलाजाने कमी दरात शिवाय खराब होवू नये म्हणून शेतमाल देत आहे. त्यामुळेच हमीभावाबाबत केंद्राने कडक कायदा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड फटका बसत आहे. उत्पादनावर केलेला खर्चदेखील निघाला नाही. त्यातच कंपन्यांनी रासायनिक खतांच्या प्रचंड किमती वाढविल्या आहेत. त्यामुळे खतांचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे.

- वसंत सूर्यवंशी, शेतकरी, तळोदा

कंपन्यांनी यंदा सर्वच रासायनिक खतांच्या किमती भरमसाट वाढवल्या आहेत. त्यांच्या मनमानी कारभाराबाबत शासनाने कारवाई करण्याची गरज आहे. मात्र शासनानेच त्याबाबत उदासीन धोरण घेतले आहे.

- जितेंद्र पाटील, शेतकरी, बोरद