शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

थकबाकी वसुलीसाठी तळोद्यातील शेतक:यांना वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 13:02 IST

तळोदा तालुका : पाणीपुरवठा योजनांची 2 कोटींची थकबाकी

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 8 : तळोदा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतीकडून वसुली करण्यासाठी महाविरतणतर्फे कार्यवाही करण्यात येत आह़े संबंधित ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करण्यात येणार असल्याने महावितरणकडून शेतक:यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप करण्यात येत आह़ेतळोदा तालुक्यातील एकूण 94 गावे असून त्यापैकी 45 ठिकाणी पाणीपुरवठय़ांची वीज जोडणी करण्यात आली आह़े संबंधित  गावांकडे एकूण 2 कोटी 12 लाख रुपयांची थकबाकी आह़े तर महावितरणकडून अद्याप केवळ 11 लाख रुपयांचीच वसुली करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आह़े तालुक्यात एकूण 67 ग्रामपंचायती आहेत़ त्यांना जोडलेले पाडे मिळून एकूण 94 गावांची महसुली दप्तरी नोंद करण्यात आली आह़े तळोदा तालुक्याची वसुली सर्वाधिक कमी असल्याने याबाबत महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कार्यवाही करण्याचे पत्र प्राप्त झाले आह़े त्यानुसार थकबाकी न भरणा:या ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठय़ाची वीज खंडित करावी असे आदेश यात देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आह़ेशेतकरी धरले जाताय वेठीसदरम्यान, महावितरणकडून थकबाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतींकडे तगादा लावला जात असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे यातून साहजिकच शेतकरी वेठीस धरले जात असल्याच्या भावना त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहेत़ आधिच परिसरात पाण्याची पातळी खोल झाली आह़े त्यामुळे साहजिकच तालुक्यातील सपाटीवरील गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारन करत असल्याचे दिसून येत आह़े अनेक ठिकाणी कमी दाबाचा पाणीपुरवठा होत आह़े त्यामुळे अशा परिस्थितीत पाणी पुरवठा खंडित झाल्यास पिकांना जगवावे कसे? असा प्रश्न शेतक:यांकडून विचारण्यात येत आह़े थकबाकीची वसुली करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना वारंवार पत्र पाठविण्यात आले होत़े परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मार्च महिन्यात जिल्ह्यातील 100 हुन अधिक गावांचा पाणीपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला होता़ त्यानंतर शेतक:यांचा यास विरोध झाल्यानंतर पुन्हा तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करुन शेतक:यांना निदान थकीबाकीच्या 5 टक्के रक्कम त्वरीत भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले होत़े परंतु तालुक्यातून केवळ 11 लाख रुपये इतकीच वसुली झाली होती़ पुन्हा ग्रामपंचायतींकडून वीजपुरवठा खंडित करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत़ त्यामुळे साहजिकच शेतकरी चिंतातूर झाले आह़े आधिच उन्हाळा असल्याने पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आह़े त्यातच महावितरणकडून अजून पाणीपुरवठय़ाची वीज खंडित करण्यात येत असल्याने शेतक:यांसमोरील चिंता अधिक वाढणार असल्याचे सांगण्यात येत आह़े खरिपासाठी पाण्याची गरजदरम्यान, आता काहीच दिवसांवर खरिप हंगाम येऊन ठेपला आह़े यात, केळी, पपई आदी विविध पिकांची शेतक:यांकडून लागवड करण्यात येत आह़े त्यामुळे साहजिकच यासाठी पाण्याची आवश्यकता आह़े महावितरवणकडून पाणीपुरवठय़ाची वीज खंडित केल्यास शेतक:यांना खरिप हंगाम घेणे कठीण जाणार असल्याची चिंता शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े