शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

रासायनिक खतांच्या टंचाईने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 12:42 IST

युरियानंतर आता पोटॅश मिळेना : दुहेरी संकटामुळे शेतकरी हतबल

तळोदा : तालुक्यातील शेतक:यांना आसमानी संकटाबरोबरच सुलतानी संकटांचाही सामना करावा लागत असल्याने शेतकरी अक्षरश: हतबल झाला आहे. कारण त्यांना शासनाकडून पुरेशा प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध होत नसल्याने शेतक:यांमध्ये मोठय़ा प्रमाणात असंतोष आहे. युरीयानंतर आता शेतक:यांपुढे पोटॅश खताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी पिकांचे पोषणच खुंटले आहे. जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेवून रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, अशी शेतक:यांची मागणी आहे.ऑगस्ट महिना अर्धा संपण्याच्या मार्गावर असतांना संपूर्ण तळोदा तालुक्यात अजून पावेतो नद्या-नाले दुथडी भरून आले नाही. शिवाय अद्यापर्पयत पावसाने सरासरीची निम्मेही गाठली नाही. साहजिकच शेतक:यांचे तोंडचे पाणी अक्षरश: पळाले आहे. शेतक:यांना आसमानी संकटांबरोबरच सुलतानी संकटांचाही सामना करावा लागत असल्याची त्यांची व्यथा आहे. कारण सद्या शेतक:यांना रासायनिक खतांच्या टंचाईस मोठय़ा प्रमाणात तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. सुरूवातीस युरीयाची टंचाई निर्माण झाली होती. जेमतेम ते उपलब्ध झाल्यानंतर आता पोटॅश खतांचा प्रश्न उभा राहिला आहे. तुरळक पावसामुळे सर्वच पिकांची परिस्थिती उत्तम आहे. मात्र त्यात आता रासायनिक खतांनी खोडा घातला आहे. ऊस, केळी, पपई व कापूस या पिकांना मिश्र खतांबरोबरच पोटॅशची मात्रा देण्याची लगबग शेतक:यांनी सुरू केली आहे. परंतु नेमके पोटॅश खतच बाजारात मिळत नसल्याने मात्रा रखडली आहे. गेल्या दीड महिन्यापासून या खतांची टंचाई निर्माण झाली आहे. खताअभावी पिकांची मात्रा रखडल्यामुळे पिकांचे पोषणच थांबल्याचे शेतकरी सांगतात. गुजरातमधून नंदुरबार, शहादा येथेही पोटॅश उपलब्ध होत नसल्यामुळे शेतक:यांना नाईलाजाने गोणीमागे अतिरिक्त किंमत देवून आणावे लागत आहे. साहजिकच शेतक:यांचीही प्रचंड आर्थिक लुट होत आहे. वास्तविक खरीप हंगाम सुरू होण्याआधीच येथील कृषी विभागाने सुयोग्य नियोजन करून सर्वच प्रकारच्या रासायनिक खतांची मागणी करणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या उदासिन भुमिकेमुळे शेतक:यांना खतांच्या तीव्र टंचाईस सामोर जावे लागत असल्याचा शेतक:यांचा आरोप आहे. आता पिकांना खतांची मात्रा देता आली नाही तर त्यांच्या वाढीबरोबरच पोषण ही थांबले आहे. परिणामी उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता शेतक:यांनी वर्तविली आहे. आधीच पजर्न्यमानाने संकटात सापडलेला शेतकरी अधिक कर्ज बाजारी होणार आहे. निदान जिल्हा प्रशासनाने तरी याप्रकरणी गंभीर दखल घेवून रासायनिक खतांच्या टंचाईचा प्रश्न मार्गी लावावा, अशी शेतक:यांची मागणी आहे.