शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

दरा प्रकल्पातील बुडित क्षेत्रातील शेतकरी आजही मोबदल्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST

१९७२ पासून येथील आदिवासी हे या धरणाच्या परिसरात आपआपली जमीन कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र अचानक शासनाकडून ...

१९७२ पासून येथील आदिवासी हे या धरणाच्या परिसरात आपआपली जमीन कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र अचानक शासनाकडून उनपदेवपासून काही अंतरावर दरा प्रकल्पाचे १९९० साली मोजमाप करून सर्व्हे करण्यात आला. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून तुमच्या जमिनीच्या बदल्यात जमिनी देण्यात येतील, असे आश्वासन देऊन प्रशासनाने व वन अधिकाऱ्यांनी येथील आदिवासी शेतकऱ्यांना भूलथापा देऊन सुमारे २००१ ते २००५ च्या दरम्यान दरा प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. हे काम १०१७ मध्ये पूर्ण झाले. येथील गोरगरीब आदिवासींना या प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व वन अधिकाऱ्यांनी शासनाकडून तुम्हाला या जमिनीचा मोबदला मिळेल, असे सांगून वेळ काढत गेले. शासनाच्या अधिकाऱ्यांवर भोळीभाबड्या जनतेने विश्वास ठेवला. मात्र आजपर्यंत त्यांना या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. सातपुड्याच्या पायथ्याशी चिंचोरा हे गाव १०० टक्के आदिवासी लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीशिवाय दुसरे साधन नाही. मात्र अचानक चिंचोरा व दरा गावातील सुमारे १४ जणांची जमीन या धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेली. २००१ पासून हे बुडीत क्षेत्रातील शेतकरी आजही शासकीय कार्यालयात मोबदल्यासाठी फेरफटका मारत आहे. वास्तविक पाहता या क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांचे स्वतंत्र वनपट्टे होते. त्यांच्याकडे तसे डॉक्युमेंटरी कागदपत्रे आहेत. आपल्या क्षेत्रातील जमिनीचा काही प्रमाणात शासनाकडून मोबदला मिळेल म्हणून या आशेवर आजही आदिवासी आपले जीवन जगत आहेत. नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, शासकीय अधिकारी आदिवासी समाजाचे असले तरी या बुडीत क्षेत्रातील १४ आदिवासींवर होणारा अन्याय प्रशासनाला दिसत नाही? आजपर्यंत कोणताही आमदार-खासदार या विषयावर किंवा या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना भेटण्यास का आला नाही? वारंवार या शेतकऱ्यांनी शासनाचे दरवाजे ठोठावूनही त्यांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही. परिणामी या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जमीन कायद्याअंतर्गत या सर्वच शेतकऱ्यांकडे वनक्षेत्रपाल शहादा यांचे विविध कागदपत्र आहेत. न्याय हक्कासाठी लढता लढता यातील बरेच शेतकरी वयोवृद्ध झाले आहेत. शासनाने त्यांना नवीन जमीन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दरा प्रकल्प पूर्ण होऊन २० वर्षे झाली असली तरी आजही हा आदिवासी शेतकरी आपल्या हक्कासाठी हेलपाटे मारत आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी या बुडीत क्षेत्रात क्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे.