शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

दरा प्रकल्पातील बुडित क्षेत्रातील शेतकरी आजही मोबदल्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST

१९७२ पासून येथील आदिवासी हे या धरणाच्या परिसरात आपआपली जमीन कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र अचानक शासनाकडून ...

१९७२ पासून येथील आदिवासी हे या धरणाच्या परिसरात आपआपली जमीन कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र अचानक शासनाकडून उनपदेवपासून काही अंतरावर दरा प्रकल्पाचे १९९० साली मोजमाप करून सर्व्हे करण्यात आला. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून तुमच्या जमिनीच्या बदल्यात जमिनी देण्यात येतील, असे आश्वासन देऊन प्रशासनाने व वन अधिकाऱ्यांनी येथील आदिवासी शेतकऱ्यांना भूलथापा देऊन सुमारे २००१ ते २००५ च्या दरम्यान दरा प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. हे काम १०१७ मध्ये पूर्ण झाले. येथील गोरगरीब आदिवासींना या प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व वन अधिकाऱ्यांनी शासनाकडून तुम्हाला या जमिनीचा मोबदला मिळेल, असे सांगून वेळ काढत गेले. शासनाच्या अधिकाऱ्यांवर भोळीभाबड्या जनतेने विश्वास ठेवला. मात्र आजपर्यंत त्यांना या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. सातपुड्याच्या पायथ्याशी चिंचोरा हे गाव १०० टक्के आदिवासी लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीशिवाय दुसरे साधन नाही. मात्र अचानक चिंचोरा व दरा गावातील सुमारे १४ जणांची जमीन या धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेली. २००१ पासून हे बुडीत क्षेत्रातील शेतकरी आजही शासकीय कार्यालयात मोबदल्यासाठी फेरफटका मारत आहे. वास्तविक पाहता या क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांचे स्वतंत्र वनपट्टे होते. त्यांच्याकडे तसे डॉक्युमेंटरी कागदपत्रे आहेत. आपल्या क्षेत्रातील जमिनीचा काही प्रमाणात शासनाकडून मोबदला मिळेल म्हणून या आशेवर आजही आदिवासी आपले जीवन जगत आहेत. नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, शासकीय अधिकारी आदिवासी समाजाचे असले तरी या बुडीत क्षेत्रातील १४ आदिवासींवर होणारा अन्याय प्रशासनाला दिसत नाही? आजपर्यंत कोणताही आमदार-खासदार या विषयावर किंवा या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना भेटण्यास का आला नाही? वारंवार या शेतकऱ्यांनी शासनाचे दरवाजे ठोठावूनही त्यांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही. परिणामी या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जमीन कायद्याअंतर्गत या सर्वच शेतकऱ्यांकडे वनक्षेत्रपाल शहादा यांचे विविध कागदपत्र आहेत. न्याय हक्कासाठी लढता लढता यातील बरेच शेतकरी वयोवृद्ध झाले आहेत. शासनाने त्यांना नवीन जमीन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दरा प्रकल्प पूर्ण होऊन २० वर्षे झाली असली तरी आजही हा आदिवासी शेतकरी आपल्या हक्कासाठी हेलपाटे मारत आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी या बुडीत क्षेत्रात क्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे.