शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांनी जल पुनर्भरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शेतातील पावसाचे वाया जाणारे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून बोअरवेलमध्ये जलपुर्नभरण करून भूजल पातळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शेतातील पावसाचे वाया जाणारे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून बोअरवेलमध्ये जलपुर्नभरण करून भूजल पातळी वाढविण्याचा उपक्रम शहरातील डॉ.सूर्यकांत पंजराळे करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला यश येत असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील शेतकऱ्यांनीदेखील असा उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.एकेकाळी तळोदा तालुका हा मुबलक पाण्यामुळे सुजलाम सुफलाम असा होता. कारण भूगर्भातील पाण्याची पातळी अतिशय उंचावर होती. अगदी १५ ते २० फुटावर पाणी होते. परंतु गेल्या १० ते १५ वर्षांपासून वार्षिक पर्जन्यमान घटत असल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीतही कमालीची घट झाली आहे. सद्या ती १५० ते २०० फुटावर गेली आहे. त्यामुळे शेतकºयांचे बोअरवेल निकामी होण्याचे प्रमाणदेखील अलिकडे मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्याचबरोबर बागायतीचे प्रमाण सुद्धा कमी झाले होते. साहजिकच जलपुर्नभरण करणे ही काळाची गरज बनली आहे. म्हणून तळोदा शहरातील शेतकºयांनी गेया वर्षी नदी खोलीकरण, नांगरटी असे उपक्रम राबविले होते.तालुक्यातही काही गावांमधील युवक शेतकºयांनी पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम राबविला होता. त्याचा परिणाम म्हणून नदी-नाल्यानचे पाणी तेथेच झिरले. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील प्रचंड उंचावर आली. त्यामुये यंदाच्या उन्हाळ्यात बोअरवेलचे पाणीही टिकून राहिले. असाच जलपुर्नभरणाचा उपक्रम तळोद्यातील डॉ.सूर्यकांत पंजराळे हे वैद्यकीय व्यवसाय असलेले डॉक्टर शेतकरी आपल्या खाजगी शेतात राबवित आहेत. त्यामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीतही त्यांचा कृषीपंप पूर्ण क्षमतेनुसार चालत होता. वास्तविक या परिसरात अनेक बोअर निकामी ठरले होते. परंतु त्यांचा बोअरवेलवर काहीच फरक पडला नसल्याचे ते म्हणतात.आपल्या हातोडा रस्त्यावरील शेतात बोअरवेल जवळ चार ते सहा फुट आकाराचा खड्डा करून तेथील गेसिंग पाईपला चिºया पाडल्या आहेत. त्यानंतर गेसींग पाईपच्या अवती भोवती मोठी जाळी बसवली जेणे करून स्वच्छ पाणीच आत येईल. त्याचबरोबर खोदलेल्या खड्ड्यात म्हणजे वरच्या भागात लहान दगड, गोटे, खडी, वाळू, कोळसा याचा थर देवून खड्डा करावा. अशा रेन हार्वेस्टिंगच्या माध्यमातून शेतात पडणारे पावसाचे पाणी इतरत्र वाहून न जाता बोअरवेल जवळच जिरत असते. साहजिकच बोअरची पाण्याची पातळीदेखील प्रचंड वाढली आहे. या उपक्रमासाठी अत्यंत कमी खर्च येतो. कमी खर्चिक आणि सहज करता येत असल्यामुळे सर्वच शेतकºयांनी आपल्या शेतातील वाया जाणारे पाणी अडवून अशा प्रकारे जमिनीत जिरवले तर तळोदा तालुक्याला निश्चितच गतवैभव मिळवता येईल. तथापि याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गेल्या वर्षी भूगर्भातील जलपातळी वाढविण्यासाठी शहरातील तरूणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. त्यामुळे नद्या-नाल्यांचेही रूंदीकरणाबरोबर खोलीकरण झाले होते. जणू एक प्रकारे शेतकºयांनी पाणी चळवळच उभी केली होती. मात्र यंदा त्याकडे कोरोनाच्या महामारीमुळे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.