शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी जल पुनर्भरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शेतातील पावसाचे वाया जाणारे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून बोअरवेलमध्ये जलपुर्नभरण करून भूजल पातळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शेतातील पावसाचे वाया जाणारे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून बोअरवेलमध्ये जलपुर्नभरण करून भूजल पातळी वाढविण्याचा उपक्रम शहरातील डॉ.सूर्यकांत पंजराळे करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला यश येत असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील शेतकऱ्यांनीदेखील असा उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.एकेकाळी तळोदा तालुका हा मुबलक पाण्यामुळे सुजलाम सुफलाम असा होता. कारण भूगर्भातील पाण्याची पातळी अतिशय उंचावर होती. अगदी १५ ते २० फुटावर पाणी होते. परंतु गेल्या १० ते १५ वर्षांपासून वार्षिक पर्जन्यमान घटत असल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीतही कमालीची घट झाली आहे. सद्या ती १५० ते २०० फुटावर गेली आहे. त्यामुळे शेतकºयांचे बोअरवेल निकामी होण्याचे प्रमाणदेखील अलिकडे मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्याचबरोबर बागायतीचे प्रमाण सुद्धा कमी झाले होते. साहजिकच जलपुर्नभरण करणे ही काळाची गरज बनली आहे. म्हणून तळोदा शहरातील शेतकºयांनी गेया वर्षी नदी खोलीकरण, नांगरटी असे उपक्रम राबविले होते.तालुक्यातही काही गावांमधील युवक शेतकºयांनी पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम राबविला होता. त्याचा परिणाम म्हणून नदी-नाल्यानचे पाणी तेथेच झिरले. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील प्रचंड उंचावर आली. त्यामुये यंदाच्या उन्हाळ्यात बोअरवेलचे पाणीही टिकून राहिले. असाच जलपुर्नभरणाचा उपक्रम तळोद्यातील डॉ.सूर्यकांत पंजराळे हे वैद्यकीय व्यवसाय असलेले डॉक्टर शेतकरी आपल्या खाजगी शेतात राबवित आहेत. त्यामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीतही त्यांचा कृषीपंप पूर्ण क्षमतेनुसार चालत होता. वास्तविक या परिसरात अनेक बोअर निकामी ठरले होते. परंतु त्यांचा बोअरवेलवर काहीच फरक पडला नसल्याचे ते म्हणतात.आपल्या हातोडा रस्त्यावरील शेतात बोअरवेल जवळ चार ते सहा फुट आकाराचा खड्डा करून तेथील गेसिंग पाईपला चिºया पाडल्या आहेत. त्यानंतर गेसींग पाईपच्या अवती भोवती मोठी जाळी बसवली जेणे करून स्वच्छ पाणीच आत येईल. त्याचबरोबर खोदलेल्या खड्ड्यात म्हणजे वरच्या भागात लहान दगड, गोटे, खडी, वाळू, कोळसा याचा थर देवून खड्डा करावा. अशा रेन हार्वेस्टिंगच्या माध्यमातून शेतात पडणारे पावसाचे पाणी इतरत्र वाहून न जाता बोअरवेल जवळच जिरत असते. साहजिकच बोअरची पाण्याची पातळीदेखील प्रचंड वाढली आहे. या उपक्रमासाठी अत्यंत कमी खर्च येतो. कमी खर्चिक आणि सहज करता येत असल्यामुळे सर्वच शेतकºयांनी आपल्या शेतातील वाया जाणारे पाणी अडवून अशा प्रकारे जमिनीत जिरवले तर तळोदा तालुक्याला निश्चितच गतवैभव मिळवता येईल. तथापि याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गेल्या वर्षी भूगर्भातील जलपातळी वाढविण्यासाठी शहरातील तरूणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. त्यामुळे नद्या-नाल्यांचेही रूंदीकरणाबरोबर खोलीकरण झाले होते. जणू एक प्रकारे शेतकºयांनी पाणी चळवळच उभी केली होती. मात्र यंदा त्याकडे कोरोनाच्या महामारीमुळे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.