शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन नोंदणी केलेले शेतकरी वा:यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट पोर्टलद्वारे नोंदणी करणा:या शेतक:यांना मान्यता देण्याचे प्रलंबीत असतांना आधार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट पोर्टलद्वारे नोंदणी करणा:या शेतक:यांना मान्यता देण्याचे प्रलंबीत असतांना आधार क्रमांक दुरूस्तीअभावी हजारो शेतकरी या योजनेपासून वंचीत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दोन्ही बाबींसाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेतक:यांची सामाईक सुविधा केंद्रांवर गर्दी होत आहे.  केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आता सरसकट सर्व शेतक:यांना लागू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत लाभाथ्र्याची माहिती आधार संलगA करण्यात येत असून त्यानंतरच शेतक:यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. परंतु अनेक शेतक:यांचे आधार क्रमांक चुकीचे, नाव चुकीचे, गट क्रमांक आणि क्षेत्र चुकीचे असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे एम.किसान या पोर्टलवर अनेक दिवसांपासून ठराविक शेतक:यांचीच नावे दिसून येत आहेत. अनेक पात्र लाभार्थी शेतक:यांची नावेच या पोर्टलवर येत नसल्यामुळे शेतक:यांमध्ये संभ्रमावस्था आहे. आता 30 नोव्हेंबर ही शेवटची मुदत असल्यामुळे शेतक:यांची धावपळ उडाली आहे. सर्व हप्ते आधारलिंकचया योजनेअंतर्गत लाभार्थी शेतक:यांना मिळणारे सर्व अर्थात  तिन्ही हप्ते हे आधार लिंक राहणार आहेत. त्यासाठी पात्र शेतक:याची सर्व माहिती आधारकार्ड आधारीत असावी ही प्रमुख अट होती. परंतु अनेक शेतक:यांचे आधार लिंक नसणे, आधारकार्ड क्रमांक चुकीचा असणे, नावात चूक असणे यासह इतर अडचणी आहेत. त्या दुरूस्तीसाठी शेतक:यांना मोठी कसरत करावी लागत आहे.ऑनलाईन पोर्टलथेट नोंदणी करणे किंवा माहितीमध्ये दुरूस्ती करण्यासाठी शासनाने एम.किसान पोर्टल सुरू   केले आहे. त्यात ऑनलाईन नोंदणी    व दुरूस्तीच्या सुविधा देण्यात      आल्या आहेत. त्या करूनही अनेक शेतक:यांची नावेच संबधीत    गावांच्या यादीत दिसून येत नसल्याच्या शेतक:यांच्या तक्रारी आहेत. ज्या शेतक:यांच्या नोंदी झालेल्या आहेत, परंतु त्रुटी असतील त्या शेतक:यांच्या मोबाईल नंबरवर मेसेज पाठविला जात आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांना देण्यात आलेल्या गावांमध्ये त्यांच्या अधिनस्त असलेल्या सामाईक सुविधा केंद्रात शेतक:यांचे आधारकार्ड लिंकिंग व सुधारीत माहिती पुरविण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत. ज्या शेतक:यांची नोंदणी झालेली नाही परंतु पात्र असतील अशा शेतक:यांना थेट नोंदणी करण्यासाठी पी.एम.किसान पोर्टलवर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातून 446 शेतक:यांनी नोंदणी केली होती. पैकी केवळ 18 शेतक:यांना मान्यता देण्यात आली. एका शेतक:याची नोंदणी रद्द करण्यात आली. तर  427 शेतक:यांची मान्यता प्रलंबीत आहे. पाच दिवसांची मुदत नोंदणी व माहिती दुरूस्तीसाठी आता केवळ पाच दिवसच शिल्लक आहेत. परंतु अनेक शेतक:यांची नावे यादीत आलेली नाहीत. नोंदणी करूनही आणि माहितीत दुरूस्ती करूनही नावे नसल्यामुळे या योजनेपासून अनेक पात्र शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेवटच्या पाच दिवसात संबधीत गावातील तलाठींनी पात्र शेतक:यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. 

ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतक:यांमध्ये सर्वात कमी वर्धा तर सर्वात जास्त बीड जिल्ह्यात नोंदणी करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात 188 शेतक:यांनी नोंदणी केली आहे. बीड जिल्ह्यात 10,896 शेतकरी, नंदुरबार जिल्ह्यातून 446 शेतकरी, धुळे जिल्ह्यातून 353 तर जळगाव जिल्ह्यातून 2,179 शेतक:यांची नोंदणी करण्यात आली आहे. पोर्टलवर थेट नोंदणी केलेली असल्याने केंद्र शासनास व राज्य शासनास शेतकरी पाठपुरावा करीत आहेत. शिवाय तलाठी देखील गावागावात टार्गेट होत असल्याचे चित्र आहे.