शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या कष्टाला आले फळ टॉमेटो विक्रीतून मिळाले पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे़ वाहतूक व्यवस्थेअभावी बाजारपेठेपासून वंचित ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे़ वाहतूक व्यवस्थेअभावी बाजारपेठेपासून वंचित असल्याने उत्पादनांची नासाडी होत आहे़ या समस्येवर मात्र मोहिदा ता़ तळोदा येथील एका शेतकºयाने मात करत दोन पिकवलेला टोमॅटो थेट गुजरात राज्याच्या बाजारात पोहोचता करुन त्यातून नफाही कमावला आहे़आनंद रमण चौधरी (मराठे) असे शेतकºयाचे नाव असून गेल्या चार महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे इतर शेतकºयांप्रमाणेच त्यांचेही भाजीपाला उत्पादन मातीमोल भावात विक्री होण्याची वेळ आली होती़ परंतु एकरी ५० हजारापर्यंत केलेल्या खर्चाची थोडीतरी वसुली व्हावी याचा चंग बांधत त्यांनी गुजरातची बाजारपेठ गाठली़ आनंद चौधरी यांनी सहा महिन्यांपूर्वी दोन एकरात टोमॅटो तर एक एकरात कार्ले वेल लागवडीचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार शेतमशागत आणि कामे पूर्ण करत त्यांनी रोपांची लागवडही केली़ यातून कार्ल्याचे वेल हे चांगल्या प्रकारे बहरले तर टोमॅटोनेही बाळसे धरले होते़ दरम्यान लॉकडाऊन सुरू झाल्याने शहरी भागाकडे जाणारा माल पूर्णपणे थांबला होता़ यातून ग्रामीण भागात किरकोळ विक्री करणारे विक्रेते येऊन टोमॅटो आणि कार्ले घेऊन जात होते़ परंतु यातून खर्चही निघत नसल्याने शेतकरी चौधरी यांनी स्वत:च सूत्रे हातात घेत सुरत येथील बाजारपेठ गाठण्याचा निर्णय घेतला़ कृषी विभागाने भाजीपाला वाहतूकदारांना दिलेल्या परवान्यासह महसूल विभागाच्या प्रवासी पासची मागणी करत त्यांनी स्वत: वाहन चालवत सुरत येथे प्रवास केला होता़ याठिकाणाच्या बाजारात ठोक भावात टोमॅटो २५ रूपयांपर्यंत विक्री होत होता़ शेतकºयाने चांगल्या दर्जाचा टोमॅटो बाजारात नेल्याने तेथील व्यापारी आणि आडतदारांनी तो हातोहात खरेदी केला़ प्रतीएकर १ लाख १० रूपयांचा टोमॅटो त्यांनी आतापर्यंत सुरतपर्यंत पोहोचता केला आहे़ यातून त्यांना २ लाख २० हजार रूपयांचा लाभ झाला आहे़ दरम्यान अत्यंत गंभीर परिस्थितीला सामोरे जात त्यांनी उत्पादनाची योग्य पद्धतीने विक्री केल्याने इतर शेतकºयांमध्ये ते चर्चेचा विषय ठरले आहेत़ दरम्यान त्यांनी मोहिदे शिवारातील शेतातूनच कार्ल्याची विक्रीही सुरू केली आहे़ या कार्ल्यांना मागणी असून परिसरातील ग्रामस्थ शहरी भागात राहणाºया नातलगांना ते पोहोचते करुन देत आहेत़तळोदा तालुक्याच्या विविध भागातून गुजरात राज्यात जाणाºया भाजीपाल्याच्या गाड्या गेल्या काही दिवसांपासून योग्य मार्गदर्शनाअभावी बंद आहेत़ मोहिदे येथील शेतकºयाने दाखवलेल्या धारिष्ट्याने ही वाहने पूर्ववत सुरू होवून शेतकºयांना दिलासादायक ठरतील़