शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
4
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
5
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
6
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
7
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
8
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
9
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
10
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
11
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
12
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
13
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
14
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
15
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
16
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
17
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
19
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
20
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

बियाणे फसवणुकीतील शेतकरी वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 13:03 IST

कृषी विभागाची बेपर्वाई : जिल्हाधिका-यांच्या सूचनांकडे जिल्हा परिषद कृषी विभागाचे दुर्लक्ष

रमाकांत पाटील । ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 5 : बोगस बियाणे विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी कृषी विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाने कितीही आव आणला असला तरी प्रत्यक्षात मात्र बोगस बियाणे विक्री करणा:यांवर कुठलीही कारवाई करण्यास जि़प़चा कृषी विभाग असमर्थ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी तब्बल 800 शेतक:यांची फसवणूक झाल्याची तक्रार असून, त्याबाबत पंचनामे करण्यात आले. मात्र नवीन वर्ष सुरू झाले तरी अद्याप त्यावर कारवाई न झाल्याने शेतक:यांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. यावर्षीही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून, कृषी विभागाचे बोगस बियाणे विक्रेत्यांना समर्थन तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी 37 हजार 774 हेक्टर क्षेत्रात ज्वारीचा पेरा झाला होता. त्यापैकी जवळपास चार हजार हेक्टर क्षेत्रातील ज्वारीच्या पिकाला कणसेच आले नव्हते. ज्या शेतक:यांनी विविध चार कंपन्यांचे नऊ नंबरचे वाण लावले होते, त्यांच्या शेतातील हे चित्र होते. कडब्याला कणीस न आल्याने अथवा त्यात दाणाच न भरल्याने संबंधित शेतक:यांनी तक्रारी केल्या. सुरुवातीला त्याबाबत शेतक:यांची फारशी दखल घेतली गेली नाही. मात्र तक्रारी वाढल्यानंतर जिल्हाधिका:यांनी दखल घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कृषी विभागाने पंचनामे केले. जवळपास 800 शेतक:यांच्या शेतात अशी स्थिती असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. त्यानंतर या शेतक:यांना नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा झाली. मात्र संबंधित विक्रेत्यांनी व कंपन्यांनी वेळ काढू भूमिका घेतली. पुन्हा शेतक:यांचा तगादा वाढल्याने या संदर्भात जिल्हाधिका:यांनी कृषी विभागाला याप्रकरणी सामूहिकपणे ग्राहक मंचात संबंधित कंपन्यांविरुद्ध दावा दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात त्याची अद्यापही दखल घेतली गेली नसल्याने बियाणे फसवणुकीतील शेतकरी वा:यावरच आहे.दरम्यान, खरीप हंगामाची सध्या तयारी सुरू असल्याने प्रशासन बैठका घेऊन बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करण्याची वल्गना सातत्याने करीत आहे. परंतू बोगस बियाण्याच्या माध्यमातून गेल्यावर्षी शेतक:यांची फसवणूक करणा:या बियाणे विक्रेत्या कंपन्यांवर तसेच किरकोळ  विक्रेत्यांवर कुठलीही कारवाई करीत नसल्याने बोगस ज्वारी बियाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतक:यांमध्ये प्रशासन व कृषी विभागाविरुद्ध संतापाचे वातावरण आहे. ज्या विक्रेत्यांनी शेतक:यांना बोगस बियाणे विक्री केले ते विक्रेते यंदाही राजरोसपणे तेच  बियाणे विक्री करीत असून, गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही ते शेतक:यांची फसवणूक करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कृषी विभाग आणि विक्रेत्यांचे व कंपन्यांचे साठे लोटे असल्याने कुणीही कारवाई करण्यास धजावत नसल्याचा आरोप शेतक:यांकडून करण्यात आला आहे. वास्तविक जे बियाणे गेल्यावर्षी विक्री झाले ते ज्वारीचे वाण विक्रीवर दोन वर्षापूर्वीच बंदी असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही ते गेल्यावर्षी विक्री कसे झाले, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून, या जिल्ह्यात सातत्याने विविध घटनांमध्ये आदिवासींचीच मोठय़ा प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे चित्र आहे. या पूर्वी आदिवासी शेतक:यांच्या शेतातील पूर्ण विहिरीच गायब करून प्रशासनाने फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते.आता या प्रकरणातदेखील सर्वाधिक शेतकरी आदिवासी आहेत. जवळपास निम्मे शेतकरी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आहे. हे शेतकरी दिवाळीनंतर उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करतात. त्यानंतर फक्त खरिपाचे पीक घेण्यासाठी गावी येतात.त्यांचे अर्थकारण या एका पिकावर अवलंबून असते. असेच हे शेतकरी असून, त्यांचे गेल्या वर्षाचे ज्वारीचे पूर्ण पीक वाया गेल्याने या शेतक:यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. पीक घेण्यासाठी केलेला खर्च तर वाया गेलाच पण एक रुपयाही उत्पन्न न आल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे.