शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

आष्टे येथील विहीपर्यंत आंबेबारा धरणाचे पाणी पाइपलाइनद्वारे आणण्यास आष्टे येथील शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST

आष्टे गावाजवळ असलेल्या आंबेबारा धरण १९७४ ते ७५ च्या दरम्यान बांधले गेले. या धरणांचे पाणी पूर्वीपासून स्थानिक शेतकऱ्यांना शेती ...

आष्टे गावाजवळ असलेल्या आंबेबारा धरण १९७४ ते ७५ च्या दरम्यान बांधले गेले. या धरणांचे पाणी पूर्वीपासून स्थानिक शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी दिले जात होते; मात्र नंतरच्या काळात नगरपालिकेला पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने या धरणातील पाणी ५० टक्के आरक्षित केले जात होते. नगरपालिकेला पाणी देतानाही लघुपाटबंधारे विभागाने शिवशंकर पाणी पुरवठा आष्टे-आंबेबारा या संस्थेला व स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पालिकेला पाणी देऊन टाकले, असे निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे. वीरचक्र प्रकल्पातून नंदुरबार शहराला पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर या आष्टे योजनेचे पाणी कमी प्रमाणात वापरले जात आहे. आष्टे येथील विहिरापर्यंत सध्या आंबेबारा धरणातून पाटचारीद्वारे पाणी आणले जाते. यामुळे पाणी वाया जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने नगरपालिकेतर्फे यावर्षापासून पाइपलाइनने पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आल्याने यास येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. नगरपालिकेला पाणी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही; मात्र ते पूर्वीप्रमाणेच पाटचारीद्वारे न्यावे, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. पाटचारीद्वारे पाणी नेल्यास परिसरातील पशू-पक्ष्यांना तसेच शेतांतील कामे झाल्यानंतर गुरांना, शेळ्या-मेंढ्यांना व आदिवासी बांधवांना मार्च ते जूनपर्यंत या पाण्याचा पिण्यासाठी वापर होत असतो, तसेच पाटांचे पाणी जमिनीत मुरल्याने विहिरीच्या पाणीपातळीत वाढ होत असते. त्यामुळे धरणांचे पाणी पाइपलाइनद्वारे नेण्यास विरोध असून, ते पाटचारीद्वारेच न्यावे, अन्यथा शांततेचा भंग झाल्यास त्यास नगरपालिका जबाबदार राहील, असे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक, सहायक अभियंता लघुपाटबंधारे विभाग नंदुरबार, तालुका पोलीस ठाणे, मुख्याधिकारी नगरपालिका, कार्यकारी अभियंता सिंचन भवन धुळे यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर सरपंच कमल ठाकरे, विजय शेवाळे, अशोक अर्जून पाटील, रामकृष्ण रामचंद्र पाटील, पाहुबा पाटील, देवेंद्र आघाव, नरोत्तम शेवाळे, लोटन शेवाळे, भाऊसाहेब गाठे आदींच्या सह्या आहेत.