शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

कळंबूसह परिसरातील शेतकऱ्यांचा पीक बदलीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

कळंबूसह परिसरात यावर्षी बहुतेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीस प्राधान्य दिले आहे. पिकांच्या बदलांनुसार व शेतजमिनीवर आधारित कमीत कमी एकरी ...

कळंबूसह परिसरात यावर्षी बहुतेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीस प्राधान्य दिले आहे. पिकांच्या बदलांनुसार व शेतजमिनीवर आधारित कमीत कमी एकरी ४० टन, उत्पादन मिळण्याची आशा शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे. कमी भांडवल व अल्प मेहनतीने मिळणाऱ्या उत्पादनात समाधानी होणार असल्याचे ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.

ऊस लागवडीसह भाजीपाला लागवडीवर सध्या कळंबू परिसरातील शेतकऱ्यांचा ओढ दिसून येत आहे. दरवर्षी कापूस, मका, ज्वारी, बाजरी, आदी पिके घेतली जात होती; परंतु इतर पिकांचा वाढता खर्च आणि मजूर वर्गाअभावी शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे प्राधान्य दिले आहे. यावर्षी थोड्या फार प्रमाणात का होईना; परंतु उन्हाळा पास होईल एवढ्या प्रमाणात पाणी साठा काही शेतकऱ्यांकडे उपलब्ध असल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी प्राधान्य दिले.

मजूर वर्गाअभावी ऊस लागवडीचा निर्णय

कळंबूसह परिसरातील शेतकऱ्यांना नेहमीच मजूर टंचाईला सामोरे जावे लागते. भटकंती करूनही वेळेवर मजूर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला होता. एकीकडे मजुराअभावी भटकंती तर मालास हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत होता. म्हणूनच यावर्षी बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीस प्राधान्य दिले. तर परिसरातील शंभर टक्के जमीन ओलिताखाली आली असती.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २२ उपसासिंचन योजनांना पुनजीर्वित करण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत सुमारे ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून काही प्रमाणात दुरुस्ती कामास सुरुवात करण्यात आली होती. यासाठी लागणारी साधन सामग्री गेल्या वर्षाभरापासून बेवारस स्थितीत पडली आहे. काम मार्गी लागावे यासाठी लाभधारक शेतकऱ्यांनी संबंधिताकडे वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा करत जलसमाधी घेण्याचाही इशारा दिला होता. मात्र, धुळे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार मध्यम प्रकल्प कार्यालयात विभागीय पथकाच्या उपस्थित बैठक घेत रखडलेले काम पूर्णत्वास नेऊन लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देत संबंधित शेतकऱ्यांना अभियंता यांनी विनंती केल्याने शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनास स्थगिती दिली होती. मात्र, काही महिने उलटूनही परिस्थिती जैसे थे असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. आतापर्यंत जर सिंचन योजना पूर्णत्वास येऊन याचा लाभ शेतकऱ्यांना झाला असता व परिसरातील जमीन सुजलाम, सुफलाम होऊन, सिंचन क्षेत्रातील पूर्ण जमीन ओलिताखाली आली असती आणि शेतकरी सुखी झाला असता.

सहा एकर क्षेत्रात बोअरवेलच्या आधारे यावर्षी ऊस लागवड केली असून बोअरवेल ७०० ते ८०० फुटांवर सद्य:स्थितीत सुरळीत चालू आहे. भविष्यात बोअरवेल कधीही बंद पडू शकतो व ऐनवेळेस उसाला पाण्याची कमतरता भासू शकते, सद्य:स्थितीत उपसासिंचन योजना कार्यन्वित झाली असती तर परिसरात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले असते.

-ऋषिकेश बोरसे, ऊस लागवड शेतकरी, कळंबू, ता. शहादा