शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

कळंबूसह परिसरातील शेतकऱ्यांचा पीक बदलीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

कळंबूसह परिसरात यावर्षी बहुतेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीस प्राधान्य दिले आहे. पिकांच्या बदलांनुसार व शेतजमिनीवर आधारित कमीत कमी एकरी ...

कळंबूसह परिसरात यावर्षी बहुतेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीस प्राधान्य दिले आहे. पिकांच्या बदलांनुसार व शेतजमिनीवर आधारित कमीत कमी एकरी ४० टन, उत्पादन मिळण्याची आशा शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे. कमी भांडवल व अल्प मेहनतीने मिळणाऱ्या उत्पादनात समाधानी होणार असल्याचे ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.

ऊस लागवडीसह भाजीपाला लागवडीवर सध्या कळंबू परिसरातील शेतकऱ्यांचा ओढ दिसून येत आहे. दरवर्षी कापूस, मका, ज्वारी, बाजरी, आदी पिके घेतली जात होती; परंतु इतर पिकांचा वाढता खर्च आणि मजूर वर्गाअभावी शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे प्राधान्य दिले आहे. यावर्षी थोड्या फार प्रमाणात का होईना; परंतु उन्हाळा पास होईल एवढ्या प्रमाणात पाणी साठा काही शेतकऱ्यांकडे उपलब्ध असल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी प्राधान्य दिले.

मजूर वर्गाअभावी ऊस लागवडीचा निर्णय

कळंबूसह परिसरातील शेतकऱ्यांना नेहमीच मजूर टंचाईला सामोरे जावे लागते. भटकंती करूनही वेळेवर मजूर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला होता. एकीकडे मजुराअभावी भटकंती तर मालास हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत होता. म्हणूनच यावर्षी बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीस प्राधान्य दिले. तर परिसरातील शंभर टक्के जमीन ओलिताखाली आली असती.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २२ उपसासिंचन योजनांना पुनजीर्वित करण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत सुमारे ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून काही प्रमाणात दुरुस्ती कामास सुरुवात करण्यात आली होती. यासाठी लागणारी साधन सामग्री गेल्या वर्षाभरापासून बेवारस स्थितीत पडली आहे. काम मार्गी लागावे यासाठी लाभधारक शेतकऱ्यांनी संबंधिताकडे वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा करत जलसमाधी घेण्याचाही इशारा दिला होता. मात्र, धुळे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार मध्यम प्रकल्प कार्यालयात विभागीय पथकाच्या उपस्थित बैठक घेत रखडलेले काम पूर्णत्वास नेऊन लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देत संबंधित शेतकऱ्यांना अभियंता यांनी विनंती केल्याने शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनास स्थगिती दिली होती. मात्र, काही महिने उलटूनही परिस्थिती जैसे थे असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. आतापर्यंत जर सिंचन योजना पूर्णत्वास येऊन याचा लाभ शेतकऱ्यांना झाला असता व परिसरातील जमीन सुजलाम, सुफलाम होऊन, सिंचन क्षेत्रातील पूर्ण जमीन ओलिताखाली आली असती आणि शेतकरी सुखी झाला असता.

सहा एकर क्षेत्रात बोअरवेलच्या आधारे यावर्षी ऊस लागवड केली असून बोअरवेल ७०० ते ८०० फुटांवर सद्य:स्थितीत सुरळीत चालू आहे. भविष्यात बोअरवेल कधीही बंद पडू शकतो व ऐनवेळेस उसाला पाण्याची कमतरता भासू शकते, सद्य:स्थितीत उपसासिंचन योजना कार्यन्वित झाली असती तर परिसरात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले असते.

-ऋषिकेश बोरसे, ऊस लागवड शेतकरी, कळंबू, ता. शहादा