शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
5
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
6
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
7
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
8
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
9
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
10
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
11
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
12
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
13
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
14
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
15
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
16
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
17
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
18
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
19
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
20
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी

पाऊस लांबल्यामुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST

जयनगर : कोरोना महामारी व नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत शेतकरी पूर्ण बेजार झाला आहे. जून महिना संपत आला तरी ...

जयनगर : कोरोना महामारी व नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत शेतकरी पूर्ण बेजार झाला आहे. जून महिना संपत आला तरी लांबलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असून, पावसाची कोणतीही चाहूल दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शहादा तालुक्यात जून महिन्यात ७ जूनला चांगल्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली होती. मात्र, त्यानंतर पाऊस न आल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार लागवडीचे संकट उद्भवले आहे, तर मोजक्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.

शहादा तालुक्‍यात महत्त्वाचे व नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. जून महिना संपत आला तरी पावसाची कोणतीच चाहूल नसल्यामुळे कापसाची लागवड धोक्यात आली आहे. सोबत पेरण्याही लांबत आहेत. त्यामुळे पाऊस कधी येईल आणि पेरण्या होतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. एकच पाऊस झाल्याने लागवड कमी झाली आहे, तसेच बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी खरीप हंगाम सुरू होण्याअगोदरच शेतकरी यावर्षी संकटात सापडला आहे.

तालुक्‍यात अनेक शेतकऱ्यांनी बागायती कापूस लागवड केली असली तरी पाऊस नसल्याने या कापसाच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. बागायती कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांना पाऊस नसल्यामुळे विहिरी, तसेच कूपननलिकेतील पाणी भरावे लागत आहे. मात्र, जे शेतकरी पावसाच्या पाण्यावर कापूस लागवड, तसेच पेरणी करीत असतात असे शेतकरी आकाशाकडे टक लावून बसले आहेत. तालुक्यात खरीप हंगामात कापसासोबत मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन, अशी पिके घेतली जातात. मात्र, पाऊस नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यावर्षी पेरणी करता आलेली नाही.

यावर्षी जून महिन्यात शहादा तालुक्‍यात खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या संकटात सापडल्या आहेत. जून महिना संपत आला तरी पेरण्या होऊ न शकल्याने आता शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांना जुलै महिन्यातच खरिपाच्या पेरण्या कराव्या लागणार आहेत. त्यामुळे पेरण्यांना उशीर होणार असल्यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. दीड वर्षापासून कोरोना महामारीचे संकट, तसेच गारपीट, चक्रीवादळाचा धोका, अवकाळी पाऊस आणि आता पाऊस लांबल्याने शेतकरी चहूबाजूंनी आर्थिक संकटाच्या भोवऱ्यात सापडला आहे.