शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबल्यामुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST

जयनगर : कोरोना महामारी व नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत शेतकरी पूर्ण बेजार झाला आहे. जून महिना संपत आला तरी ...

जयनगर : कोरोना महामारी व नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत शेतकरी पूर्ण बेजार झाला आहे. जून महिना संपत आला तरी लांबलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असून, पावसाची कोणतीही चाहूल दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शहादा तालुक्यात जून महिन्यात ७ जूनला चांगल्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली होती. मात्र, त्यानंतर पाऊस न आल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार लागवडीचे संकट उद्भवले आहे, तर मोजक्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.

शहादा तालुक्‍यात महत्त्वाचे व नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. जून महिना संपत आला तरी पावसाची कोणतीच चाहूल नसल्यामुळे कापसाची लागवड धोक्यात आली आहे. सोबत पेरण्याही लांबत आहेत. त्यामुळे पाऊस कधी येईल आणि पेरण्या होतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. एकच पाऊस झाल्याने लागवड कमी झाली आहे, तसेच बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी खरीप हंगाम सुरू होण्याअगोदरच शेतकरी यावर्षी संकटात सापडला आहे.

तालुक्‍यात अनेक शेतकऱ्यांनी बागायती कापूस लागवड केली असली तरी पाऊस नसल्याने या कापसाच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. बागायती कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांना पाऊस नसल्यामुळे विहिरी, तसेच कूपननलिकेतील पाणी भरावे लागत आहे. मात्र, जे शेतकरी पावसाच्या पाण्यावर कापूस लागवड, तसेच पेरणी करीत असतात असे शेतकरी आकाशाकडे टक लावून बसले आहेत. तालुक्यात खरीप हंगामात कापसासोबत मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन, अशी पिके घेतली जातात. मात्र, पाऊस नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यावर्षी पेरणी करता आलेली नाही.

यावर्षी जून महिन्यात शहादा तालुक्‍यात खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या संकटात सापडल्या आहेत. जून महिना संपत आला तरी पेरण्या होऊ न शकल्याने आता शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांना जुलै महिन्यातच खरिपाच्या पेरण्या कराव्या लागणार आहेत. त्यामुळे पेरण्यांना उशीर होणार असल्यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. दीड वर्षापासून कोरोना महामारीचे संकट, तसेच गारपीट, चक्रीवादळाचा धोका, अवकाळी पाऊस आणि आता पाऊस लांबल्याने शेतकरी चहूबाजूंनी आर्थिक संकटाच्या भोवऱ्यात सापडला आहे.