शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

‘अंदाजपंचे’ला कंटाळले शेतकरी..’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST

हवामान विभाग नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या एक महिन्यापासून नुसतीच आस लावून ठेवत आहे. ‘अंदाजपंचे...’ या उक्तीप्रमाणे एक महिन्यांपासून वेळ ...

हवामान विभाग नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या एक महिन्यापासून नुसतीच आस लावून ठेवत आहे. ‘अंदाजपंचे...’ या उक्तीप्रमाणे एक महिन्यांपासून वेळ निभावून नेणाऱ्या या विभागाचा अंदाजच आता शेतकरी नजरअंदाज करू पाहत आहेत. पावसाळ्याचे ३० दिवस असेच गेले. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, ते पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत, तर ज्यांची पेरणी बाकी आहे, ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा सरासरीएवढा पाऊस होईल, वेळेवर पाऊस येऊन पेरण्या जुलैपर्यंत आटोपल्या जातील, यंदा पीक परिस्थिती उत्तम राहील, असा अंदाज मे महिन्यातच हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला होता. त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात होता. नंदुरबार जिल्ह्यापुरता विचार करता, पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत अवघ्या १३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. दर आठ दिवसांत हवामान विभागातर्फे पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. तुरळक, हलका, मध्यम स्वरूपाचा, ढगांच्या गडगडाटासह, वादळवाऱ्यासह पाऊस येण्याचे अंदाज गेल्या महिनाभरापासून शेतकरी ऐकत आहेत, वाचत आहेत, परंतु वरुणराजा सर्वांनाच हुलकावणी देत आहे. आता विश्वास ठेवावा, तर कुणावर, असा प्रश्न बळीराजा स्वत:लाच विचारत आहे. सद्याही राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस सुरू असताना, नंदुरबार जिल्ह्यात मात्र कडक ऊन पडून तापमान ३८ ते ३९ अंशावर जात आहे. एकीकडे पावसाची शक्यता वर्तविताना, दुसरीकडे ऑक्टोबर हिटसारख्या स्थितीला सामोरे जावे लागत असल्याने, शेतकऱ्यांना ‘अंदाजपंचे...’चा कंटाळा आला आहे. शेतकरी आता वरुणराजाला ‘एकदाचा दणकून बरस बाबा’ अशी आर्त विनवणी करीत आहे.

-मनोज शेलार, नंदुरबार.