शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

शेतकरी तेल व वीजपंपापासून वंचित : आदिवासी प्रकल्प कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 11:30 IST

तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पामार्फत न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासी शेतक:यांना देण्यात येणा:या तेलपंप-वीजपंपाची योजना गेल्या तीन वर्षापासून रखडली असून, प्रत्यक्षात बहुसंख्य लाभार्थ्ीना ही यंत्रे मंजूरही झाली आहेत. तथापि त्यांना अजूनही देण्यात आलेली नाही. याबाबत आपल्यास्तरावर चौकशी करून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी यांनी केली ...

तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पामार्फत न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासी शेतक:यांना देण्यात येणा:या तेलपंप-वीजपंपाची योजना गेल्या तीन वर्षापासून रखडली असून, प्रत्यक्षात बहुसंख्य लाभार्थ्ीना ही यंत्रे मंजूरही झाली आहेत. तथापि त्यांना अजूनही देण्यात आलेली नाही. याबाबत आपल्यास्तरावर चौकशी करून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी यांनी केली आहे.याबाबत जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आदिवासी विकास प्रकल्पामार्फत आदिवासींसाठी अनेक योजना राबविण्यात येत असतात. तळोदा आदिवासी विकास प्रकल्पामार्फत देखील आदिवासी शेतक:यांसाठी पी.व्ही.सी. पाईप, तेलपंप, वीजपंप, महिलांसाठी शिलाई यंत्र, घरघंटी अशा वेगवेगळ्या योजना             न्युक्लिअस बजेट अंतर्गत राबविण्यात येत आहेत. तथापि गेल्या तीन वर्षापासून ही योजना रखडली असल्याचे चित्र आहे. कारण योजनांसाठी तळोदा प्रकल्पाने लाभाथ्र्याकडून प्रस्तावदेखील मागविले होते. परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणीअभावी लाभाथ्र्याचे हे प्रस्तावदेखील तसेच प्रलंबीत पडले आहेत. संबंधीत आदिवासी लाभार्थी आपल्या प्रस्तावाचा तपास करण्यासाठी सातत्याने प्रकल्पाकडे हेलपाटे मारत असतात. परंतु संबंधीत अधिकारी व कर्मचारी या लाभाथ्र्याना खोटे आश्वासन देवून परत पाठवीत असतात. साहजिकच लाभार्थी अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा-धडगाव येथून येवून नाहक फजित होत असतो. यात त्यांचा वेळ तर वाया जातोच शिवाय पैसाही जातो.          एवढेच नव्हे तर बहुसंख्य आदिवासी शेतक:यांना तेलपंप व वीजपंप,  पाईप योजनेचे मंजुरीचे आदेश  देखील तत्कालीन प्रकल्प प्रशासनाने दिले आहेत. मात्र अजूनही त्यांना अजून पावेतो ही यंत्रे मिळाली नाही. वास्तविक यावर तातडीने कार्यवाही योजना लाभाथ्र्याना दिली पाहिजे होती. परंतु केवळ प्रकल्पाच्या उदासिन धोरणामुळे त्यांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. तळोदा बरोबरच नंदुरबार प्रकल्पातदेखील या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याची आदिवासी शेतक:यांची तक्रार आहे. एकीकडे शासनाच्या आदिवासींसाठी अनेक योजना असतांना नंदुरबार जिल्ह्यातील या दोन्ही प्रकल्पात सन 2015-2016, 2016-2017, 2017-2018 अशा तब्बल तीन वर्षापासून योजना रखडल्याची स्थिती आहे. राज्यशासनानेही योजना बंद केली आहे. सुरु ठेवली आहे. यातही सुस्पष्टता नसल्याचे दिसून येते.  त्यामुळे योजनेबाबत प्रकल्पात अक्षरश: सावळा गोंधळ सुरू असून, याप्रकरणी आपल्यास्तरावर चौकशी करुन प्रभावी अंमलबजावणी करण्याची सक्त ताकीद द्यावी,               अशी मागणी करण्यात आली         आहे.