शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांनी पाडला लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुरुवारी सकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शेतक:यांनी विक्रीसाठी आणलेला धान्यमाल उघडय़ावरच पडला. यामुळे   बाजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुरुवारी सकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शेतक:यांनी विक्रीसाठी आणलेला धान्यमाल उघडय़ावरच पडला. यामुळे   बाजार समितीकडून शेडची व्यवस्था करण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी संतप्त झाले. व्यापा:यांच्या धान्यमाल शेडमध्ये तर शेतक:यांच्या माल उघड्यावर असल्याच्या आरोप यावेळी शेतक:यांनी केला. वादाची स्थिती पाहून लिलाव प्रक्रिया बंद करण्यात आली. दुपारी लिलाव सुरू करण्यात आले. दिवाळीच्या सुट्टयानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतक:यांनी विक्रीसाठी धान्य आणायला सुरुवात केली आहे. मका, सोयाबीन व बाजरीची आवक ब:यापैकी झाली. आधीच अवकाळी पावसामुळे शेतक:यांचे कंबरडे मोडले आहे. अतिवृष्टीमुळे डोळ्यादेखत शेतात उभ्या राहिलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.गुरुवारी सकाळी 11 वाजेला पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीप्रमाणे धान्य मालाची लिलाव प्रक्रिया सुरू होती. शेतक:यांनी विक्रीसाठी आणलेला माल अचानक आलेल्या पावसात सापडल्याने  नुकसान झाले. तेव्हा अनेक शेतकरी संतप्त झाले. शेडची व्यवस्था करण्याची मागणी शेतक:यांकडून करण्यात आली. व्यापा:यांच्या भुसार माल शेडमध्ये ठेवण्यात येतो तर शेतक:यांचे धान्य उघड्यावर ठेवण्यात येत असल्याचा आरोप काही शेतक:यांनी करताच त्या ठिकाणी वाद उद्भवला त्यामुळे लिलाव प्रक्रिया बंद करण्यात आली. सभापती किशोर पाटील व सचिव योगेश अमृतकर बाजार समितीच्या शेडमध्ये आल्यानंतर संतप्त झालेल्या मागणी लावून धरली. बाजार समिती प्रशासनाकडून शेतक:यांची समजूत काढण्याचे प्रय} करण्यात येत होते. बाजार समितीच्या आवारातील नवीन बांधण्यात आलेल्या शेडमध्ये व्यापा:यांनी माल ठेवलेला असून, ती जागा शेतक:यांसाठी उपलब्ध करून दिली जावी जेणेकरून धान्याचे नुकसान होणार नाही अशी मागणी संतप्त झालेल्या शेतक:यांनी सभापती किशोर पाटील यांच्याकडे लावून धरली. यावेळी अर्धा ते पाऊण तास गोंधळाचे वातावरण होते. सचिव योगेश अमृतकर यांनी ही शेतक:यांची समजूत काढण्याचा प्रय} केला परंतु, शेतकरी मागणीसाठी ठाम होते. उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त झालेले शेतकरी शांत झाल्यानंतर तणाव निवळला. दुपारी 2 वाजता धान्य मालाचा लिलाव करण्यात आला.

अवकाळी पावसाची शक्यता गृहीत धरून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने शुक्रवारपासून तीन दिवस धान्य मालाचे लिलाव प्रक्रिया बंद असल्याचे जाहीर केले आहे. शेतक:यांनी धान्य बाजार समितीत आणू नये असे आवाहन सभापती किशोर पाटील व सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे.