शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

शेतक:यांनी पाडला लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुरुवारी सकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शेतक:यांनी विक्रीसाठी आणलेला धान्यमाल उघडय़ावरच पडला. यामुळे   बाजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुरुवारी सकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शेतक:यांनी विक्रीसाठी आणलेला धान्यमाल उघडय़ावरच पडला. यामुळे   बाजार समितीकडून शेडची व्यवस्था करण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी संतप्त झाले. व्यापा:यांच्या धान्यमाल शेडमध्ये तर शेतक:यांच्या माल उघड्यावर असल्याच्या आरोप यावेळी शेतक:यांनी केला. वादाची स्थिती पाहून लिलाव प्रक्रिया बंद करण्यात आली. दुपारी लिलाव सुरू करण्यात आले. दिवाळीच्या सुट्टयानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतक:यांनी विक्रीसाठी धान्य आणायला सुरुवात केली आहे. मका, सोयाबीन व बाजरीची आवक ब:यापैकी झाली. आधीच अवकाळी पावसामुळे शेतक:यांचे कंबरडे मोडले आहे. अतिवृष्टीमुळे डोळ्यादेखत शेतात उभ्या राहिलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.गुरुवारी सकाळी 11 वाजेला पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीप्रमाणे धान्य मालाची लिलाव प्रक्रिया सुरू होती. शेतक:यांनी विक्रीसाठी आणलेला माल अचानक आलेल्या पावसात सापडल्याने  नुकसान झाले. तेव्हा अनेक शेतकरी संतप्त झाले. शेडची व्यवस्था करण्याची मागणी शेतक:यांकडून करण्यात आली. व्यापा:यांच्या भुसार माल शेडमध्ये ठेवण्यात येतो तर शेतक:यांचे धान्य उघड्यावर ठेवण्यात येत असल्याचा आरोप काही शेतक:यांनी करताच त्या ठिकाणी वाद उद्भवला त्यामुळे लिलाव प्रक्रिया बंद करण्यात आली. सभापती किशोर पाटील व सचिव योगेश अमृतकर बाजार समितीच्या शेडमध्ये आल्यानंतर संतप्त झालेल्या मागणी लावून धरली. बाजार समिती प्रशासनाकडून शेतक:यांची समजूत काढण्याचे प्रय} करण्यात येत होते. बाजार समितीच्या आवारातील नवीन बांधण्यात आलेल्या शेडमध्ये व्यापा:यांनी माल ठेवलेला असून, ती जागा शेतक:यांसाठी उपलब्ध करून दिली जावी जेणेकरून धान्याचे नुकसान होणार नाही अशी मागणी संतप्त झालेल्या शेतक:यांनी सभापती किशोर पाटील यांच्याकडे लावून धरली. यावेळी अर्धा ते पाऊण तास गोंधळाचे वातावरण होते. सचिव योगेश अमृतकर यांनी ही शेतक:यांची समजूत काढण्याचा प्रय} केला परंतु, शेतकरी मागणीसाठी ठाम होते. उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त झालेले शेतकरी शांत झाल्यानंतर तणाव निवळला. दुपारी 2 वाजता धान्य मालाचा लिलाव करण्यात आला.

अवकाळी पावसाची शक्यता गृहीत धरून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने शुक्रवारपासून तीन दिवस धान्य मालाचे लिलाव प्रक्रिया बंद असल्याचे जाहीर केले आहे. शेतक:यांनी धान्य बाजार समितीत आणू नये असे आवाहन सभापती किशोर पाटील व सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे.