शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विम्याचा लाभ केवळ पाच शेतक:यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाने सुरू केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात पाच मयत शेतक:यांचे वारसांना लाभ मिळाला आह़े  10 शेतक:यांचे प्रस्ताव नाशिक विभागाकडे प्रलंबित आहेत़ राज्य शासनाने तीन वर्षापूर्वी नव्या तरतूदींसोबत शेतजमीन नावावर असलेले किंवा सातबारा खातेदार असलेल्या शेतक:याचा अपघात किंवा इतर कारणास्तव अनैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाने सुरू केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात पाच मयत शेतक:यांचे वारसांना लाभ मिळाला आह़े  10 शेतक:यांचे प्रस्ताव नाशिक विभागाकडे प्रलंबित आहेत़ राज्य शासनाने तीन वर्षापूर्वी नव्या तरतूदींसोबत शेतजमीन नावावर असलेले किंवा सातबारा खातेदार असलेल्या शेतक:याचा अपघात किंवा इतर कारणास्तव अनैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना दोन लाख, कायमचे अपंगत्व आणि अवयव निकामी झालेल्यांना एक लाख रूपयांर्पयत लाभ देण्याची योजना आणली होती़ यात गेल्या वर्षात एकूण 17 शेतक:यांच्या वारसांनी पाठपुरावा करत कागदपत्रे दाखल केली होती़ यानुसार नाशिक विभागाने नियुक्त केलेल्या विमा कंपनीने पाच शेतक:यांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रूपयांचा लाभ देत हातभार लावला आह़े  यंदाच्या वर्षातील प्रस्तावही नाशिक विभागाकडे पाठवण्यात आले आहेत़ डिसेंबर 2016- नोव्हेंबर 2017 या वर्षात माकत्या भोंग्या वसावे रा़ भोरकुंड ता़ अक्कलकुवा, रविंद्र दयाराम माळी रा़ भोणे ता़ नंदुरबार, माधव विठ्ठल भारती रा़ मोरवड ता़ तळोदा, रमेश हिरामण देवरे रा़ मंदाणा ता़ शहादा, किसन देवजी वसावे रा़ वराडीपाडा ता़ नवापूर या पाच शेतक:यांचा अपघाती मृत्यू झाला होता़ त्यांच्या वारसांनी कृषी विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर त्यांना प्रत्येकी दोन लाख रूपयांचा विमा देण्यात आला आह़े ही रक्कम वारसांच्या धनादेश किंवा बँक खात्यात जमा करण्यात आली आह़े विविध कारणास्तव मयत झालेल्या शेतक:यांना देण्यात आलेल्या रकमेमुळे त्यांच्या कुटूंबियांची गार्डी मार्गाला लागली असून वर्षाच्या आतच त्यांना मदत दिल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आह़े मयताचा शवविच्छेदन अहवाल, मयत दाखल, वारसाचा दाखला, अपघात घडलेल्या जागेचा पंचनामा, पोलीस ठाण्यातील दाखल फिर्याद आदी कागदपत्रांच्या आधारे ही विमा रक्कम देण्यात येत़े कृषी विभागाकडून नाशिक येथील आयुक्त कार्यालयात हे प्रस्ताव देण्यात येतात़ तेथून जायका इन्शुरन्स ब्रोकेज या विमा कंपनीकडून शेतक:यांना लाभ देण्यात येत आह़े पाच शेतक:यांच्या वारसांना एकीकडे दोन लाख रूपयांचा लाभ मिळाला असताना त्यांच्यासोबतच्या 10 वारसांना अद्यापही फिरफिर करावी लागत आह़े 2017 मध्ये मयत झालेल्या कोत्या जेरम्या वळवी रा़ जांगठी ता़ अक्कलकुवा, दिनेश रणजितसिंग गिरासे रा़डोंगरगाव ता शहादा, मंग्या सु:या वळवी रा़ सल्लीबार ता़ अक्कलकुवा, अमर धर्मा पाटील रा़ विखरण ता़ नंदुरबार, रमेश काल्या वसावे रा़ ओरी ता़ अक्कलकुवा़ कर्मा जोधा वसावे रा़ रोजकुंड ता़ अक्कलकुवा, महेंद्र मुलादी वसावे रा़ वावडी ता़ नवापूर, ईरूबाई दुमडय़ा वळवी रा़ होराफळी ता़ अक्कलकुवा, नयूबाई अरूण गावीत रा़ बर्डीपाडा ता़ नवापूर व पुन्या खामल्या गावीत रा़ साकळीउमर ता़ अक्कलकुवा यांच्या वारसांनी कृषी विभागाकडे विविध कागदपत्रे सादर करून लाभ देण्याची विनंती केली होती़ 2018 उजाडूनही या शेतक:यांच्या वारसांना अद्याप पूर्ण विम्याचा लाभ मिळालेला नाही़