शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
6
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
7
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
8
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
9
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
10
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
11
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
12
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
13
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
14
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
15
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
16
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
17
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
18
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
19
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
20
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...

शेतकरी अपघात विम्यालाच ‘अपघात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

नंदुरबार : स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरणी पूर्ततेसाठी पाठविण्याबाबत असलेल्या उदासीनतेमुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून लांबच ...

नंदुरबार : स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरणी पूर्ततेसाठी पाठविण्याबाबत असलेल्या उदासीनतेमुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून लांबच आहेत. अनेकांना तर ही योजनाच माहिती नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षात अवघ्या २० जणांना त्याचा लाभ मिळाला आहे. याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.

शेती व्यवसाय करतांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघातात बऱ्याच वेळा शेतकऱ्याचा मृत्यू ओढावतो किंवा अपंगत्व येते. घरातील कर्ता व्यक्तीचे अकस्मात निधन झाले तर किंवा त्यांना अपंगत्व आले तर अशावेळी कुटुंबास आर्थिक आधार म्हणून राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. शिवाय अनेकांची प्रकरणेच पुढे सरकली नाहीत.

तीन वर्षातील दाखल प्रकरणे...

n जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये १६ प्रकरणे प्राप्त होती. विमा कंपनीकडे त्यातील सर्वच प्रकरणे सादर करण्यात आली. त्यापैकी १३ प्रकरणे मंजूर करून तीन प्रकरणे प्रलंबित आहेत.

n २०१७-१८मध्ये २१ प्रकरणे प्राप्त झाली होती. त्यातील विभागाकडे पूर्ततेसाठी आठ प्रकरणे तर विमा कंपनीकडे नऊ प्रकरणे सादर करण्यात आली. त्यातील केवळ चार प्रकरणे मंजूर झाली.

n २०१८-१९ मध्ये केवळ एक प्रकरण दाखल झाले ते पुढे सरकू शकले नाही. २०२०-२१ मध्ये किती प्रकरणे दाखल झाली याची माहिती मात्र उपलब्ध नव्हती.

अपघात आणि मिळणारी मदत...

n शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये कुटुंबीयांना मदत दिली जाते.

n अपघातात दोन डोळे, दोन अवयव निकामी होणे. एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते.

n अपघातात केवळ एक डोळा निकामी होणे किंवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळते.

पात्रतेसाठी अटी...

n राज्यातील महसूल विभागातील सातबारा नोंदीप्रमाणे १० ते ७५ वयोगटातील खातेदार शेतकरी यांचा व्यक्तिगत अपघात व अपंगत्वासाठी शासन विमा उतरवते.

n २००५ पासून विमा योजना अस्तित्वात असली तरी २०१५-१६ पासून नाव बदलून नव्याने ती सुरू करण्यात आली.