शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा मुंबई रिटर्नमुळे खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/बामखेडा : हिंगणी, ता.शहादा येथील मयत शिक्षकावर गुरुवारी मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या संपर्कातील हायरिस्क २८ ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/बामखेडा : हिंगणी, ता.शहादा येथील मयत शिक्षकावर गुरुवारी मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या संपर्कातील हायरिस्क २८ जणांना रात्रीच क्वॉरंटाईन करून त्यांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, शहादा येथील गरीब नवाज कॉलनीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तामुळे परिसर सील करण्यात आला आहे. त्याच्या संपर्कातील १६ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. शहादा शहर कोरोनामुक्त झाले असतांना हा रुग्ण सापडल्याने कोरोनामुक्तीचे समाधान अवघे दहा दिवसच टिकू शकले.गुरुवारी कोरोना पॉझिटिव्हचे दोन अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. त्यात हिंगणी येथील मुंबई रिटर्न शिक्षकाचा तसेच शहादा येथील गरीब नवाज कॉलनीतील एकाचा होता. हिंगणी येथील शिक्षकाचा २७ मे रोजीच मृत्यू झालेला होता. परंतु सिव्हीलला याबाबत शंका असल्याने त्यांचा दुसऱ्यांदा स्वॅब घेवून तो तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर २८ रोजी मृतदेह हिंगणी येथे नेण्यात आला. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.हिंगणी येथे खळबळशहादा तालुक्यातील हिंगनी येथील ४९ वर्षीय मुंबई रिटर्न शिक्षकाचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाला. या शिक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.या रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील २८ जणांना क्वॉरंटाईन करण्यात येवून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शिक्षक १५ मे रोजी मुंबईहून हिंगनी येथे आपल्या मूळगावी आले. ग्रामपंचायतीने त्यांना क्वॉरंटाईनही केले. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तºहाडी व वरूळ, ता. शिरपुर येथे खाजगी डॉक्टराकड़े तपासणी केली.डॉक्टरांनी त्यांना वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तपासणीचा सल्ला दिला तिथे तपासणीनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा पहिला अहवाल निगेटीव्ह आला होता. लागलीच दुसºया दिवशी त्यांचा मृत्यू झाला. हिंगनी येथे अंत्यविधी करण्यात आला. दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. मयत शिक्षक मुंबईहुन आल्यानंतर आपल्या मित्र परिवारच्याही संपर्कात आलेले आहे. जिल्ह्याबाहेर जाऊन खाजगी डॉक्टरांकडे प्राथमिक उपचार केलेला असल्यामुळे चिंता वाढली आहे.मयत रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती आणि त्याच्या दूसरा रिपोर्ट बाकी होता तरी रुग्ण मृत झाल्या नंतरही जिल्हा रुग्णालयाने मृतदेह गावी पाठविण्यास घाई का केली? मृतदेह गावी पाठविताना ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित आरोग्य यंत्रणेला का कळविण्यात आले नाही? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणाच संशयाच्या भोवºयात सापडली आहे.शहाद्यात उपाययोजनायेथील प्रभाग क्रमांक चार मधील गरीब नवाज कॉलनीतील ६२ वर्षाच्या इसमाचा अहवाल कोरोना विषाणू बाधीत आल्याने शहर कोरोना मुक्त असल्याचा आनंद केवळ दहा दिवसाचाच ठरला. बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य व परिसरातील एकूण १६ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वँबचे चे नमुने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.२८ मे रोजी रात्री शहरातील गरीब नवाज कॉलनी परिसरातील एका नागरिकाचा कोरोना विषाणू बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला संबंधित रूग्ण हा यापूर्वीच्या कंटेनमेंट झोनमधील आहे कोरोना विषाणू बाधित असलेल्या या रुग्णावर शहरातील एका खासगी रुग्णालयात यापूर्वी उपचार करण्यात आले होते सदर रुग्णालय प्रशासनाने सिल केले असून येथील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले असून त्याचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहे. बाधित रूग्णावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.कोरोना विषाणू बाधित अहवाल आल्यानंतर काल रात्रीपासून प्रशासन सतर्क झाले असून संपूर्ण गरीब नवाज काँलनी परिसराला सिल करण्यात आले असून पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत निजंर्तुकीकरण केले जात आहे या भागाला प्रशासनातर्फे कंटेनमेंट घोषित करण्यात आले आहे.

मुंबई रिटर्न असलेल्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे. नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील सहाजण, शिंदखेडा तालुक्यातील एकजण आणि हिंगणी, ता.शहादा येथील एकाचा समावेश आहे. त्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्यांवर आता लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.हिंगणी येथील मयताच्या संपर्कातील २८ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहे. त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय शहादा येथील रुग्णाच्या संपर्कातील १६ जणांना क्वॉरंटार्इंन करण्यात आले आहे. त्यांचेही स्वॅब घेण्यात आले आहेत.मयत शिक्षकावर गुरुवारी मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातून सर्व प्रक्रिया करून मृतदेह पाठविण्यात आला. गावाच्या स्मशानभूमीत पाच नातेवाईक व प्रशासनाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आम्ही ग्रामपंचायतमार्फत पूर्ण खबरदारी घेतली होती. सदर कोरोनाग्रस्त व्यक्ति मुंबई हून गावी आला तेव्हा त्याची प्रकृती चांगली होती. त्याला व त्याच्या कुटुबियाना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर आम्ही सतत आरोग्य विभागाच्या संपर्कात होतो. तरीही जेव्हा मृतदेह गावी आनन्यात आला तेव्हा आम्हाला कळविन्यात आले नाही, ही बाब दुर्देवी आहे.-सुनील पाटील, सरपंच, हिंगणी