शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गोमाई नदीतून वाळूची बेसुमार चोरटी वाहतूक, कारवाई होत नसल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

कोरोना महामारीने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. प्रत्येक नागरिक आपला जीव कसा वाचवता येईल याकडे गंभीरतेने ...

कोरोना महामारीने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. प्रत्येक नागरिक आपला जीव कसा वाचवता येईल याकडे गंभीरतेने लक्ष देत आहे. प्रत्येक नागरिकाने विनाकारण घराबाहेर पडू नये आणि या विषाणूची साखळी तोडता यावी यासाठी उपायजोजना सुरू आहेत. मात्र कोरोना काळातील लॉकडाऊन, संचारबंदी ते आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे वाळूची तस्करी होत आहे. काही महिन्यांपूर्वी तहसीलदारांनी स्वतः जाऊन गोमाई नदीत सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली होती. मात्र तहसीलदार मागे फिरताच पुन्हा राजरोसपणे वाळूची वाहतूक सुरू झाली.

शहादा शहराला लागून वाहणाऱ्या गोमाई नदीपात्रातून राजरोसपणे कोणताही धाक न बाळगता दिवसाढवळ्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळू भरून परिसरात ती विकण्याचा काहींनी सपाटा लावलेला आहे. शहादा शहरातच प्रांताधिकारी व तहसीलदार असतानादेखील कोणतीच भीती न बाळगता दिवसाढवळ्या गौण खनिजाची चोरी कशी होऊ शकते? प्रांताधिकारी व तहसीलदार कारवाईसाठी जातात तेव्हा नदीपात्रातील ट्रॅक्टर गायब झालेले असतात. तहसील कार्यालयातील एका अधिकाऱ्याची या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना फूस असल्याची चर्चा शहरात अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे वाळू माफियांचे चांगलेच फावले आहे. जर कुंपणच शेत खात असेल तर संबंधित अधिकारी कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहराला लागून वाहणाऱ्या गोमाई नदीतून चोरीछुपे नेहमीच वाळूची चोरी केली जाते. मात्र आता कोरोनाचे संकट असल्याने त्याचा फायदा घेत शहरातील अमरधाम, पिंगाणे, मनरद परिसर, मलोणी, उंटावद, तिखोरा भागातील नदीपात्रांमध्ये एकाचवेळी आठ-दहा ट्रॅक्टरची गर्दी पाहायला मिळते. चढ्या दराने शहादा परिसरात चोरीची वाळू विकण्यात येत आहे. हा नित्याचा प्रकार नागरिकांना अनुभवास येत आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनेसाठी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी आदी शासकीय कर्मचारी हे आपल्या नेमणुकीच्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दक्ष असताना दिवसाढवळ्या राजरोसपणे नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक होत आहे. मात्र या शासकीय कर्मचाऱ्यांना ते दिसत नसेल का? दिसत असेल तर कायद्याचा कोणताही धाक न बाळगता बिनधास्तपणे वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडत आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कायद्याचा धाक न बाळगता नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा होत असूनही प्रशासन मूग गिळून बसले आहे. यातून अवैधपणे होणाऱ्या वाळू उपशाला खतपाणी मिळत असून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आता कर्तव्यदक्ष प्रांताधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.