शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही जोरात पाऊस आला तरी नवीदिल्लीपाड्याकडे निघून जातो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:10 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धो-धो कोसळणारा पाऊस, मधूनच ऐकू येणारा रेल्वेचा भोंगा अन् अचानक झालेला ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धो-धो कोसळणारा पाऊस, मधूनच ऐकू येणारा रेल्वेचा भोंगा अन् अचानक झालेला मोठा आवाज अशा काळरात्रीला कोण विसरेल, आजही ती रात्र आठवली की अंगावर शहारे येत असल्याचा अनुभव धरमसिंग प्रधान सांगत होते़ पाचोराबारी ता़ नंदुरबार येथे ११ जुलै २०१६ च्या घटनेला त्यांनी उजाळा देत त्यानंतरही ग्रामस्थांमध्ये घटनेची पुनरावृत्ती होईल अशी भिती असल्याची माहिती दिली़तीन वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर येथील ग्रामस्थ नजीकच असलेल्या ‘नवी दिल्लीपाड्यात’ निघून जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली़११ जुलै २०१६ च्या मध्यरात्री पाचोराबारी गावातील रेल्वे पट्ट्याच्या पलीकडे असलेल्या उखड्या नाला परिसरातील आदिवासी व बंजारा समाजाची वसाहती निपचित पडली असताना अचानक मध्यरात्री ढगफूटी होवून हाहाकार उडाला होता़ पाण्याची पातळी ही आठ ते दहा फूटांपेक्षा वर गेल्याने काही क्षणात घरे पाण्याखाली गेली होती़ यातून २०० पेक्षा अधिक पाळीव जनावरे वाहून गेली़ घरादाराचे होत्याचे नव्हते झाले अन् काळजाच्या जवळ असलेली सहा माणसे पाण्यात वाहून गेली़ संपूर्ण रात्र सुरू असलेल्या हाहाकारानंतर सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर पाचोराबारीत मदतीसाठी शेकडो हात पुढे आले होते़चार वर्षानंतर शासन, प्रशासन आणि सेवाभावी संस्था यांच्या मदतीतून हे गाव पुन्हा उभे राहिले असून चार वर्षांपूर्वीच्या त्या आठवणी विसरण्याचा प्रयत्न करत आहेत़ शनिवारी याठिकाणी भेट दिली असता, गावातील बहुतांश नागरिक हे शेतावर कामांसाठी गेल्याची माहिती देण्यात आली़लोकसहभागातून बांधलेली घरे, सेवाभावी संस्थांनी दिलेले बाक, गावातील प्रत्येक रस्त्याचे झालेले काँक्रिटीकरण काही अंशी सुधारणा झाल्याचे सांगत होते़ तर दुसरीकडे रेल्वेने नवीन रेल्वे बोगदा तयार करण्याचे कामही पूर्णत्त्वास नेल्याचे दिसून आले़ एकूणएक गाव पुन्हा उभे राहिले असले तरी काळ रात्रीच्या स्मृती मात्र कायम आहेत़तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या सेवाभावामुळे पाचोराबारी अवघ्या काही दिवसात पूर्वपदावर आले होते़ मयतांच्या वारसांसह गुरे, घरे आणि संसारोपयोगी साधनांची भरपाई त्यांनी मिळवून देत बाधितांना उभे केले़ वेळोवेळी या गावाला त्यांनी भेट देत माय-माऊल्यांची आस्थेने विचारपूस केली़ त्यांच्या या आस्थेवाईकपणाचे फळ म्हणून पाण्याखाली गेलेल्या कष्टकऱ्यांच्या वसाहतीचे कलशेट्टी नगर असे नामकरण करुन त्यांना सन्मान दिला गेला़