शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

अनलाॅकनंतरही भाजीपाला दर स्थिर, जुडीच्या दराने मिळतेय पालक अन् कोथिंबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST

नंदुरबार : अनलाॅकनंतरही शहरात विक्री होणाऱ्या भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. शेतशिवारातून उत्पादन भरघोस येत असल्याने भाजीपाला दर स्थिर असल्याचे ...

नंदुरबार : अनलाॅकनंतरही शहरात विक्री होणाऱ्या भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. शेतशिवारातून उत्पादन भरघोस येत असल्याने भाजीपाला दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

लाॅकडाऊन काळातही जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार कायम ठेवण्यात आले होते. त्यातून मुबलक प्रमाणात भाजीपाला शहरी भागात येत होता. ऐन उन्हाळ्यात भाजीपाला आवक समाधानकारक असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. हा भाजीपाला साध्या दरांमध्ये उपलब्ध होत असल्याने नागरिक खरेदीसाठी दररोज गर्दी करत होते. अनलाॅकमध्ये भाजीपाला महागण्याची शक्यता होती; परंतु निवडक भाज्यावगळता इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत.

कोरोनाकाळात काहीअंशी अडचणी आल्या परंतु वाहतूक सुरू असल्याने भाजीपाला नियमितपणे बाजारात जात होता. आताही भाजीपाला बाजारात नियमित जात आहे. त्यातून नियमित आवक सुरू आहे. शेतातील उत्पादनही समाधानकारक आहे. येत्या काळात ही आवक वाढणार आहे.

-संजय माळी,

शेतकरी

कोरोनाकाळातही नंदुरबार शहर व परिसरात भाजीपाला पुरवठा करत होतो. वांग्यांना मोठी मागणी असते. सध्या कोथिंबीर आणि पालक यांचे मुबलक उत्पादन आहे. येत्या काळात पाणकोबी व फ्लाॅवर यांचे उत्पादनही येणार आहे.

-योगेश माळी,

शेतकरी

लॉकडाऊनकाळात बाजार समिती सुरु होते. यातून बाजारात भाजीपाला येत होता. आताही सारखीच स्थिती आहे. येत्या काळातही आवक वाढली आहे. ग्रामीण भागातून चांगला भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. त्यातून आवक अधिक आहे. यामुळे दरही समाधानकारक आहेत.

- बन्सीलाल महाजन, भाजी विक्रेता

लाॅकडाऊननंतर काहीअंशी भाजीपाल्याचे दर वाढले आहेत परंतु त्या भाज्यांची आवक वाढल्यानंतर ते दरही कमी होतील.

-विजय माळी, व्यापारी,

कोरोनाकाळात शहरातील स्टेशन रोड तसेच इतर भागात मुबलक भाजीपाला मिळत होता. हा भाजीपाला अत्यंत स्वस्त दरात होता. ताजा भाजीपाला मिळत असल्याने सोय झाली होती.

-पूनम पाटील, गृहिणी

घरापर्यंत येणारे विक्रेते काहीअंशी भाजीपाला महाग देत होते; परंतु बाजारातील गर्दीपेक्षा घराजवळ येणारा विक्रेत्याकडून भाजी घेणे पसंत केले. भाजीपाला दर यंदाही स्थिर आहेत.

-रेखा पाडवी, गृहिणी