शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

महिना उलटूनही नंदुरबार तालुका अद्याप कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

शेतकरीवर्ग विहीर सिंचनातून मे महिन्यातील लावणी करण्यात आलेल्या कापूस पिकाला पुरेशा पाणी मिळत नसल्याने पिके करपू लागले आहे. गेल्यावर्षी ...

शेतकरीवर्ग विहीर सिंचनातून मे महिन्यातील लावणी करण्यात आलेल्या कापूस पिकाला पुरेशा पाणी मिळत नसल्याने पिके करपू लागले आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जमिनीतील पाणीसाठा कमी होत असल्याने विहीर सिंचनवरील पिकांना फटका बसविण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याअभावी खरीप हंगामातील पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांना बागायत क्षेत्रावर दुबार लागवडीचे संकट निर्माण झाले आहे.

खरीप हंगामातील बागायती पिकांमध्ये पपई, मिरची, कापूस, भाजीपाला आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे. या पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे जमिनी पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही तर या पिकांना जगवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहे. आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पाऊस पडत नसून लागवड झालेली पिके करपू लागल्याने नंदुरबार तालुक्यातील शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.