शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

सुरळीत रेशन वाटपासाठी भरारी पथकांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना सुरळीत रेशन वाटपासाठी येथील महसूल प्रशासनाने नायब तहसीलदारांचे चार भरारी पथकांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना सुरळीत रेशन वाटपासाठी येथील महसूल प्रशासनाने नायब तहसीलदारांचे चार भरारी पथकांची नियुक्ती केली असून हे पथक काळाबाजारावर वॉच ठेवणार आहे. असे असले तरी या पथकांची कडक भूमिका घेण्याची अपेक्षा आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने समाजातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना तीन महिन्यांचे रेशन उपलब्ध करून दिले आहे. आता तर लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे मोफत रेशन उपलब्ध करून देणार आहे. तालुकास्तरावर मागील उपलब्ध झालेले नियतनाचेच सद्या वाटप सुरू आहे. हे नियतन अधिक सुरळीत होण्यासाठी तसेच पुढील रेशन वाटपाच्या पार्श्वभूमीवर येथील महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार नायब तहसीलदारांच्या पर्यवेक्षणाखाली चार भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.यात तळोदा मंडळ नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, मंडळ अधिकारी एस.बी. पाटील, बोरद मंडळाचे नायब तहसीलदार रिनेश गावीत, मंडळ अधिकारी माया मराठे, प्रतापपूर मंडळाचे श्रीकांत लोमटे व मंडळ अधिकारी सी.बी. नायक, सोमावल मंडळ नायब तहसीलदार रामजी राठोड, मंडळ अधिकारी डी.एस. निकम यांच्या सोबत संबंधीत गावांचा तलाठ्यांचा समावेश करण्यात आला आहे.हे भरारी पथक आपल्या मंडळातील रेशन दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना सुरळीत धान्य दिले जात आहे की नाही यावर वॉच ठेवणार आहेत. याशिवाय प्रति व्यक्तीस पाच किलो प्रमाणे धान्य वितरित होत आहे का? या प्रकरणी प्रत्यक्ष दुकानदाराकडे पडताळणी करणार आहे. या उपरांत संबंधीत दुकानदाराकडे अनियमितता आढळून आली तर थेट ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पथकास देण्यात आले आहे.शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरीब घटकांना पुरेसे रेशन मिळण्यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत. कारण अधिकाऱ्यांच्या भरारी पथकांबरोबरच गावपातळीवर ग्राम समितीचीही नेमणूक केली आहे. या ग्रामसमितीत संबंधीत गावाचा सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक व कोतवाल अशा पाच जणांचा समावेश आहे. ही समिती एप्रिल ते जूनपर्यंत शासनाकडून पात्र शिधापत्रिकाधारकांना दिले जाणारे मोफत रेशनच्या वाटपावर प्रत्यक्ष दुकानदाराकडे उपस्थित राहून देखरेख करतील. या उपरांतही जर काळा बाजाराच्या तक्रारी आल्या तर समितीलाही जबाबदार धरुन कठोर कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली आहे.