शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त जागांमुळे डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 10:33 IST

आंतरजिल्हा शिक्षक बदली : साडेचारशे शिक्षकांची कमरता, प्रक्रिया रखडल्याचा परिणाम

ठळक मुद्दे दुर्गम भागात थेट नियुक्ती.. सुरुवातीला जे शिक्षक आंतरजिल्हा बदलीने आले त्यांना थेट दुर्गम भागातील शाळांवर नियुक्ती देण्यात आली. यापुढे देखील जेही शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येतील त्यांना दुर्गम भागातील शाळांमध्येच नियुक्ती देण्याचा निर्णय जिल्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आंतरजिल्हा बदलीमुळे आणि आधीच रिक्त असलेल्या जागा अशा जवळपास साडेचारशे प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांची डोकेदुखी कायमच आहे. इतर जिल्ह्यातून बदली होऊन येणा:या शिक्षकांना अद्यापही त्या त्या जिल्ह्यातून कार्यमुक्त केले जात नसल्यामुळे जिल्ह्यातील रिक्त जागांचा प्रश्न सुटत नसल्याची स्थिती आहे. महिनाभरापासून शिक्षण विभाग या प्रश्नाला तोंड देत आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षक संख्येची डोकेदुखी कायमच राहिली आहे. मध्यंतरी अर्थात गेल्या चार ते पाच वर्षापासून शिक्षक भरती प्रक्रियाच राबविली गेली नसल्यामुळे रिक्त जागांची संख्या वाढली आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांपूर्वी आंतरजिल्हा बदलीची ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातील जवळपास 178 प्राथमिक शिक्षकांना आंतरजिल्हा बदली आदेशान्वये कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे रिक्त जागांची संख्या तब्बल 490 वर गेली. मध्यंतरी ऑफलाईनने काही शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्यानंतर त्यांना सामावून घेण्यात आल्याने रिक्त जागांची संख्या साडेचारशेर्पयत खाली आली आहे. जिल्ह्यात प्रथमच एवढय़ा मोठय़ा संख्येने शिक्षकांच्या रिक्त जागा झाल्याने समस्या वाढली आहे.कार्यमुक्तची घाईजिल्ह्यातून इतर जिल्ह्यात बदलीने जाणा:या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची घाई जिल्हा परिषद प्रशासनाला झाली होती. वास्तविक इतर जिल्ह्यातून किती शिक्षक येऊ शकतील, ते कधीर्पयत येतील त्यानंतरच जिल्ह्यातील शिक्षकांना कार्यमुक्त करणे आवश्यक होते. तशी मागणी जिल्हा परिषदेच्या पदाधिका:यांनी देखील केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत प्राथमिक शिक्षण विभागाने तडकाफडकी निर्णय घेत 178 शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश देवून टाकले. त्याबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. बदलीचा दुसरा लॉट रखडलाआतंरजिल्हा बदलीचा दुसरा लॉट रखडला आहे. पहिल्या लॉटनंतर आठ ते 12 दिवसात दुसरा लॉट काढून बदली प्रक्रिया राबविण्यात येणार होती. त्यामुळे लागलीच अशा शिक्षकांचे समायोजन करून रिक्त जागा भरून काढण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षण विभागाचे होते. परंतु दुसरा लॉट हा राज्यस्तरावरूनच रखडल्याने समस्या निर्माण झाली आहे. परिणामी शिक्षण विभागाला शिक्षकांचे नियोजन करतांना कसरत करावी लागत आहे. शिक्षकांवर ताणया सर्व प्रकारामुळे अनेक ठिकाणच्या शाळा या द्विशिक्षकीवरून एकशिक्षकी झाल्या आहेत. एका शिक्षकावर तीन ते चार वर्गाचा भार आला आहे. शिक्षकांअभावी एकही शाळा बंद नसल्याचे प्रशासनाचे म्हणने असले तरी रिक्त जागांमुळे मात्र विद्याथ्र्याचे नुकसान होत आहे. 400 शिक्षक येणारआंतरजिल्हा बदलीचा दुसरा लॉट लागलीच झाल्यास किमान 400 शिक्षक जिल्ह्यात येणार आहे. त्यात विदर्भ, मराठवाडासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमधील शिक्षकांचा समावेश आहे. लगतच्या जिल्ह्यातील काही शिक्षकांना आधीच सामावून घेण्यात आलेले आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याच जिल्ह्यात नोकरी करण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या शिक्षकांना ते सोयीचे झाले आहे. यापूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना मोठय़ा प्रमाणावर कष्ट घ्यावे लागत होते. आता मात्र, ते सर्व टळले असल्याने समाधान व्यक्त होत आहे