शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

साडेतीन हजार मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील २५ ते ३० गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी कामांना सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील २५ ते ३० गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी कामांना सुरुवात झाली आहे. या कामांमुळे सुमारे साडेतीन हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले असून त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटला आहे. लॉकडाऊन काळात रोजगार उपलब्ध झाल्याने मजुरांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.शहादा तालुक्यात लॉकडाऊन काळात सर्वच शेती कामे व व्यवसाय ठप्प झाले होते. याचा फटका ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना मोठ्या प्रमाणावर बसला. एप्रिल-मे महिन्यात पपई, केळीची तोड केली जाते. मात्र यावर्षी खरेदीसाठी व्यापारीच न आल्याने ही फळपिके झाडावरच सडून नष्ट झाली. अशीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात झाली आहे. त्यातच कामे नसल्याने हातमजुरी करणाऱ्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत होता. जिल्ह्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी मजुरांना त्यांच्याच गाव परिसरात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहादा तालुक्यातील पंचायत समिती, वन विभाग व कृषी विभाग यांच्यामार्फत कामांना गती मिळाली आहे.शहादा वन विभागांतर्गत तालुक्यातील मानमोडे, धांद्रे, शहाणे, नवानगर, वडगाव, पिंपराणी, वीरपूर, चिंचोरा, नवागाव व उभादगड या भागात वृक्षलागवडीच्या कामांना प्राधान्य देण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल अनिल पवार यांनी दिली. त्याचप्रमाणे शहादा पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या अंतर्गत पूर्व भागात असलेल्या ग्रामीण भागातील मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आडगाव, अंबापूर, धांद्रे, जाम, जवखेडा, तिधारे दिगर, कलमाडी, अमरावती, खापरखेडा, खरगोन, लंगडी भवानी, मानमोडे, पुरुषोत्तमनगर, रामपूर, शोभानगर, सोनवलतर्फे शहादा, लोंढरे, वडाळी, कवळीथ, गणोर, बिलाडी त.सा., गोगापूर यासह ३० गावांना गाळ काढणे, शोषखड्डा आदी कामे सुरू झाले असून या कामांवर तीन ते चार हजार मजूर कामावर असल्याची माहिती शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी यांनी दिली.परराज्यात गेलेले मजूर लॉकडाऊनमुळे गावागावात परत आले आहेत. तालुक्यात मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू झाल्याने स्थानिक मजुरांना कामे उपलब्ध झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिवार्हाचा प्रश्न सुटला आहे. परराज्यातून आल्यानंतर लागलीच रोजगार उपलब्ध झाल्याने या मजुरांनी समाधान व्यक्त केले आहे. पंचायत समिती, वनविभाग व कृषी विभाग यांच्यामार्फत जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या प्रमुखांनी दिली.