शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील २५ ते ३० गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी कामांना सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील २५ ते ३० गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी कामांना सुरुवात झाली आहे. या कामांमुळे सुमारे साडेतीन हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले असून त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटला आहे. लॉकडाऊन काळात रोजगार उपलब्ध झाल्याने मजुरांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.शहादा तालुक्यात लॉकडाऊन काळात सर्वच शेती कामे व व्यवसाय ठप्प झाले होते. याचा फटका ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना मोठ्या प्रमाणावर बसला. एप्रिल-मे महिन्यात पपई, केळीची तोड केली जाते. मात्र यावर्षी खरेदीसाठी व्यापारीच न आल्याने ही फळपिके झाडावरच सडून नष्ट झाली. अशीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात झाली आहे. त्यातच कामे नसल्याने हातमजुरी करणाऱ्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत होता. जिल्ह्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी मजुरांना त्यांच्याच गाव परिसरात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहादा तालुक्यातील पंचायत समिती, वन विभाग व कृषी विभाग यांच्यामार्फत कामांना गती मिळाली आहे.शहादा वन विभागांतर्गत तालुक्यातील मानमोडे, धांद्रे, शहाणे, नवानगर, वडगाव, पिंपराणी, वीरपूर, चिंचोरा, नवागाव व उभादगड या भागात वृक्षलागवडीच्या कामांना प्राधान्य देण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल अनिल पवार यांनी दिली. त्याचप्रमाणे शहादा पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या अंतर्गत पूर्व भागात असलेल्या ग्रामीण भागातील मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आडगाव, अंबापूर, धांद्रे, जाम, जवखेडा, तिधारे दिगर, कलमाडी, अमरावती, खापरखेडा, खरगोन, लंगडी भवानी, मानमोडे, पुरुषोत्तमनगर, रामपूर, शोभानगर, सोनवलतर्फे शहादा, लोंढरे, वडाळी, कवळीथ, गणोर, बिलाडी त.सा., गोगापूर यासह ३० गावांना गाळ काढणे, शोषखड्डा आदी कामे सुरू झाले असून या कामांवर तीन ते चार हजार मजूर कामावर असल्याची माहिती शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी यांनी दिली.परराज्यात गेलेले मजूर लॉकडाऊनमुळे गावागावात परत आले आहेत. तालुक्यात मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू झाल्याने स्थानिक मजुरांना कामे उपलब्ध झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिवार्हाचा प्रश्न सुटला आहे. परराज्यातून आल्यानंतर लागलीच रोजगार उपलब्ध झाल्याने या मजुरांनी समाधान व्यक्त केले आहे. पंचायत समिती, वनविभाग व कृषी विभाग यांच्यामार्फत जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या प्रमुखांनी दिली.