शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

इम्युनिटी वाढवणाऱ्या सेंद्रिय भाजीपाल्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

नंदुरबार : कोरोनासोबत लढा देताना शारीरिक आरोग्य अबाधित रहावे, यासाठी नागरिक इम्युनिटी वाढवणारे अन्नपदार्थ घेण्यावर भर देत आहेत. यातून ...

नंदुरबार : कोरोनासोबत लढा देताना शारीरिक आरोग्य अबाधित रहावे, यासाठी नागरिक इम्युनिटी वाढवणारे अन्नपदार्थ घेण्यावर भर देत आहेत. यातून भाजीपाल्याला सर्वाधिक पसंती असून शेतकरीही विविध भाज्यांची लागवड वाढवत आहेत.

नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात ही लागवड करण्यावर शेतकरी भर देत आहेत. जिल्ह्यात लिंबू, अद्रक, पुदीना, हळद या अपारंपरिक पिकांसह पारंपरिक भाजीपाला पिकांना पसंती दिली जात आहे. ९० दिवसात येणारा हा भाजीपाला शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या तर नागरिकांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करणार आहे.

कोरोनामुळे भाजीपाला लागवड करून तो सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यावर शेतकरी भर देत आहेत. शारीरिक क्षमता वाढवणाऱ्या भाजीपाल्याच्या लागवडीवर शेतकरी भर देत आहेत. यातून रोप व बियाणे विक्री वाढली आहे.

-दीपक मराठे,

नर्सरीचालक, रांझणी ता. तळोदा.

पुदिना : जिल्ह्यातील विविध नर्सरी तसेच शेतकरी पुदिनाचे उत्पादन घेतात. त्यांच्याकडून रोपांना ठोक बाजारपेठेत विक्री करण्यात येते. शारीरिक क्षमता वाढीत पुदिनाला महत्त्व असल्याने शेतकरी वाढीव लागवड करत असल्याचे नर्सरी चालकांकडून सांगण्यात आले. उत्पादन अधिक आल्याने गेल्या काही दिवसात त्याचे दरही पडले.

शेवगा : बहुगुणकारी शेवगा जिल्ह्यात लागवड केला जात होता. परंतु त्याचे क्षेत्र कमी होते. परंतु गेल्या सहा महिन्यात शेवगा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. दीर्घ काळाचे पीक असलेल्या शेवग्याला मोठी मागणी आहे. यातून त्यांची झाडे लावली जात आहेत. अनेकांनी गुजरात राज्याच्या विविध भागातून रोपांची आवक केली होती.

मेथी : नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात पारंपरिक पद्धतीने मेथी लागवड होते. बाजारात बाराही महिने मेथीची आवक होते. पाण्याच्या भरवशावर शेतकरी मेथीची लागवड करतात. मेथीला नागरिकांकडून सर्वाधिक पसंती देण्यात येत असून स्वस्त असल्याने खरेदी वाढली आहे.

हळद : कोरोना काळात हळदीचा वापर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात लागवड होणारे हळदीचे पीक आता नंदुरबार जिल्ह्यात आले आहे. जिल्ह्यात हळदीचे खडे धुण्याची सोय झाल्याने लागवड वाढली आहे. ओली हळद आणि त्याचा पाला यालाही औषधी गुणधर्म आहेत.

गवती चहा : अद्रकसोबतच गवती चहाला मोठी मागणी आहे. तालुक्यातील काही भागात गवती चहाची लागवड केली जाते. भाजीपाला उत्पादक शेतकरी त्याचे उत्पादन घेतात. बाजारात नगण्य दरात मिळणारी गवती चहा सर्वाधिक गुणकारी मानली जाते.