शहरं
Join us  
Trending Stories
1
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
2
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
3
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
4
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
5
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
6
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
7
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
8
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
9
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
10
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
11
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
12
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं
13
Onion Price Hike : महाराष्ट्रात कांद्याचे भाव गगनाला भिडणार? नेमकं करण तरी काय?
14
Corona Virus Update : चिंता वाढतेय! २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू, देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या किती?
15
'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट', केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत
16
सनातन धर्माला काहीही बोललं जातं तेव्हा हा राग कुठे जातो? शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून पवन कल्याण संतप्त
17
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
18
विमान प्रवास होणार स्वस्त? विमान इंधनाच्या किमती सलग तिसऱ्यांदा घटल्या; काय आहेत सध्याचे दर?

लसीकरणाबाबत ग्रामीण भागातील गैरसमज दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST

जयनगर : तीन ते चार महिन्यापासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची शिबिरे प्रत्येक गावोगावी सुरू करण्यात आली होती. मात्र, आता ...

जयनगर : तीन ते चार महिन्यापासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची शिबिरे प्रत्येक गावोगावी सुरू करण्यात आली होती. मात्र, आता लसींच्या तुटवड्यामुळे मोजक्याच गावांमध्ये लसीकरण शिबिर होत आहेत. आता लसीकरणाबाबत लोकांमधील जाणीव - जागृतीमुळे गैरसमज दूर झाले असून, १८ ते ४४ वयोगटातील तरुणांना जयनगर येथे पहिल्या डोसची प्रतीक्षा आहे. ४५ वर्षाच्या पुढील व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

शहादा तालुक्यातील जयनगर येथे मे महिन्यात लसीकरणाची शिबिरे घेण्यात आली होती. त्यावेळी ४५ वर्षापुढील ज्या व्यक्तींनी पहिला डोस घेतला होता त्यांना आता दुसऱ्या डोससाठी वडाळी अथवा काहाटूळ येथे जावे लागत आहे. जयनगर येथे बरेच दिवस झाले तरी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे शिबिर होत नाही. त्यामुळे जयनगर येथील ४५ वर्षापुढील सर्वच लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, दुसरा डोससाठी लोकांना दुसऱ्या गावातील शिबिरांवर अवलंबून राहावे लागत आहे.

राज्य शासनातर्फे तसेच आरोग्य विभाग, स्थानिक पातळीवरील शिक्षक, समाजसेवी संस्था यांच्याकडून कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी प्रत्येक गावांमध्ये युद्धपातळीवर प्रयत्न झाले होते. या जनजागृतीचा परिणाम सगळ्या लोकांमध्ये झाला असून, आता सर्वच लोकं लसीकरणासाठी इच्छुक आहेत. मात्र, सध्या कासवगतीने होत असलेल्या लसीकरणामुळे अनेक गावांमधील लोकांचा लसीकरणाचा पहिला व दुसऱ्या डोसचा कालावधी होऊनही त्यांना दुसरा डोस भेटत नाही. ज्या व्यक्तींचे लसीकरण बाकी आहे, त्यांचे लवकरात - लवकर लसीकरण करण्याची गरज आहे. कारण तिसऱ्या लाटेचा लहान बालकांना मोठ्या प्रमाणावर संसर्गाचा धोका होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून वेळीच लोकांचे लसीकरण केले नाही तर त्यांचा धोका कुटुंबासह इतर व्यक्तींनाही होणार आहे.