शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

तोरखेडा :- ग्रामीण भागात सद्या एक तासाच्या अंतराने वीज गायब होत असल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. सध्या पावसाचा लपंडाव ...

तोरखेडा :- ग्रामीण भागात सद्या एक तासाच्या अंतराने वीज गायब होत असल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. सध्या पावसाचा लपंडाव सुरू असून, उन्हाचा पाराही चढल्याने जनतेची अगोदरच लाहीलाही होत असताना विजेचे अघोषित भारनियमन जनतेला सळो की पळो करून सोडत आहे. याबाबत संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तार तुटला आहे, फॉल्ट झाला आहे, वरून बंद केले गेले आहे, असे उत्तर देऊन वेळ मारली जात आहे. वास्तविक पाहता पावसाळ्यापूर्वी प्री मान्सून कामे आटोपून दुरूस्तीचे सर्व सोपस्कार पूर्ण केले असतानाही नेहमी नेहमी फॉल्ट होतोच कसा याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे.

शहादा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजवितरणच्या वेगवेगळ्या उपकेंद्रातून जनतेला वीज पुरविली जात आहे. अगोदर उन्हाळ्याचा विचार केला तर कडक उन्हातही विजेचे अघोषित भारनियमन न होता जनतेला घरगुती वापरासाठी वेळेवर वीज उपलब्ध होत गेली आहे. मात्र, उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत नाही तोच विजेचे अघोषित भारनियमन सुरू करण्यात आले. यावर्षीच्या मृग नक्षत्रात तर थोडी हवा किंवा पावसाचे आगमन झाले तरी वीज बंद करून जनतेला वेठीस धरले गेले आहे. सद्या गेल्या १० ते १२ दिवसापासून पावसाचा लपंडाव सुरू असून, उन्हाळ्यासारखे ऊन तापत असताना विजेच्या अघोषित भारनियमनात अचानक वाढ झाली आहे. दिवसभरात तर अर्धा वेळ सुद्धा वीज टिकत नसल्याचे दिसून येत आहे. तासातासातून वीज गुल करून फॉल्ट झाला, वरून वीज बंद करण्यात आली, तार तुटला अशी वेगवेगळी कारणे दाखवून वेळेवर वीज भरणाऱ्या ग्राहकांना त्रास दिला जात आहे. मिनिटा मिनिटाने वीज बंद करून अकलेचे तारे तोडणाऱ्या या वीज कंपनीने जनतेची झोप उडवून दिली होती. फक्त वीज वसुली करण्यावर भर देणाऱ्या वीज वितरण कंपनीला सद्या ग्राहकांच्या सोईसुविधांचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे सध्या घडत असलेल्या प्रकारावरून दिसून येत आहे.

फ्युज टाकायला ग्रामीण भागात कर्मचारीच नाही

सद्या शहादा तालुक्यात वायरमनची संख्या कमी असल्याने एका वायरमनवर दोन-तीन गावांचा कार्यभार असल्याने व हे कार्यरत वायरमन शक्यतो मुख्यालयी हजरच राहत नसल्याने गावातील रोहित्रावरील साधा फ्युजही गेला तरी फ्यूज टाकण्यासाठी कर्मचारी हजर राहत नसल्याने असेही अनेक गावे कितीतरी वेळ अंधारात काढत आहेत. अनेक गावात झीरो वायरमन गावगाडा चालवली असल्याने एखाद्या वेळी त्याचा जीवाचे बरेवाईट झाल्यास जबाबदारी कोणाची? असेही बोलले जात आहे