शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

तोरखेडा :- ग्रामीण भागात सद्या एक तासाच्या अंतराने वीज गायब होत असल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. सध्या पावसाचा लपंडाव ...

तोरखेडा :- ग्रामीण भागात सद्या एक तासाच्या अंतराने वीज गायब होत असल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. सध्या पावसाचा लपंडाव सुरू असून, उन्हाचा पाराही चढल्याने जनतेची अगोदरच लाहीलाही होत असताना विजेचे अघोषित भारनियमन जनतेला सळो की पळो करून सोडत आहे. याबाबत संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तार तुटला आहे, फॉल्ट झाला आहे, वरून बंद केले गेले आहे, असे उत्तर देऊन वेळ मारली जात आहे. वास्तविक पाहता पावसाळ्यापूर्वी प्री मान्सून कामे आटोपून दुरूस्तीचे सर्व सोपस्कार पूर्ण केले असतानाही नेहमी नेहमी फॉल्ट होतोच कसा याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे.

शहादा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजवितरणच्या वेगवेगळ्या उपकेंद्रातून जनतेला वीज पुरविली जात आहे. अगोदर उन्हाळ्याचा विचार केला तर कडक उन्हातही विजेचे अघोषित भारनियमन न होता जनतेला घरगुती वापरासाठी वेळेवर वीज उपलब्ध होत गेली आहे. मात्र, उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत नाही तोच विजेचे अघोषित भारनियमन सुरू करण्यात आले. यावर्षीच्या मृग नक्षत्रात तर थोडी हवा किंवा पावसाचे आगमन झाले तरी वीज बंद करून जनतेला वेठीस धरले गेले आहे. सद्या गेल्या १० ते १२ दिवसापासून पावसाचा लपंडाव सुरू असून, उन्हाळ्यासारखे ऊन तापत असताना विजेच्या अघोषित भारनियमनात अचानक वाढ झाली आहे. दिवसभरात तर अर्धा वेळ सुद्धा वीज टिकत नसल्याचे दिसून येत आहे. तासातासातून वीज गुल करून फॉल्ट झाला, वरून वीज बंद करण्यात आली, तार तुटला अशी वेगवेगळी कारणे दाखवून वेळेवर वीज भरणाऱ्या ग्राहकांना त्रास दिला जात आहे. मिनिटा मिनिटाने वीज बंद करून अकलेचे तारे तोडणाऱ्या या वीज कंपनीने जनतेची झोप उडवून दिली होती. फक्त वीज वसुली करण्यावर भर देणाऱ्या वीज वितरण कंपनीला सद्या ग्राहकांच्या सोईसुविधांचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे सध्या घडत असलेल्या प्रकारावरून दिसून येत आहे.

फ्युज टाकायला ग्रामीण भागात कर्मचारीच नाही

सद्या शहादा तालुक्यात वायरमनची संख्या कमी असल्याने एका वायरमनवर दोन-तीन गावांचा कार्यभार असल्याने व हे कार्यरत वायरमन शक्यतो मुख्यालयी हजरच राहत नसल्याने गावातील रोहित्रावरील साधा फ्युजही गेला तरी फ्यूज टाकण्यासाठी कर्मचारी हजर राहत नसल्याने असेही अनेक गावे कितीतरी वेळ अंधारात काढत आहेत. अनेक गावात झीरो वायरमन गावगाडा चालवली असल्याने एखाद्या वेळी त्याचा जीवाचे बरेवाईट झाल्यास जबाबदारी कोणाची? असेही बोलले जात आहे