शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

संडे स्पेशल मुलाखत- निवडणूक प्रक्रिया यंदा ‘हायटेक’मुळे सुटसुटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 12:57 IST

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुटसूटीत होण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात हेल्पडेस्क स्थापन केला आहे. त्यात इच्छूकांना ॲानलाईन सर्व माहिती मिळणार आहे. -बालाजी क्षीरसागर.

मनोज शेलारलोकमत न्यूज नेटवर्कयंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून निवडणूक विभागाने अनेक बदल केले आहेत. त्यात ऑनलाईन प्रक्रिया हा मुख्य बदल आहे. याशिवाय सदस्य म्हणून उभे राहण्यासाठी किमान सातवी पास असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायींमध्ये पारदर्शक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक शाखा सज्ज आहे. बदलेल्या स्वरूपाविषयी सर्व आवश्यक घटकांना प्रशिक्षण देखील यापूर्वीच दिले गेले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

यंदाच्या निवडणुकीत काय मुख्य बदल झाले आहेत?एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामुळे शासन आणि निवडणूक विभागाने अनेक बदल केले आहेत. त्यात मुख्य बदल हा थेट जनतेतून सरपंच निवडण्याऐवजी सदस्यांमधून सरपंच निवड होणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण हे निवडणूकपूर्व काढले जात होते. ते आता निवडणुकीनंतर काढले जाणार आहे. सदस्य पदासाठी किमान सातवी पास ही अट नव्याने टाकण्यात आली आहे. ॲानलाईन सॅाफ्टवेअर प्रणालीतच संपुर्ण निवडणूक कामकाज होणार आहे. याशिवाय प्रत्येक तहसील कार्यालया इच्छुकांसाठी ‘हेल्पडेस्क’ निर्माण करण्यात आलेला आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांना नवीन प्रणालीच प्रशिक्षण दिले आहे का?जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार सर्व तहसीलदार, निवडणूक निर्णय अधिकारी व संबधीत कर्मचारी यांना नवीन ॲानलाईन सॅाफ्टवेअर प्रणालीचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्याचे बारीकसारीक तपशील सांगण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेदरम्यान फारशा अडचणी येतील असे वाटत नाही. या सर्व बाबींसाठी नागरिकांचे व राजकीय पक्षांचेही सहकार्य अपेक्षीत आहेच.

हेल्प डेस्कची स्थापना... ॲानलाईन प्रक्रियेसंदर्भात इच्छूक उमेदवारांना अडचणी येऊ नयेत यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात हेल्पडेस्क स्थापन करण्यात आला आहे. तेथे जाऊन शंका निरसन करता येणार आहे. आधी अर्ज आणि आवश्यक घोषणापत्र, दाखले ॲानलाईन अपलोड करावे लागतील. त्यानंतर त्यांची प्रिंट काढून ते जमा करावे लागणार आहेत. त्यासाठी ३० डिसेंबरची मुदत आहे. सातवी पासची अट... सातवी पासची अट नव्याने टाकण्यात आली आहे. १९९५ नंतर जन्मलेल्यांसाठी ती असूनया निर्णयाची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी सुचना केल्या आहेत.निष्पक्ष वातावरणात निवडणुका... ग्रामपंचायत निवडणुका खुल्या वातावरणात पार पडाव्या यासाठीचे नियोजन झाले आहे. आचारसंहितेचेही काटेकोर पालन केले जात आहे. यासाठी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सुचना दिलेल्या आहेत.