शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

वाढत्या तापमानाचा जनावरांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 20:40 IST

नंदुरबार : कर्मचाऱ्यांच्या पथकाव्दारे पशुपालकांचे होतेय प्रबोधन

नंदुरबार : वाढत्या तापमानाचा फटका जनावरांनाही बसताना दिसून येत आहे़ तापमान वाढीमुळे जनावरांचे आरोग्य खालावले आहे़ त्यामुळे पशुधन विकास विभागाकडून पशुपालकांचे प्रबोधन करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहे़ या पथकांकडून गावोगावी जाऊन वाढत्या तापमानापासून पशुधनाचे जतन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे़वाढत्या तापमानामुळे जनावरांवर दुष्परिणाम होत आहे़ तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ येणे, जनावरांच्या खुरांचे सालटे निघणे, उष्णतेमुळे शरिरातील पाणी कमी होणे, जनावरांना ताप येणे आदी विविध समस्या भेडसावत असतात़ त्यामुळे साहजिकच पशुपालकांसमोर समस्या निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे़ सध्या नंदुरबारातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे़ अवकाळी पावसाचे दोन ते तीन दिवस वगळता मार्चपासून तापमान चाळीशीच्या जवळपास पोहचले आहे़ सध्या तर तापमान ४१ ते ४२ अंशावर स्थिर आहे़वाढत्या तापमानामुळे मनुष्यासह जनावरांच्या जिवाचीही लाही लाही होत आहे़ त्यातच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाण्याची भिषण टंचाई असल्याने साहजिकच जनावरांना पाणी पाजण्यासाठी पशुपालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे़दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे जनावरांची कशी काळजी घ्यावी याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या फिरत्या पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे़ संबंधित कर्मचाºयांकडून पशुपालकांचे प्रबोधन करुन आपल्या जनावरांची कशी काळजी घ्यावी, जनावरांच्या गोठ्यातील वातावरण थंड ठेवण्यासाठी काय उपाय योजना कराव्या आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे़तोंडखुरी, पायखुरी लसीकरण मोहिमनंदुरबार जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडून २१ एप्रिल ते २० मे दरम्यान, तीन महिन्यांवरील जनावरांसाठी तोंडखुरी-पायखुरी लसीकरण राबविण्यात येत आहे़ याबाबत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे़ तोंडखुरी-पायखुरी आजारामध्ये जनावराला सुरुवातीला खूप ताप येणे, मुखदाह होणे, लाळ वाहणे, तोंडाच्या दुखापतीमुळे खाणेपिणे बंद होणे, जिभेला चट्टे पडणे, तोंडात व पायाच्या खुरात जखमा होणे व त्यामुळे जनावरे लंगडणे आदी लक्षणे दिसून येत असतात़दुधाळ जनावरे दूध देणे कमी करतात किंवा बंद करतात़ शेती उपायोगी जनावरे काम करण्यायोग्य राहत नाहीत़ त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होऊ शकते़ हा आजार मे ते आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक आढळून येत असतो़त्यामुळे याबाबतही पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांकडून पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे़ २१ एप्रिल ते २० मे या कालावधीत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुपालकांनी आपल्या जनावरांना लस टोचून घ्यावी असे आवाहन जिल्हा पशुसंधृन उपायुक्त डॉ़ शामकांत पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ उमेश पाटील व सहाय्यक उपायुक्त डॉ़ के़टी़ पाटील यांनी केले आहे़