शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

वाढत्या तापमानाचा जनावरांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 20:40 IST

नंदुरबार : कर्मचाऱ्यांच्या पथकाव्दारे पशुपालकांचे होतेय प्रबोधन

नंदुरबार : वाढत्या तापमानाचा फटका जनावरांनाही बसताना दिसून येत आहे़ तापमान वाढीमुळे जनावरांचे आरोग्य खालावले आहे़ त्यामुळे पशुधन विकास विभागाकडून पशुपालकांचे प्रबोधन करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहे़ या पथकांकडून गावोगावी जाऊन वाढत्या तापमानापासून पशुधनाचे जतन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे़वाढत्या तापमानामुळे जनावरांवर दुष्परिणाम होत आहे़ तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ येणे, जनावरांच्या खुरांचे सालटे निघणे, उष्णतेमुळे शरिरातील पाणी कमी होणे, जनावरांना ताप येणे आदी विविध समस्या भेडसावत असतात़ त्यामुळे साहजिकच पशुपालकांसमोर समस्या निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे़ सध्या नंदुरबारातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे़ अवकाळी पावसाचे दोन ते तीन दिवस वगळता मार्चपासून तापमान चाळीशीच्या जवळपास पोहचले आहे़ सध्या तर तापमान ४१ ते ४२ अंशावर स्थिर आहे़वाढत्या तापमानामुळे मनुष्यासह जनावरांच्या जिवाचीही लाही लाही होत आहे़ त्यातच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाण्याची भिषण टंचाई असल्याने साहजिकच जनावरांना पाणी पाजण्यासाठी पशुपालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे़दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे जनावरांची कशी काळजी घ्यावी याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या फिरत्या पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे़ संबंधित कर्मचाºयांकडून पशुपालकांचे प्रबोधन करुन आपल्या जनावरांची कशी काळजी घ्यावी, जनावरांच्या गोठ्यातील वातावरण थंड ठेवण्यासाठी काय उपाय योजना कराव्या आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे़तोंडखुरी, पायखुरी लसीकरण मोहिमनंदुरबार जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडून २१ एप्रिल ते २० मे दरम्यान, तीन महिन्यांवरील जनावरांसाठी तोंडखुरी-पायखुरी लसीकरण राबविण्यात येत आहे़ याबाबत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे़ तोंडखुरी-पायखुरी आजारामध्ये जनावराला सुरुवातीला खूप ताप येणे, मुखदाह होणे, लाळ वाहणे, तोंडाच्या दुखापतीमुळे खाणेपिणे बंद होणे, जिभेला चट्टे पडणे, तोंडात व पायाच्या खुरात जखमा होणे व त्यामुळे जनावरे लंगडणे आदी लक्षणे दिसून येत असतात़दुधाळ जनावरे दूध देणे कमी करतात किंवा बंद करतात़ शेती उपायोगी जनावरे काम करण्यायोग्य राहत नाहीत़ त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होऊ शकते़ हा आजार मे ते आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक आढळून येत असतो़त्यामुळे याबाबतही पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांकडून पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे़ २१ एप्रिल ते २० मे या कालावधीत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुपालकांनी आपल्या जनावरांना लस टोचून घ्यावी असे आवाहन जिल्हा पशुसंधृन उपायुक्त डॉ़ शामकांत पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ उमेश पाटील व सहाय्यक उपायुक्त डॉ़ के़टी़ पाटील यांनी केले आहे़