शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानाचा जनावरांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 20:40 IST

नंदुरबार : कर्मचाऱ्यांच्या पथकाव्दारे पशुपालकांचे होतेय प्रबोधन

नंदुरबार : वाढत्या तापमानाचा फटका जनावरांनाही बसताना दिसून येत आहे़ तापमान वाढीमुळे जनावरांचे आरोग्य खालावले आहे़ त्यामुळे पशुधन विकास विभागाकडून पशुपालकांचे प्रबोधन करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहे़ या पथकांकडून गावोगावी जाऊन वाढत्या तापमानापासून पशुधनाचे जतन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे़वाढत्या तापमानामुळे जनावरांवर दुष्परिणाम होत आहे़ तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ येणे, जनावरांच्या खुरांचे सालटे निघणे, उष्णतेमुळे शरिरातील पाणी कमी होणे, जनावरांना ताप येणे आदी विविध समस्या भेडसावत असतात़ त्यामुळे साहजिकच पशुपालकांसमोर समस्या निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे़ सध्या नंदुरबारातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे़ अवकाळी पावसाचे दोन ते तीन दिवस वगळता मार्चपासून तापमान चाळीशीच्या जवळपास पोहचले आहे़ सध्या तर तापमान ४१ ते ४२ अंशावर स्थिर आहे़वाढत्या तापमानामुळे मनुष्यासह जनावरांच्या जिवाचीही लाही लाही होत आहे़ त्यातच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाण्याची भिषण टंचाई असल्याने साहजिकच जनावरांना पाणी पाजण्यासाठी पशुपालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे़दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे जनावरांची कशी काळजी घ्यावी याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या फिरत्या पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे़ संबंधित कर्मचाºयांकडून पशुपालकांचे प्रबोधन करुन आपल्या जनावरांची कशी काळजी घ्यावी, जनावरांच्या गोठ्यातील वातावरण थंड ठेवण्यासाठी काय उपाय योजना कराव्या आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे़तोंडखुरी, पायखुरी लसीकरण मोहिमनंदुरबार जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडून २१ एप्रिल ते २० मे दरम्यान, तीन महिन्यांवरील जनावरांसाठी तोंडखुरी-पायखुरी लसीकरण राबविण्यात येत आहे़ याबाबत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे़ तोंडखुरी-पायखुरी आजारामध्ये जनावराला सुरुवातीला खूप ताप येणे, मुखदाह होणे, लाळ वाहणे, तोंडाच्या दुखापतीमुळे खाणेपिणे बंद होणे, जिभेला चट्टे पडणे, तोंडात व पायाच्या खुरात जखमा होणे व त्यामुळे जनावरे लंगडणे आदी लक्षणे दिसून येत असतात़दुधाळ जनावरे दूध देणे कमी करतात किंवा बंद करतात़ शेती उपायोगी जनावरे काम करण्यायोग्य राहत नाहीत़ त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होऊ शकते़ हा आजार मे ते आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक आढळून येत असतो़त्यामुळे याबाबतही पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांकडून पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे़ २१ एप्रिल ते २० मे या कालावधीत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुपालकांनी आपल्या जनावरांना लस टोचून घ्यावी असे आवाहन जिल्हा पशुसंधृन उपायुक्त डॉ़ शामकांत पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ उमेश पाटील व सहाय्यक उपायुक्त डॉ़ के़टी़ पाटील यांनी केले आहे़